बुलडाणा : दुष्काळात सापडलेल्या शेतकर्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या मदतीमधील ११९ कोटी ७४ लाखाचा निधी १0 जोनवारीला जिल्ह्याला प्राप्त झाला होता. गेल्या सतरा दिवसात यापैकी ७६ टक्के निधी शेतकर्यांना वाटप करण्यात आला असून, त्याचा लाभ १ लाख ९७ हजार ९0२ शेतकर्यांना मिळाला आहे.जिल्ह्याला मिळालेला निधी जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी तत्काळ त्याच दिवशी तालुकास्तरावर वितरित केला असून, ही मदत संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आतापर्यंंत ९२ कोटीचा निधी वितरित झाला आहे. यामध्ये संग्रामपूर व जळगाव जामोद या दोन तालुक्यातील निधी वाटपाची गती संथ आहे. संग्रामपूरला मिळालेल्या ७ कोटी ७४ लाख रकमेपैकी फक्त २ कोटी ८९ लाखाचे वाटप झाले असून, ही टक्केवारी केवळ ३७ टक्के आहे, तर जळगावमध्ये २ कोटी ८४ लाख म्हणजेच ४0 टक्के वाटप झाले आहे. जिल्ह्यात ५ लाख ४८ हजार ६६७ लाख शेतकर्यांना या दुष्काळाचा फटका बसला असून, एकूण २८७ कोटी ९४ लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. शेतकर्यांच्या खात्यामध्ये तत्काळ मदत जमा करण्याचा प्रयत्न महसूल विभागाने केला असून येत्या ३0 जानेवारीपर्यंत संपूर्ण निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल, असा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी सांगीतले. *बुलडाणा, मेहकर, चिखली अव्वलदुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाने घोषित केलेली मदत तत्काळ शेतकर्यांपयर्ंत पोहोचविण्यासाठी बुलडाणा,चिखली व मेहकर तहसील कार्यालयांनी तत्परता दाखविली आहे. या कार्यालयांना मिळालेल्या निधी पैकी ९९ टक्के निधी २७ जानेवारीपर्यंंत वितरितही करण्यात आला आहे. ज्या शेतकर्यांचे खाते उपलब्ध होते त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात आला असून, या तीनही तालुक्यातील केवळ एक ते दीड टक्केच निधी वाटप होणे बाकी आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील दोन लाख शेतक-यांना मदत
By admin | Updated: January 28, 2015 00:13 IST