शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

घाटाखाली ८८ गावांमध्ये गारपिट, हजारो हेक्टरवील पिके नष्ट

By सदानंद सिरसाट | Updated: March 19, 2023 21:08 IST

खामगाव, मलकापूर, संग्रामपूर, जळगाव तालुक्यात पिकांचे नुकसान

सदानंद सिरसाट, खामगाव, बुलढाणा: गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ््याने थैमान घातले आहे. शनिवारी दिवस आणि रात्री पडलेल्या पावसाचा पिकांना चांगलाच फटका बसला आहे. घाटाखालील चार तालुक्यातील ८८ गावातील २१०८ हेक्टरवरील गहू, हरभरा, कांदा, फळ, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात मलकापूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. मलकापूर तालुक्यातील ३१ गावातील १३५८ हेक्टर क्षेत्र अवकाळी पाऊस व गारपीटीने बाधित झाले. त्यापाठोपाठ खामगाव तालुक्यातील २५ गावातील ४६९ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले.

जळगाव जामोद तालुक्यातील ११ आणि संग्रामपूर तालुक्यातील २१ गावांत अनुक्रमे १४६ आणि १३५ हेक्टरमधील गहू , हरबरा, आंबा, कांदा या पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने प्राथमिक अहवालात व्यक्त केला आहे. सोबतच मेहकर तालुक्यातील ३ गावातील २२२ हेक्टर, चिखली तालुक्यातील ५ गावांतील ४१ हेक्टरील पिकांचे नुकसान झाले आहे.

खामगाव तालुक्यातील चिंचपूर, लाखनवाडा, पिंप्री (कोरडे), काळेगाव, कोंटी या गावांना गारपिटीचा फटका बसला. गारपिटीमुळे शेतातील पीक जमीनदोस्त झाली. फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर बोरी- अडगाव, शहापूर आंबेटाकळी, बोथाकाजी, पळशी या परिसरात १८ मार्च रोजी मध्यरात्री तसेच रविवारी दुपारनंतरही अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले. गहू ,कांदा ,हरभरा, मका, संत्री, यासह इतर पिकांचे नुकसान झाले. मागील वर्षी पावसाळा पुरेसा झाल्याने धरण, विहिरीना पुरेसे पाणी उपलब्ध आहे. याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी व रब्बी पिकांची पेरणी केली होती. त्यानंतर गहू, हरभरा हे पिके काढणीला आले. मात्र, आता हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेते की काय, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा