शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

मानसिक आधारासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:00 IST

शेतकर्‍यांचे मनोधैर्य वाढावे, आत्मविश्‍वास वाढावा, यासाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्यावतीने ग्रामीण भागात एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमाद्वारे शेतकर्‍यांना वैचारिक व मानसिक आधार मिळावा, यासाठी मार्गदर्शन सभा घेण्यात येत आहेत.

ठळक मुद्देमराठा सेवा संघ, संभाजी बिग्रेडचा संयुक्त उपक्रम 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : शेतकर्‍यांचे मनोधैर्य वाढावे, आत्मविश्‍वास वाढावा, यासाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्यावतीने ग्रामीण भागात एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमाद्वारे शेतकर्‍यांना वैचारिक व मानसिक आधार मिळावा, यासाठी मार्गदर्शन सभा घेण्यात येत आहेत. या उपक्रमाला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे.जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. कधी अतवृष्टी, कधी गारपीट, तर कधी पिकांवर पडणारे रोग, यामुळे दिवसेंदिवस पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. जे काही थोड्याफार प्रमाणात पिकांचे उत्पन्न होत आहे, त्या पिकांना बाजारात पाहिजे तसा भाव मिळत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकर्‍यांची आर्थिक  परिस्थिती खालावली आहे. पिकांवर होणारा खर्चही निघत नाही, तर वर्षभर होणारा खर्च, मुलींचे लग्न, सुख-दु:ख यावर होणारा खर्च शेतकर्‍यांना शेतीच्या उत्पन्नातूनच करावा लागतो. एवढा खर्च शेतीच्या उत्पन्नातून भागत नसल्याने अनेक शेतकरी नैराश्यापोटी आत्महत्येचा मार्ग अवलंबित आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये जनजागृती व्हावी, शेतकर्‍यांनी  अथवा शेतकर्‍यांच्या मुलांनी  शेतीवरच अवलंबून न राहता इतर व्यवसायाकडे  वळावे, बाजारामध्ये जे विकते, तेच शेतीत पिकवा, पारंपरिक पिके बाजूला सारून बदलत्या परिस्थितीनुसार पेरणी करा, आत्महत्या करू नका, याबाबत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्यावतीने विलास तेजनकर, अशोक तुपकर, भास्करराव छबिले, प्रा. गजानन जारे, सुभाष म्हस्के, विकास तेजनकर, अतुल शिंदे, गजानन चेके, जे.पी. धांडे आदी पदाधिकारी हे ग्रामीण भागात जाऊन शेतकर्‍यांच्या सभा घेऊन जनजागृती करीत आहेत. आतापर्यंत चायगाव, वर्दडी, वडगाव माळी, कोयाळी सास्ते, अंत्री देशमुख, साब्रा, सोनाटी, सुकळी आदी गावांमध्ये सभा घेतल्या आहेत. - 

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड