शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालविणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:34 IST

बुलडाणा : गत काही दिवसांपासून काेराेना संक्रमण माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने आराेग्य कर्मचाऱ्यांवरील ताण वाढत आहे़ तसेच संचारबंदी ...

बुलडाणा : गत काही दिवसांपासून काेराेना संक्रमण माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने आराेग्य कर्मचाऱ्यांवरील ताण वाढत आहे़ तसेच संचारबंदी व लाॅकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी करताना पाेलिसांवरही कामाचा ताण माेठ्या प्रमाणात वाढला आहे़ वाढत्या ताणामुळे पाेलीस आणि आराेग्य कर्मचारी मानसिकरीत्या थकल्याचे चित्र आहे़ त्यांचा थकवा दूर करण्यासाठी याेगाची शिबिरे, मेडिटेशन व इतर उपाययाेजना करण्यात येत आहेत़

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस व आरोग्य प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. रात्रंदिवस काम करावे लागत असल्याने पोलीस व आरोग्याधिकारी, कर्मचाऱ्यांना ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. एरवी योग शिबिरे, मेडिटेशन शिबिरे घेतली जात असली तरी कोरोनाकाळात मात्र त्यांना खो बसला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालविणार, हा प्रश्न निर्माण होत आहे. कोरोना रोखण्यासाठी सर्वच विभागांचे कर्मचारी, अधिकारी पुढाकार घेत असले तरी यात आरोग्य व पोलीस प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. दररोज कोरोना रुग्ण आढळत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांचे काम वाढले आहे. जिल्हा प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत निर्बंध घातल्याने या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ‘पोलीस प्रशासनावर आली आहे. यातून ताणतणाव वाढत असून, मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. दोन्ही विभागांच्या वतीने योग शिबिरे, ध्यानधारणा शिबिरे घेण्यात येतात़ त्यातून या कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येताे़

काेराेना संक्रमण वाढल्यापासून आराेग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे़ कर्मचाऱ्यांचे मानसिक आराेग्य चांगले रहावे, यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यात येते़ तसेच कामाचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात़

डाॅ़ बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आराेग्य अधिकारी, बुलडाणा

काेरोना काळातही पाेलिसांचे काम सुरूच आहे़ सध्या संचारबंदीसह इतर कामांमुळे पाेलीस कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे़ पाेलिसांचा मानसिक थकवा कमी करण्यासाठी नुकतेच याेग शिबिर आयाेजित करण्यात आले हाेते़ तसेच इतरही उपक्रम राबवण्यात येतात़

अरविंद चावरिया, पाेलीस अधीक्षक, बुलडाणा

काेराेनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच असून, मृत्यूही वाढले आहेत़ डाेळ्यांसमाेर हाेत असलेले मृत्यू पाहून आराेग्य कर्मचाऱ्यांच्या मनावर परिणाम हाेत आहेत. मानसिक आराेग्य चांगले ठेवण्यासाठी आराेग्य कर्मचाऱ्यांनी व्यक्त झाले पाहिजे़ नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक विचार ठेवून काम करावे़ रुग्णांचे नातेवाईक आणि राजकारणी लाेकांनीही आराेग्य कर्मचाऱ्यांच्या भावना समजून त्यांना आधार दिला पाहिजे़ महामारीच्या काळात सेवा देणाऱ्या आराेग्य कर्मचाऱ्यांना आधार दिल्यास त्यांना आणखी बळ मिळेल़

डाॅ़ विश्वास खर्चे, मानसाेपचार तज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा

काेट

पाेलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी नुकतेच याेग शिबिर घेण्यात आले आहे़ मात्र, पोलीस ठाणे स्तरावर ही शिबिरे झाल्यास जास्त फायदा होईल. सध्या कोरोनामुळे काम वाढले असून, कुटुंबीयांना वेळही देता येत नाही, त्यामुळे मानसिक थकवा जाणवत असल्याचे पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले.

काेट

कोरोनामुळे कामाचा व्याप वाढला आहे, यामुळे कुटुंबीयांना वेळ देता येत नाही, कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी दरबार भरविला जातो. तसेच योग शिबिरे, ध्यान शिबिरेही घेतली जातात. रस्त्यावर ड्युटी करावी लागत असल्याने कुटुंबात जाताना भीती वाटते, असे एका पाेलीस कर्मचाऱ्याने सांगितले़

काेट

काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने आराेग्य कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे़ पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये काम करीत असल्याने कुटुंबीयांमध्ये जाताना भीती वाटते़ मानसिक ताण कमी करण्यासाठी उपाययाेजना करण्याची गरज आहे, असे मत एका परिचारिकेने व्यक्त केले.

सध्या आराेग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा माेठा ताण वाढला आहे़ डाेळ्यांसमाेर रुग्णांचा मृत्यू पाहणे कठीण आहे़ त्यामुळे मानसिक थकवा आला आहे़ हा थकवा दूर करण्यासाठी समुपदेशन व इतर उपक्रम राबविण्याची गरज आहे, असे मत एका डाॅक्टरांनी व्यक्त केले.