शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लोणवाडी परिसरात मुसळधार, ११ जनावरे दगावली

By सदानंद सिरसाट | Updated: September 24, 2023 16:20 IST

गावातील नदीकाठावर बांधलेल्या ११ मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला. त्यामध्ये गायी, म्हशी, बैलांचा समावेश आहे.

लोणवाडी, नांदुरा (जि. बुलढाणा) : नांदुरा तालुक्यातील लोणवाडी परिसरात शनिवारी मध्यरात्रीपासून पहाटे सहा वाजेपर्यंत ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस पडल्याने गावातील नदीला आलेल्या पुरात काठावर बांधलेल्या ११ जनावरांचा मृत्यू झाला आहे, तसेच तीन वगार पाण्यात वाहून गेल्या आहेत. नदीवर असलेला लघुसिंचन प्रकल्प अंदाजे ६० टक्के भरला आहे.

परिसरात शनिवारी मध्यरात्री १२ वाजेनंतर सकाळी सहा वाजेपर्यंत संततधार ढगफुटीसदृश पाऊस पडला. त्यामुळे नदीला पूर आला. त्यात शेती खरडून गेली. तर गावातील नदीकाठावर बांधलेल्या ११ मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला. त्यामध्ये गायी, म्हशी, बैलांचा समावेश आहे. पशुपालक पंजाबराव सोळंके, भीमराव सोळंके, अवचित सोळंके, शत्रगुण सोळंके यांचे नुकसान झाले आहे, तसेच गोठ्यात असलेल्या तीन लहान वगारा पाण्यात वाहून गेल्या आहेत. त्या अद्याप सापडलेल्या नाहीत.

लघुसिंचन प्रकल्पाचा कालवा ओसंडून वाहिल्याने शेती खरडून गेली. त्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले. तसेच लोणवाडी लघु प्रकल्पाच्या वर असलेल्या खडतगावात सुद्धा पावसाचे पाणी घुसले. काहींच्या घरातील अन्नधान्याचे नुकसान झाले. मलकापूर मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांनी तात्काळ भेट देऊन मृत गुराढोरांची पाहणी केली. विभागाला पंचनामा करण्याचा आदेश दिला. यावेळी तहसीलचे कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणा