शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
3
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
4
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
5
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
6
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
7
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
8
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
9
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
10
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
11
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
12
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
13
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
14
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
15
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
16
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
17
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
18
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
19
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
20
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 

मुल्यवर्धन कार्यक्रमाचा मुख्याध्यापकांनाच विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 15:22 IST

खामगाव तालुक्यासह जिल्हयातील अनेक शाळांमध्ये या उपक्रमाबाबत मुख्याध्यापक अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जिल्ह्यातील नगर परिषद व जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा बुध्दयांक नाहीतर भावनिक बुध्द्यांक सुद्धा वृद्धींगत व्हावा यासाठी १ सप्टेंबरपासून मुल्यवर्धन कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र अद्याप खामगाव तालुक्यासह जिल्हयातील अनेक शाळांमध्ये या उपक्रमाबाबत मुख्याध्यापक अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. यामुळे शासनाच्या अभिनव उपक्रमाला हरताळ फासल्याचे दिसून येते.राज्यातील ४० हजार प्राथमिक शाळांमध्ये मुल्यवर्धन कार्यक्रम राबविण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. १ सप्टेबर पासून या उपक्रमाची अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत मुख्याध्यापकांपर्यंत पोहचले नाहीत. यामुळे मुख्याध्यापकांना मुल्यवर्धन कार्यक्रमाचा विसर पडला आहे.विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात घटनात्मक मुल्ये रूजावीत, यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.

दृष्टीक्षेपात मुल्यवर्धन कार्यक्रमविद्यार्थ्यांमधील रचनावादी दृष्टीकोण विकसीत करण्यावर भर देण्यात येत असून यामध्ये पालक आणि शिक्षकांचा अधिकाधिक समावेश यात करण्यात आला आहे. शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनने प्राथमिक शिक्षकांना मुल्यवर्धन कार्यक्रमाचे प्रशिक्षण दिले आहे. तरीसुद्धा हा उपक्रम अद्याप जिल्हयात राबविण्यास सुरवात झाली नसल्याचे दिसून येत आहे.

भावनिक बुध्द्यांक वाढवण्यावर भरविद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असतांना विद्यार्थ्यांचा फक्त बुध्द्यांक नाही तर भावनिक बुध्द्यांक वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यातील ३६ जिल्हयात २१५ तालुक्यातील ४० हजार २३१ शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.मुल्यवर्धन कार्यक्रमाची माहिती तालुक्यातील सर्व नगरपरिषद व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना दिली आहे. ज्या ठिकाणी उपक्रम राबविणे सुरु झाले नसेल अशा मुख्याध्यापकांना उपक्रम राबविण्यासंदर्भात आदेशीत करण्यात येईल.- गजानन गायकवाड,गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, खामगाव.

 

 

टॅग्स :khamgaonखामगावEducation Sectorशिक्षण क्षेत्र