शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

संततधार पावसाचा जिल्ह्याला तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:41 IST

जिल्ह्यात ६ सप्टेंबरच्या रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली होती. मध्यरात्रीदरम्यान जोरदार बरसणारा पाऊस ७ सप्टेंबरला सकाळी ९ वाजेपर्यंत बरसत होता. ...

जिल्ह्यात ६ सप्टेंबरच्या रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली होती. मध्यरात्रीदरम्यान जोरदार बरसणारा पाऊस ७ सप्टेंबरला सकाळी ९ वाजेपर्यंत बरसत होता. दरम्यान, खामगाव, पिंपळगाव राजा, हिरवखेड, काळेगाव, वरवंड, लोणी, जवळा या सात मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. ९५ ते ६७ मिमी दरम्यान या मंडळांमध्ये पाऊस बरसला आहे. बुलडाणा तालुक्यात पैनगंगा नदी उगमस्थानापासूनच दुथडी भरून वाहत आहे. प्रारंभाला नदीचे पात्र छोटे असल्याने, नदीकाठच्या शेतात पाणी घुसल्याने मढ, दहीद, पाडळी, पळसखेड नागोसह परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतातील उभी पिके या पावसामुळे खरडली आहे. दुसरीकडे पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी बुलडाण्याचे आ.संजय गायकवाड यांनी लगोलग सुरू केली. काही ठिकाणी त्यांनी मदत कार्यही केले. सोबतच प्रशासकीय यंत्रणेला या आपत्कालीन परिस्थितीत त्वरेने मदत कार्य करण्याचे त्यांनी सूचित केले. नळकुंडसह मोताळा तालुक्यातील ज्या भागात नुकसान झाले, तेथेही त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आर्थिक मदतीसह अन्नधान्य दिले आहे.

--१८ कुटुंबे स्थलांतरित--

या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्याने, नदी काठची १८ कुटुंबे स्थलांतरित करावी लागली आहे. या कुटुंबामध्ये जवळपास १०५ व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये मोताळा तालुक्यातील अंत्री येथील १२ कुटुंबे, बुलडाणा तालुक्यातील एक आणि खामगाव तालुक्यातील पाच कुटुंबांचा समावेश आहे. सोबतच बुलडाणा, खामगाव आणि मोताळा तालुक्यातील ३२७ घरांची पडझड झाली असून, त्या जीवितहानी झाली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

--दोघांचा मृत्यू--

या पावसामुळे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या जवळा पळसखेड येथील आदित्य संतोष गवई याचा मृतदेह सापडला असून, त्याचे पार्थिव शेगाव येथील सईबाईमोटे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, नांदुरा तालुक्यातील पातोंडा येथील नितीन गव्हाडे हाही पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेला आहे. त्याचाही शोध सध्या बचाव पथक घेत आहे.

--१,३२५ हेक्टवरील नुकसान--

नुकसानीचा आकडा मोठा असला, तरी प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार १ हजार ३२५ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, मका, तूर व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, नुकसानाच्या सर्वेक्षणाचे निर्देश देण्याची मागणीही होत आहे.

--सात गुरे ठार--

पावसादरम्यान मासरूळ येथे पांडुरंग तोताराम सावळे यांच्या गायीचा वीज पडून मृत्यू झाला, तर जिल्ह्यात एकूण ७ मोठ्या गुरांचा मृत्यू झाला आहे. नुकसानीसंदर्भातील माहितीही आपत्ती व्यवस्थापन विभाग, महसूल विभाग व कृषी विभाग सध्या संकलित करत आहे.