शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

गुलाबी बोंडअळीचा बुलडाणा जिल्हय़ात एक लाख शेतकर्‍यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 01:25 IST

​​​​​​​बुलडाणा:  गुलाबी बोंडअळीमुळे बुलडाणा जिल्हय़ातील १ लाख हेक्टरवरील कपाशी पिकाचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षण अहवालातून समोर आले असून, तब्बल १ लाख कापूस उत्पादक शेतकर्‍यांना याचा फटका बसला आहे. परिणामी जिल्हय़ातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना ५00 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या नुकसान भरपाईची गरज असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देजिल्हय़ाला ५00 कोटींपेक्षा अधिक नुकसान भरपाईची गरज!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  गुलाबी बोंडअळीमुळे बुलडाणा जिल्हय़ातील १ लाख हेक्टरवरील कपाशी पिकाचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षण अहवालातून समोर आले असून, तब्बल १ लाख कापूस उत्पादक शेतकर्‍यांना याचा फटका बसला आहे. परिणामी जिल्हय़ातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना ५00 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या नुकसान भरपाईची गरज असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.एक महिन्यापूसन गुलाबी बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचा सर्व्हे  प्रत्यक्ष शेतावर जाऊन करण्यात येत असून, जीओ टॅगिंगसह तांत्रिक बाबींचा सर्व्हेमध्ये समावेश असल्याने उशीर होत आहे. दहा दिवसांमध्येच हा सर्व्हे करण्याचे निर्देश यंत्रणेला होते.  जिल्हय़ातील ३५0 कृषी सहाय्यकांसह गावातील तलाठी, ग्रामसेवक, गावातील सरपंच, उपसरपंच यांच्या समक्ष हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.  एक लाख ७५ हजार ५ हेक्टरवर यावर्षी कपाशीचा पेरा झाला आहे; मात्र गुलाबी बोंडअळीमुळे  बहुतांश कपाशीचे क्षेत्र बाधित झाले आहे. काही ठिकाणी त्याची तीव्रता अधिक आहे तर काही ठिकाणी त्याची तीव्र कमी आहे. त्याच्या आधारावर येत्या काळात शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळणार आहे; मात्र त्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापन विभागातील सूत्रांनी व्यक्त केली. एक जानेवारीअखेर बुलडाणा जिल्हय़ातील  एकूण बाधित कपाशी क्षेत्रापैकी ९९ हजार ५२७.२४ हेक्टरवली सर्वेक्षण पूर्ण झाले असून, ९८ बजार ७४१ शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन कृषी विभागाने हा सर्व्हे केला आहे.

५00 कोटींच्या नुकसानाचा अंदाजबुलडाणा जिल्हय़ात आणखी काही दिवस हा सर्व्हे चालणार असून, शेतकर्‍यांचे बोंडअळीमुळे सुमारे ५00 कोटी रुपयांपेक्षाही अधिक नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागातील सूत्रांनी वर्तवला आहे. यासंदर्भातील अंतिम अहवाल अद्याप तयार झाला नसून, तो येत्या आठ दिवसात होण्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. दरम्यान, अद्याप जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांच्या संयुक्त सहीचा अहवाल तयार झालेला नाही. त्यामुळे अंतिम अहवालादरम्यान, कापसामुळे झालेल्या नुकसानाचा अंदाज बदलण्याची शक्यताही असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcottonकापूस