शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
2
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
3
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
4
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
5
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
6
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
7
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
8
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
9
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
10
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
11
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!
12
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!
13
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या कथित लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे
15
ग्रीन टी, ब्लॅक टी सोडा... आता 'बनाना टी' एकदा प्या; स्ट्रेसला कराल बाय-बाय, हाडं होतील मजबूत
16
Stock Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; Sensex १७० अंकांची घसरण, FMCG Stocks मध्ये मोठी खरेदी
17
ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र...
18
ऑनलाईन गेममध्ये पैसे जिंकले, पार्टीसाठी बाहेर पडले अन्...; ५ तरुणांसोबत घडलं आक्रित
19
"तिने आमचं घर तोडलं असं लोक म्हणाले, पण...", RJ महावशसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला युजवेंद्र चहल
20
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन

अरे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:04 IST

तालुक्यातील अमडापूर येथील संतप्त शेतकर्‍यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ असा सवाल केला आहे. त्यामुळे भाजपावर त्यांचेच अस्त्न उलटल्याचे दिसते.

ठळक मुद्दे अमडापूर येथे संतप्त शेतकर्‍यांनी लावले फलक 

सुधीर चेके पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: गत विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान भारतीय  जनता पार्टीने ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ या ‘कॅचलाइन’चा प्रभावीपणे वापर करून राज्याची सत्ता मिळविली. हीच ‘कॅचलाइन’आता भाजपासाठी ‘बुमरँग’ ठरत असून, भाजपा सरकारने शेतकर्‍यांना दिलेल्या आश्‍वासनांचा पडलेला विसर आणि शेतकर्‍यांसमोरील अनंत अडचणी, या पृष्ठभूमीवर तालुक्यातील अमडापूर येथील संतप्त शेतकर्‍यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ असा सवाल केला आहे. त्यामुळे भाजपावर त्यांचेच अस्त्न उलटल्याचे दिसते.राज्यात भाजपाच्या फडणवीस सरकारला सत्तेत येऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या तीन वर्षात भाजपाने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळण्याऐवजी शेतकर्‍यांपुढील समस्या दिवसागणिक वाढत असल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव्र रोष असून, हाच रोष व्यक्त करण्यासाठी तालुक्यातील अमडापूर येथील समाधान खेन्ते व अरुण पद्मने या दोन शेतकर्‍यांनी बसस्थानक परिसरात ‘अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असे बॅनर लावून भाजपाला जाब विचारत आहेत. सोयाबीन, कापूस, तुरीसह इतर कडधान्याचे १0 वर्षांपूर्वीचे भाव दिल्याबद्दल तसेच शेतकर्‍यांचा माल बाजारपेठेत येण्याअगोदर विदेशातून माल बाजारपेठेत आणून शेतकर्‍यांच्या मालाचे भाव पाडल्याबद्दल, शेतकर्‍यांनी ३ वर्षात जीडीपी १२ टक्के केला; परंतु तुम्ही शेतकर्‍यांचा जीडीपी 0 टक्के केला, जगाच्या पोशिंद्याला चुकीचे धोरण राबवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, शेतकरीविषयक चुकीचे धोरण राबवून एक पिढी बरबाद केली आणि तत्त्वत: १00 टक्के फसवी कर्जमाफी दिल्याबद्दल भाजपा सरकारचे उपहासात्मक अभिनंदन या बॅनरद्वारे या शेतकर्‍यांनी केले आहे. मध्यंतरी सोशल मीडियावरदेखील भाजपला शेतकरी व इतर मुद्यांवरून लक्ष्य करीत याच कॅचलाइनद्वारे प्रश्न उपस्थित केल्या जात होते. त्यात आता शेतकर्‍यांनी बॅनर लावून थेट सरकारला  जाब विचारण्यासह ‘१0 वष्रे मागे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा !’ असे नमूद करून आपला रोष व्यक्त केल्याने हा विषय सध्या सर्वत्र चर्चेचा ठरला आहे. 

‘होय मी लाभार्थी.’चीही खिल्लीभाजपच्या ‘कुठे नेऊन ठेवला..’ प्रमाणेच सध्याच्या ‘होय मी लाभार्थी’ या जाहिरातीवरूनही अमडापूर येथील शेतकर्‍यांनी सरकारवर टीका करताना ‘होय मी लाभार्थी, चुकीच्या धोरणांचे, हे माझं सरकार.’ असे नमूद करून सरकारवर सडकून टीका केली आहे. याशिवाय सोशल मीडियावरदेखील सध्या ‘होय मी लाभार्थी’च्या ‘जोक्स’ने अक्षरश: धुमाकूळ घातलेला आहे.  

टॅग्स :State Governmentराज्य सरकारchikhali roadचिखली रोड