शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

घरगुती कलह ‘संवादा’तूनच मिटवा! -  लक्ष्मण मानकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 15:31 IST

समाज एकसंघ ठेवण्यासाठी तसेच नात्यातील ओलावा कायम ठेवण्यासाठी घरगुती कलह ‘संवादा’तूनच मिटवा, असा सल्ला राज्य महिला आयोग मुंबईचे वरिष्ठ समुपदेश लक्ष्मण मानकर यांनी केले.

- अनिल गवई

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : समाजात प्रेम, विश्वास आणि आदर ही त्रयीचा झपाट्याने ºहास होत असल्याने, घरगुती कलह वाढीस लागलेत. वाढत्या कलहांमुळे नात्यातील दरी वाढत आहे. समाज एकसंघ ठेवण्यासाठी तसेच नात्यातील ओलावा कायम ठेवण्यासाठी घरगुती कलह ‘संवादा’तूनच मिटवा, असा सल्ला राज्य महिला आयोग मुंबईचे वरिष्ठ समुपदेश लक्ष्मण मानकर यांनी केले. शेगाव तालुक्यातील जलंब येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी आले असता, त्यांनी ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला.

प्रश्न: महिलांना न्याय देण्यासाठी महिला आयोगाची भूमिका काय?

उत्तर: आधुनिक काळात राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात हिमतीने पुढे येणाºया महिलांसह अर्थाजनासाठी घराबाहेर पडणाºया महिलांना न्याय देण्यासाठी महिला आयोग अतिशय सकारात्मक पद्धतीने कार्यरत आहे. समुपदेशनाच्या माध्यमातून महिला आयोगाने आजपर्यंत हजारो महिलांच्या समस्या सोडविल्या आहेत. त्यांना न्याय मिळवून दिला आहे.

प्रश्न: अन्यायग्रस्त महिलांना मदत मिळवून देण्यासाठी आयोगाचे प्रयत्न तोकडे ठरताहेत का?

उत्तर: अजिबात नाही, महिलांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठीच महिला आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध कार्यशाळा आणि शिबिराच्या माध्यमातून महिलांचे समुपदेशन केले जाते. पोस्को आणि सरोगसी सारख्या महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी औरंगाबाद, नागपूर, नाशिक येथेही कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत.

प्रश्न: वाढत्या घरगुती कलहामुळे समाज व्यवस्था धोक्यात आली आहे का?

उत्तर: निश्चितच, समाजातील प्रेम, विश्वास आणि आदर नाहीसा झाल्याचे विपरित परिणाम समाजव्यवस्थेवर जाणवत आहेत. संवाद नाहीसा झाल्यामुळं कुटुंब व्यवस्थाही धोक्यात आली आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. समाजातील काही वाईट प्रवृत्तीमुळे स्त्री आणि पुरूष दोघेही बदनाम होत आहेत.

प्रश्न: व्यक्ती स्वातंत्र्यामुळे समाजातील अडचणी वाढीस लागल्यात का?

उत्तर: निश्चित नाही, पूर्वीच्या काळी समसत्ताक पध्दती अस्तित्वात होती. महिलांच्या नावाने राज्यांची तसेच राजाची ओळख होती. मात्र, आजच्या आधुनिक काळात स्त्रीला कमी लेखल्या जात आहे. तिला कळसुत्री बाहुलं म्हणून पाहील जात असल्यामुळे समाजातील अडचणी वाढल्या आहेत. कोणतीही स्त्री दुखावल्या गेल्याशिवाय कुणाचेही अहीत करीत नाही, हा आपला दावा आहे.

प्रश्न: कौटुंबिक हिंसाचार कायद्यामुळे पुरूषांना वेठीस धरल्या जातेय का?

उत्तर: अजिबात नाही, भारतातील कायदे हे कोणत्याही स्त्री अथवा पुरूषां विरोधात नाहीत. तर समाजातील वाईट प्रवृत्ती विरोधात आहेत. वाईट प्रवृत्ती या स्त्री आणि पुरूषांमध्ये दोघांमध्येही असू शकतात. त्यामुळे पुरूषांना वेठीस धरण्याचा प्रश्न उद्भवतो तरी कोठे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

प्रश्न : कामाच्या ठिकाणी लैगिंक छळग्रस्त महिलांना आयोगाच्या आधाराची शाश्वती काय?

उत्तर : कामाच्या ठिकाणी होणाºया लैगिंक छळाविरूध्द प्रतिबंध, संरक्षण देण्यासाठी कायद्यानुसार सरकारी, निमसरकारी, आणि खासगी संस्था, मनोरंजनाची आणि खेळाची ठिकाणं, शैक्षणिक संकुल आदी ठिकाणी तक्रार निवारण समिती स्थापन करणे अनिवार्य करण्यात आले. कायद्यानुसार महिलांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले यामध्ये महिला आयोगाची भूमिका निश्चितच महत्वाची आहे.

प्रश्न: समाजासाठी आपला संदेश काय?

उत्तर: दृष्टीकोन बदलत नाही, तोपर्यंत सुख नाही. समाधान हे मानावं लागतं. कोणत्याही वादाला शेवट आहे. त्यामुळे कोणताही वाद आधी संवादातून, नंतर चर्चा आणि समुपदेशनातून सोडवा. अपवादात्मक स्थितीतच न्यायालयाची पायरी चढा! हाच संदेश आपला ‘लोकमत’च्या माध्यमातून समाजाला राहील!

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत