शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

‘लॉकडाऊन’मुळे हॉटेल व्यवसाय कोलमडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 12:33 IST

चहाची टपरीपासून तर आलिशान निवासी हॉटेल मालकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोनामुळे अनेक व्यवसाय डबघाईस आले असून, हॉटेल व्यवसाय गत चार महिन्यांपासून ठप्प आहे. चहाची टपरीपासून तर आलिशान निवासी हॉटेल मालकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.जिल्ह्यात हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यात चहा टपरी, नास्ता व चहा विक्री करणारे, मोठे रेस्टारंट, निवासी व्यवस्था असलेले हॉटेल, बार व रेस्टारंटसह शेकडोंच्या संख्येत आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्गावर अनेक ढाबे आहेत. हा संपूर्ण व्यवसाय पूर्णता कोसळला आहे. जिल्ह्यात लोणार हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असल्याने येथे जगभरातून पर्यटक येतात. या पर्यटकांसाठी येथे अनेक हॉटेल सुरू करण्यात आले. तसेच शेगाव येथे संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. त्यामुळे शेगावमध्ये सुद्धा अनेक हॉटेल सुरू करण्यात आले. यासोबतच खामगाव, चिखली या शहरांमध्येही अनेक मोठे हॉटेल सुरू करण्यात आले आहेत. व्यावसायिकांनी लाखोंचे कर्ज काढून हे हॉटेल सुरू केले आहेत. मात्र, गत चार महिन्यांपासून जिल्ह्यातील हॉटेल व्यवसाय ठप्प आहे. मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा, एप्रिल व मे महिन्यात हॉटेल अत्यावश्यक सेवेत येत नसल्यामुळे पुर्णता बंद होते. जून व जुलै महिन्यात हॉटेल सुरू करण्यात आले असले तरी याकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. कोरोनाचा धोका असल्यामुळे सध्या नागरिक बाहेर कोणताही पदार्थ खाण्याचे टाळत आहेत. त्यामुळे जुलै महिन्यात हॉटेल सुरू करण्यात आले असले तरी ग्राहक मिळत नाहीत.हॉटेल व्यवसायामध्ये हजारोंच्या संख्येने कामगार काम करतात. खाद्य पदार्थ बनविणाºयांपासून तर वेटरपर्यंत अनेकांचे कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहे. चार महिन्यांपासून कामगार बेरोजगार झाले आहेत. हॉटेल सुरूच नसल्यामुळे मालकांनी कामगारांना वेतन देणे बंद केले आहे. सध्या दुसरीकडे कुठेच काम मिळत नसल्याने या कामगारांसमोर कुटुंबाचे पालन- पोषण कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाणीपूरी व्यवसायिकांवर उपासमारीची वेळजिल्ह्यात हजारो पाणीपूरी व्यावसायिक आहेत. या सर्वांवर कोरोनामुळे उपासमारीची पाळी आली आहे. मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा, एप्रिल व मे महिना पाणीपूरीच्या गाड्या बंद होत्या. त्यानंतर पाणीपुरीची विक्री सुरू करण्यात आली. मात्र, सध्या नागरिक बाहेरील कोणतेही खाद्य पदार्थ खात नसल्यामुळे व्यवसाय ठप्प आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावhotelहॉटेल