शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

मानसिक आधारासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:00 IST

शेतकर्‍यांचे मनोधैर्य वाढावे, आत्मविश्‍वास वाढावा, यासाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्यावतीने ग्रामीण भागात एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमाद्वारे शेतकर्‍यांना वैचारिक व मानसिक आधार मिळावा, यासाठी मार्गदर्शन सभा घेण्यात येत आहेत.

ठळक मुद्देमराठा सेवा संघ, संभाजी बिग्रेडचा संयुक्त उपक्रम 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : शेतकर्‍यांचे मनोधैर्य वाढावे, आत्मविश्‍वास वाढावा, यासाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्यावतीने ग्रामीण भागात एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमाद्वारे शेतकर्‍यांना वैचारिक व मानसिक आधार मिळावा, यासाठी मार्गदर्शन सभा घेण्यात येत आहेत. या उपक्रमाला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे.जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. कधी अतवृष्टी, कधी गारपीट, तर कधी पिकांवर पडणारे रोग, यामुळे दिवसेंदिवस पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. जे काही थोड्याफार प्रमाणात पिकांचे उत्पन्न होत आहे, त्या पिकांना बाजारात पाहिजे तसा भाव मिळत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकर्‍यांची आर्थिक  परिस्थिती खालावली आहे. पिकांवर होणारा खर्चही निघत नाही, तर वर्षभर होणारा खर्च, मुलींचे लग्न, सुख-दु:ख यावर होणारा खर्च शेतकर्‍यांना शेतीच्या उत्पन्नातूनच करावा लागतो. एवढा खर्च शेतीच्या उत्पन्नातून भागत नसल्याने अनेक शेतकरी नैराश्यापोटी आत्महत्येचा मार्ग अवलंबित आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये जनजागृती व्हावी, शेतकर्‍यांनी  अथवा शेतकर्‍यांच्या मुलांनी  शेतीवरच अवलंबून न राहता इतर व्यवसायाकडे  वळावे, बाजारामध्ये जे विकते, तेच शेतीत पिकवा, पारंपरिक पिके बाजूला सारून बदलत्या परिस्थितीनुसार पेरणी करा, आत्महत्या करू नका, याबाबत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्यावतीने विलास तेजनकर, अशोक तुपकर, भास्करराव छबिले, प्रा. गजानन जारे, सुभाष म्हस्के, विकास तेजनकर, अतुल शिंदे, गजानन चेके, जे.पी. धांडे आदी पदाधिकारी हे ग्रामीण भागात जाऊन शेतकर्‍यांच्या सभा घेऊन जनजागृती करीत आहेत. आतापर्यंत चायगाव, वर्दडी, वडगाव माळी, कोयाळी सास्ते, अंत्री देशमुख, साब्रा, सोनाटी, सुकळी आदी गावांमध्ये सभा घेतल्या आहेत. - 

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड