शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

जाेरदार पावसाने जमिनी खरडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:23 IST

किनगाव जट्टू : परिसरात रविवारी सायंकाळी जाेरदार पाऊस झाला़ त्यामुळे परिसरातील नदी-नाल्यांना पूर आला हाेता़ पुराचे पाणी अनेक ...

किनगाव जट्टू : परिसरात रविवारी सायंकाळी जाेरदार पाऊस झाला़ त्यामुळे परिसरातील नदी-नाल्यांना पूर आला हाेता़ पुराचे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने जमीन खरडून गेली आहे़ त्यामुळे, अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट ओढवले आहे़ शासनाने नुकसानीचे सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़

किनगाव जट्टू परिसरात यावर्षी अत्यल्प पावसात व हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली हाेती़ मात्र, गत आठवड्यात कडक ऊन पडल्याने पेरण्या खाेळंबल्या हाेत्या़ अनेक शेतकऱ्यांचे बियाणे पावसाअभावी उगवलेच नाही़ रविवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह एक ते दीड तास जाेरदार पाऊस झाला़ त्यामुळे गावाशेजारील नारळी नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत हाेते़ त्यामुळे शेतात गेलेल्या मजुरांना ताटकळत थांबावे लागले़

पेरणी केलेल्या शेताला तलावाचे स्वरूप

रशीद खान पठाण यांच्या ताब्यात असलेल्या दोन एकर सोयाबीन पेरलेल्या शेतात पावसाचे पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप निर्माण झाले होते़ काही शेतकऱ्यांच्या शेतात शेतशिवारातील नाल्याचे पाणी गेल्याने जमिनी खरडल्या आहेत. तीन दिवसांअगोदर पेरणी केलेल्या शेतात पावसाचे पाणी साचल्याने बियाणे जमिनीत खाेलवर पडले आहे़ त्यामुळे दुबार पेरणीशिवाय दुसरा पर्याय नाही़

यापूर्वीही झाले आहे नुकसान

अगोदरच परिसरात कोरोनाचे संकट आहे़ गतवर्षी अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली़ सोंगणीच्या

वेळी अतिवृष्टीमुळे उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने पेरणीला लागलेला खर्चही वसूल झाला नाही़ या संकटातून सावरत शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने यावर्षी पेरण्या सुरू केल्या हाेत्या़ तोच पुन्हा दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे़

मदत देण्याची मागणी

परिसरातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे अहवाल पाठवावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी तहसीलदार लोणार यांच्याकडे केली आहे.