शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दोन दिवसांच्या अधिवेशनात समस्या कशा सुटतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:24 IST

पावसाळी अधिवेशनाचा नियोजित कालावधी पंधरा दिवसांचा असताना आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावेळेस पूर्णवेळ अधिवेशन होऊन गत दोन वर्षांपासून ...

पावसाळी अधिवेशनाचा नियोजित कालावधी पंधरा दिवसांचा असताना आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावेळेस पूर्णवेळ अधिवेशन होऊन गत दोन वर्षांपासून जनतेच्या प्रलंबित समस्यांवर उपाययोजना होणे अपेक्षित असताना केवळ दोनच दिवसांचे अधिवेशन घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयावर आ. श्वेता महाले यांनी नाराजी व्यक्त केली असून या सरकारला जनतेच्या प्रश्नांविषयी काहीही देणे-घेणे नसल्याचे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे, अशी टीका केली आहे. जनतेच्या समस्यांची सोडवणूक होण्यासाठी, सरकारला जाब विचारण्यासाठी पूर्णवेळ अधिवेशन चालणे गरजेचे आहे. लॉकडाऊनमुळे सर्व कार्यालयीन प्रक्रिया ठप्प होती. राज्यातील कोट्यवधी नागरिकांचे शासकीय प्रश्न प्रलंबित आहेत. त्रस्त झालेल्या नागरिकांना अधिवेशनात न्याय मिळण्याची आशा होती. पण आता ती आशासुद्धा मावळल्याने या सरकारच्या काळात जनतेला न्याय मिळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे सोबतच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, रखडलेली भरती प्रक्रिया, शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीककर्जाचा विषय, पीकविमा, पेरणी सुरू झालेली असताना अडविलेले शेतरस्ते मोकळे करणे, गडप झालेला पाऊस, बियाण्यांची टंचाई, वाढीव वीज बिलाची मोगली पद्धतीने सुरू असलेली वसुली, आशा कार्यकर्त्यांच्या वेतनवाढीची मागणी, कोरोनाकाळात निर्माण झालेला आरोग्याचा प्रश्न, असे अनेक प्रश्न आहेत पण या सरकारला जनतेच्या या समस्या सोडवायच्याच नाहीत, तथापि याबाबत कोणी प्रश्न उपस्थित करू नये, यासाठीच दोन दिवसांच्या अधिवेशनाचा घाट रचण्यात आल्याचा, आरोप आ. महालेंनी केला आहे.