शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

जाेरदार पावसाने जमिनी खरडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:23 IST

किनगाव जट्टू : परिसरात रविवारी सायंकाळी जाेरदार पाऊस झाला़ त्यामुळे परिसरातील नदी-नाल्यांना पूर आला हाेता़ पुराचे पाणी अनेक ...

किनगाव जट्टू : परिसरात रविवारी सायंकाळी जाेरदार पाऊस झाला़ त्यामुळे परिसरातील नदी-नाल्यांना पूर आला हाेता़ पुराचे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने जमीन खरडून गेली आहे़ त्यामुळे, अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट ओढवले आहे़ शासनाने नुकसानीचे सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़

किनगाव जट्टू परिसरात यावर्षी अत्यल्प पावसात व हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली हाेती़ मात्र, गत आठवड्यात कडक ऊन पडल्याने पेरण्या खाेळंबल्या हाेत्या़ अनेक शेतकऱ्यांचे बियाणे पावसाअभावी उगवलेच नाही़ रविवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह एक ते दीड तास जाेरदार पाऊस झाला़ त्यामुळे गावाशेजारील नारळी नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत हाेते़ त्यामुळे शेतात गेलेल्या मजुरांना ताटकळत थांबावे लागले़

पेरणी केलेल्या शेताला तलावाचे स्वरूप

रशीद खान पठाण यांच्या ताब्यात असलेल्या दोन एकर सोयाबीन पेरलेल्या शेतात पावसाचे पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप निर्माण झाले होते़ काही शेतकऱ्यांच्या शेतात शेतशिवारातील नाल्याचे पाणी गेल्याने जमिनी खरडल्या आहेत. तीन दिवसांअगोदर पेरणी केलेल्या शेतात पावसाचे पाणी साचल्याने बियाणे जमिनीत खाेलवर पडले आहे़ त्यामुळे दुबार पेरणीशिवाय दुसरा पर्याय नाही़

यापूर्वीही झाले आहे नुकसान

अगोदरच परिसरात कोरोनाचे संकट आहे़ गतवर्षी अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली़ सोंगणीच्या

वेळी अतिवृष्टीमुळे उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने पेरणीला लागलेला खर्चही वसूल झाला नाही़ या संकटातून सावरत शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने यावर्षी पेरण्या सुरू केल्या हाेत्या़ तोच पुन्हा दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे़

मदत देण्याची मागणी

परिसरातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे अहवाल पाठवावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी तहसीलदार लोणार यांच्याकडे केली आहे.