मेहकर (बुलडाणा): सन २0१४ च्या खरीप हंगामामध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नुकसानाच्या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातील बागायती व फळबागांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना वगळण्यात आले आहे. दरम्यान, बागायती व फळबागाच्या नुकसानग्रस्त शेतकर्यांची नावे मदतीच्या यादीत घ्यावी, अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव व आ. डॉ. संजय रायमूलकर यांनी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे स्थानिक विश्रामगृहावर १४ जानेवारी रोजी केली आहे.शासनाकडून नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करुन मदतीच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत; परंतु या सर्वेक्षणामधून बागायती व फळबागांचे जे नुकसान झाले, त्या शेतकर्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा सर्वेक्षण करुन त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख धीरज लिंगाडे, सुरेश वाळूकर, पं.स. सभापती सागर पाटील, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, जि.प. सदस्य स्वातीताई शिंगणे, डॉ. प्रकाश माळेकर, बबनराव भोसले, दिलीपबापू देशमुख, नंदूभाऊ मापारी, प्रा. सचिन जाधव आदी उपस्थित होते.
नुकसानग्रस्तांच्या यादीत बागायती व फळबाग शेतक-यांचा समावेश करावा
By admin | Updated: January 15, 2015 00:42 IST