शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

दोन दिवसांच्या अधिवेशनात समस्या कशा सुटतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:24 IST

पावसाळी अधिवेशनाचा नियोजित कालावधी पंधरा दिवसांचा असताना आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावेळेस पूर्णवेळ अधिवेशन होऊन गत दोन वर्षांपासून ...

पावसाळी अधिवेशनाचा नियोजित कालावधी पंधरा दिवसांचा असताना आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावेळेस पूर्णवेळ अधिवेशन होऊन गत दोन वर्षांपासून जनतेच्या प्रलंबित समस्यांवर उपाययोजना होणे अपेक्षित असताना केवळ दोनच दिवसांचे अधिवेशन घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयावर आ. श्वेता महाले यांनी नाराजी व्यक्त केली असून या सरकारला जनतेच्या प्रश्नांविषयी काहीही देणे-घेणे नसल्याचे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे, अशी टीका केली आहे. जनतेच्या समस्यांची सोडवणूक होण्यासाठी, सरकारला जाब विचारण्यासाठी पूर्णवेळ अधिवेशन चालणे गरजेचे आहे. लॉकडाऊनमुळे सर्व कार्यालयीन प्रक्रिया ठप्प होती. राज्यातील कोट्यवधी नागरिकांचे शासकीय प्रश्न प्रलंबित आहेत. त्रस्त झालेल्या नागरिकांना अधिवेशनात न्याय मिळण्याची आशा होती. पण आता ती आशासुद्धा मावळल्याने या सरकारच्या काळात जनतेला न्याय मिळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे सोबतच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, रखडलेली भरती प्रक्रिया, शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीककर्जाचा विषय, पीकविमा, पेरणी सुरू झालेली असताना अडविलेले शेतरस्ते मोकळे करणे, गडप झालेला पाऊस, बियाण्यांची टंचाई, वाढीव वीज बिलाची मोगली पद्धतीने सुरू असलेली वसुली, आशा कार्यकर्त्यांच्या वेतनवाढीची मागणी, कोरोनाकाळात निर्माण झालेला आरोग्याचा प्रश्न, असे अनेक प्रश्न आहेत पण या सरकारला जनतेच्या या समस्या सोडवायच्याच नाहीत, तथापि याबाबत कोणी प्रश्न उपस्थित करू नये, यासाठीच दोन दिवसांच्या अधिवेशनाचा घाट रचण्यात आल्याचा, आरोप आ. महालेंनी केला आहे.