शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

घाटाखाली ८८ गावांमध्ये गारपिट, हजारो हेक्टरवील पिके नष्ट

By सदानंद सिरसाट | Updated: March 19, 2023 21:08 IST

खामगाव, मलकापूर, संग्रामपूर, जळगाव तालुक्यात पिकांचे नुकसान

सदानंद सिरसाट, खामगाव, बुलढाणा: गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ््याने थैमान घातले आहे. शनिवारी दिवस आणि रात्री पडलेल्या पावसाचा पिकांना चांगलाच फटका बसला आहे. घाटाखालील चार तालुक्यातील ८८ गावातील २१०८ हेक्टरवरील गहू, हरभरा, कांदा, फळ, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात मलकापूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. मलकापूर तालुक्यातील ३१ गावातील १३५८ हेक्टर क्षेत्र अवकाळी पाऊस व गारपीटीने बाधित झाले. त्यापाठोपाठ खामगाव तालुक्यातील २५ गावातील ४६९ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले.

जळगाव जामोद तालुक्यातील ११ आणि संग्रामपूर तालुक्यातील २१ गावांत अनुक्रमे १४६ आणि १३५ हेक्टरमधील गहू , हरबरा, आंबा, कांदा या पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने प्राथमिक अहवालात व्यक्त केला आहे. सोबतच मेहकर तालुक्यातील ३ गावातील २२२ हेक्टर, चिखली तालुक्यातील ५ गावांतील ४१ हेक्टरील पिकांचे नुकसान झाले आहे.

खामगाव तालुक्यातील चिंचपूर, लाखनवाडा, पिंप्री (कोरडे), काळेगाव, कोंटी या गावांना गारपिटीचा फटका बसला. गारपिटीमुळे शेतातील पीक जमीनदोस्त झाली. फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर बोरी- अडगाव, शहापूर आंबेटाकळी, बोथाकाजी, पळशी या परिसरात १८ मार्च रोजी मध्यरात्री तसेच रविवारी दुपारनंतरही अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले. गहू ,कांदा ,हरभरा, मका, संत्री, यासह इतर पिकांचे नुकसान झाले. मागील वर्षी पावसाळा पुरेसा झाल्याने धरण, विहिरीना पुरेसे पाणी उपलब्ध आहे. याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी व रब्बी पिकांची पेरणी केली होती. त्यानंतर गहू, हरभरा हे पिके काढणीला आले. मात्र, आता हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेते की काय, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा