शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
4
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
5
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
6
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
8
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
9
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
10
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
11
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
12
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
13
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
14
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
15
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
16
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
17
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
18
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
19
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
20
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?

हॉटेलबंदीने हिरावला महिलांचा रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व हॉटेल महिनाभर बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व हॉटेल महिनाभर बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील हॉटेलमध्ये पोळी, भाकरी करण्यासाठी काम करत असलेल्या महिलांचा रोजगार हिरावला गेला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या नावाखाली शासनाने घेतलेला निर्णय या महिलांसाठी मारक ठरणार असल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षी तीन महिन्यांच्या प्रदीर्घ लॉकडाऊननंतर शासनाने अनलॉक प्रक्रियेअंतर्गत टप्प्याटप्प्याने सर्व उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे सर्व व्यवसाय व एकंदरीतच अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली होती. परंतु, निर्बंध कमी केल्याने नागरिकांनी बिनधास्त व बेफिकिरीने वागण्यास सुरुवात केली. नियमांचे पालन न केल्याने गेल्या महिनाभरापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. यामुळे राज्य शासनाने सुरुवातीला अंशत: लॉकडाऊन लागू केले. जिल्ह्यातही याप्रमाणे निर्बंध लावण्यात आले. तरीदेखील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात न आल्याने आता शासनाने पुन्हा कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये शनिवार रविवारच्या कडक लॉकडाऊनसह राज्यभरातील सर्व हॉटेल महिनाभर बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने ५ एप्रिल रोजी घेतला.

महिनाभर हॉटेल बंद राहणार असल्याने हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होणार आहे. यासोबतच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांचाही रोजगार बंद होणार आहे. शहरातील जवळपास सर्वच हॉटेलमध्ये पदार्थ बनविण्यासाठी कूक असले तरी पोळ्या व भाकरी बनविण्यासाठी महिला काम करतात. काही ठिकाणी घरी पोळी व भाकरी बनवून हॉटेलमध्ये पुरविण्यात येतात. या माध्यमातून महिलांना उदरनिर्वाह भागविण्याइतपत जेमतेम रोजगार मिळतो. मात्र आता हॉटेल बंद राहणार असल्याने उदरनिर्वाह कसा भागवायचा असा प्रश्न या महिलांसमोर निर्माण झाला आहे.

.........चौकट.............

जिल्ह्यातील हॉटेल्सची संख्या : ३०० ते ३५०

हॉटेलमध्ये पोळी, भाजी बनविणाऱ्या महिलांची संख्या : ७०० ते ८५०

..........चौकट.............

भाजीपाला व्यवसायाचा घेतला आधार

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून सर्व क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. यापूर्वी देखील लॉकडाऊन कालावधीत हॉटेल बंद ठेवण्यात आले होते. यामुळे हॉटेलमध्ये पोळी, भाजी, भाकरी बनविणाऱ्या महिलांनी रोजगाराचे पर्यायी साधन शोधले होते. बहुतांश महिलांनी भाजीपाला व्यवसायाचा आधार घेऊन हॉटेल सुरू होईपर्यंत आपला उदरनिर्वाह भागविल्याचे दिसून आले. काही महिलांनी ग्रामीण भागात जाऊन शेतमजुरी केल्याचे पाहायला मिळाले.

............प्रतिक्रिया............

गेल्या वर्षी मार्च महिन्यात अचानक लॉकडाऊन लागू करण्यात आले. यामुळे हॉटेल पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याने आमच्यावर प्रचंड संकट कोसळले होते. यातून मार्ग काढत अन्य व्यवसाय शोधून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविताना चांगलीच दमछाक झाली.

-मंगला कसबे, महिला कामगार.

..............प्रतिक्रिया................

लॉकडाऊन कालावधीत आम्ही काढलेल्या दिवसांची आठवण झाली की अंगावर काटा उभा राहतो. कारण अचानक रोजगार बंद होणे अनपेक्षित होते. मात्र चरितार्थ चालविण्यासाठी जवळपासच्या गावातील शेतांमध्ये मजुरी करून उदरनिर्वाह भागविला.

-जनाबाई घोलप, महिला कामगार.

...........प्रतिक्रिया...............

घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने हॉटेलमध्ये पोळ्या करून कुटुंबाला हातभार लावते. मात्र आता महिनाभर हॉटेल बंद राहणार आहेत. यामुळे मागील वेळेप्रमाणे आतादेखील भाजीपाला व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही.

- शारदा भटकर, महिला कामगार.

.......................................