शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

गुलाबी बोंडअळीचा बुलडाणा जिल्हय़ात एक लाख शेतकर्‍यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 01:25 IST

​​​​​​​बुलडाणा:  गुलाबी बोंडअळीमुळे बुलडाणा जिल्हय़ातील १ लाख हेक्टरवरील कपाशी पिकाचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षण अहवालातून समोर आले असून, तब्बल १ लाख कापूस उत्पादक शेतकर्‍यांना याचा फटका बसला आहे. परिणामी जिल्हय़ातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना ५00 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या नुकसान भरपाईची गरज असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देजिल्हय़ाला ५00 कोटींपेक्षा अधिक नुकसान भरपाईची गरज!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  गुलाबी बोंडअळीमुळे बुलडाणा जिल्हय़ातील १ लाख हेक्टरवरील कपाशी पिकाचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षण अहवालातून समोर आले असून, तब्बल १ लाख कापूस उत्पादक शेतकर्‍यांना याचा फटका बसला आहे. परिणामी जिल्हय़ातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना ५00 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या नुकसान भरपाईची गरज असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.एक महिन्यापूसन गुलाबी बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचा सर्व्हे  प्रत्यक्ष शेतावर जाऊन करण्यात येत असून, जीओ टॅगिंगसह तांत्रिक बाबींचा सर्व्हेमध्ये समावेश असल्याने उशीर होत आहे. दहा दिवसांमध्येच हा सर्व्हे करण्याचे निर्देश यंत्रणेला होते.  जिल्हय़ातील ३५0 कृषी सहाय्यकांसह गावातील तलाठी, ग्रामसेवक, गावातील सरपंच, उपसरपंच यांच्या समक्ष हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.  एक लाख ७५ हजार ५ हेक्टरवर यावर्षी कपाशीचा पेरा झाला आहे; मात्र गुलाबी बोंडअळीमुळे  बहुतांश कपाशीचे क्षेत्र बाधित झाले आहे. काही ठिकाणी त्याची तीव्रता अधिक आहे तर काही ठिकाणी त्याची तीव्र कमी आहे. त्याच्या आधारावर येत्या काळात शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळणार आहे; मात्र त्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापन विभागातील सूत्रांनी व्यक्त केली. एक जानेवारीअखेर बुलडाणा जिल्हय़ातील  एकूण बाधित कपाशी क्षेत्रापैकी ९९ हजार ५२७.२४ हेक्टरवली सर्वेक्षण पूर्ण झाले असून, ९८ बजार ७४१ शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन कृषी विभागाने हा सर्व्हे केला आहे.

५00 कोटींच्या नुकसानाचा अंदाजबुलडाणा जिल्हय़ात आणखी काही दिवस हा सर्व्हे चालणार असून, शेतकर्‍यांचे बोंडअळीमुळे सुमारे ५00 कोटी रुपयांपेक्षाही अधिक नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागातील सूत्रांनी वर्तवला आहे. यासंदर्भातील अंतिम अहवाल अद्याप तयार झाला नसून, तो येत्या आठ दिवसात होण्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. दरम्यान, अद्याप जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांच्या संयुक्त सहीचा अहवाल तयार झालेला नाही. त्यामुळे अंतिम अहवालादरम्यान, कापसामुळे झालेल्या नुकसानाचा अंदाज बदलण्याची शक्यताही असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcottonकापूस