शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

घरगुती भोजनालये निरंकूश

By admin | Updated: November 17, 2016 17:09 IST

सभोवतालच्या खेड्यापाड्यातून हजारो विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी दाखल होतात. या विद्यार्थ्यांना भाडेतत्त्वावर खोली करून राहावे लागते

नीलेश शहाकार बुलडाणा, दि. 17 : सभोवतालच्या खेड्यापाड्यातून हजारो विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी दाखल होतात. या विद्यार्थ्यांना भाडेतत्त्वावर खोली करून राहावे लागते. शिवाय खासगी भोजनालयामध्ये जेवणाची व्यवस्था करावी लागते़ या खासगी भोजनालयांना कुठलाही परवाना लागत नसल्याने सध्या शहरात त्यांची संख्या वाढली आहे. एकीकडे संख्या वाढत असली तरी गुणवत्ता खालावत असल्याने  या  भोजनालयातील जेवण खरंच सुरक्षित आहे का? हा प्रश्नच आहे. शहरात कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालये, तांत्रिक महाविद्यालये, कृषी विद्यालय यासह अन्य क्षेत्रातील अभ्यासक्रमांच्या संस्था सुरु झाल्याआहेत. विविध विषयाचे शिक्षण घेण्याकरीता खेड्यापाड्यातून अनेक विद्यार्थी शहरात येतात. शहरात  विद्यार्थ्यांचा लोंढा येत असल्याचे हेरुन अनेकांनी आपल्या घरीच खानावळी उघडल्या आहेत. काही खानावळींमध्ये विद्यार्थ्यांना तेथेच जेवण दिले जाते, तर काहींद्वारे डबे पोहचविल्या जातात.

या डब्यांमध्ये दिले जाणारे अन्न उशीरा खाल्ले जात असल्याने ते कितपत आरोग्यदायी आहे  यांची शंका अनेकदा उपस्थित होते.  शहरातील बहुतांश भोजनालयांना कुठल्याही प्रकाराचा परवाना नाही. त्यामुळे तेथे निकृष्ठ दर्जाचे जेवण मिळत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. विशेष म्हणजे या जेवणातून कोणाला विषबाधा झाली तर भोजनालयावर कुठलीकारवाई करावी, कोणता दंड आकारावा याची महिती मात्र स्थानिक अन्न व औषध प्रशासनाला नाही. हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कुठलेही निर्बंध नसल्यामुळे अशा भोजनालयांचा व्यवसाय सध्या चांगलाच भरभराटीला आला आहे.  शहरातीलरस्त्यांवरही अनेक हातगाड्यांवरही भोजन मिळु लागले आहे. यामध्ये मांसाहरी भोजनाचे प्रमाण अधीक आहे मात्र याकडेही अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष नाही.नियम केवळ कागदावरचअन्न व औषध प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुलडाण्यात २५ परवानाधारक हॉटेल रेस्टारेंट आहेत. तर नगर परिषदेकडे नोंद असलेल्या शहरातील उपहारगृहाची संख्या ७० तर चहाटपरींची संख्या दिडशेच्या जवळपास आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने हॉटेल व उपहारगृहांना परवाने देतांना काही नियम लागू केले आहेत. त्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असून याकडे दुर्लक्ष करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करुन हॉटेल व उपहारगृहाचा परवाना रद्द करण्यात येतो.कायदा काय म्हणतो..खाजगी खानावळ, उपहारगृह, हॉटेल मध्ये नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास त्यांच्यावर नगर परिषद अधिनियम १९६५ च्या कलम २७४, २७५ नुसार कारवाई करण्याची तरतुद आहे. इंडियन पिनल कोडच्या कलम ७२ व ७३ नुसार खराब मिठाई व मानवी शरिरास अपायकारक असणाऱ्या पदार्थांची विक्री करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.