शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

‘जीएसटी’मुळे कर चोरीला आळा बसेल!

By admin | Updated: June 1, 2017 00:00 IST

लोकमत परिचर्चेतील सूर : कर प्रणालीत सुसूत्रता येईल

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : देशात लवकरच जीएसटी कर प्रणाली लागू होणार आहे. जीएसटी कर प्रणालीमुळे सुसूत्रता येणार असून, शासनाच्या महसूलमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन देशातील विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. या कर प्रणालीचा व्यापारी व सर्वसामान्य जनतेला फायदा होणार आहे, असा सूर बुधवारी जीएसटी कर प्रणालीमुळे व्यापारी, जनतेला फायदा होणार की तोटा? या विषयावर आयोजित परिचर्चेत उमटला. देशातील विविध राज्यात विविध प्रकारच्या करांमुळे सारख्या वस्तूच्या किमती कमी-जास्त दिसून येत आहेत. तर काही ठिकाणी वस्तूच्या वाहतूक खर्च लागून वस्तूच्या किमतीवर कर आकारण्यात येतो. त्यामुळे प्रत्येक राज्यात एकाच वस्तूच्या किमतीमध्ये फरक दिसून येतो. याशिवाय अनेक व्यापारी वस्तू विक्री कमी दाखवून कर चोरी करीत असल्याचे दिसून येते. त्याचा फटका शासनाला मोठ्या प्रमाणात बसतो. कर चोरीमुळे अनेकांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात फरक दिसून येतो. अशा प्रकारची कर चोरी होऊ नये, देशातील विविध राज्यात वस्तूचे भाव समान असावे, सर्वसामान्य जनतेला राज्यानुसार विविध किमती लागू करण्यात येऊ नये, तसेच शासनाच्या महसूलमध्ये भर पडावी, या उद्देशाने यूपीए सरकारच्या काळात जीएसटी कर प्रणाली लागू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावावर वेळोवेळी विविध मान्यवरांनी सुचविलेल्या सूचनांची अंमलबजावणी करून जीएसटी विधानसभेत सादर करून एक मताने मंजूर करण्यात आले. या जीएसटी कर प्रणालीमुळे एकसूत्रता येणार असून, त्याचा सर्वांना फायदा होईल, अशा प्रतिक्रिया सहभागी मान्यवरांनी व्यक्त केल्या. यापूर्वीही जनता कर भरत होती. यानंतरही जनता कर भरणार आहे. जीएसटीमुळे कर प्रणालीच्या पद्धतीत बदल झाला आहे. या कर प्रणालीमुळे जनता किंवा व्यापाऱ्यांना कोणताही फायदा किंवा तोटा होणार नाही. फक्त कर प्रणालीत बदल होईल; मात्र जे व्यापारी कर चोरी करत होते, त्या प्रकाराला आळा बसणार आहे. कर प्रणालीत सुसूत्रता आल्यामुळे एखाद्या वस्तूचे उत्पादन झाल्यास त्यांची नोंद होऊन त्याचा कर विक्रीपूर्वीच सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहे. त्यामुळे सरकारचा फायदा होईल.-नामदेवराव जाधव, शेतकरी नेते, बुलडाणा.देशातील ८० टक्के जनता टॅक्स संबंधित अज्ञानी आहे. त्यामध्ये सूत्रता नसणे हे एक कारण आहे. विविध राज्यात विविध वस्तूंवर विविध कर लावण्यात येतात. त्यामुळे करासंबंधी एकसूत्रता दिसून येत नाही. त्यामुळे वस्तूचे भाव विविध राज्यात कमी-जास्त असतात. आता मात्र जीएसटीमुळे संपूर्ण देशात एक कर प्रणाली लागू होईल. त्यामुळे कर व्यवस्था मजबूत होईल. त्यामुळे संपूर्ण देशात एकाच वस्तूवर सारख्या प्रमाणात कर घेण्यात येईल. त्याचा फायदा सामान्य नागरिक, व्यापारी वर्ग सर्वांना होईल. - दीपक गोरे, बुलडाणा.जीएसटी कर प्रणालीमुळे सरकारकडे जास्तीत जास्त कर जमा होऊन विकास कामे होतील, अशी शासनाची अपेक्षा आहे; मात्र जीएसटी कर प्रणालीची अंमलबजावणी कशी होते, यावर त्याचे यश अवलंबून आहे, तर व्यापाऱ्यांसाठी ५० लाखाचा व्यवहार असलेल्यांना प्रत्येक महिन्यात हिशेब द्यावा लागणार आहे. तर ५० लाख पेक्षा जास्त व्यवहार असलेल्या व्यापाऱ्यांना प्रत्येक आठवड्यात हिशेब द्यावा लागणार आहे. ही पद्धत कंटाळवाणी आहे. त्यामुळे सदर कर प्रणाली यशस्वी होते का ? याबाबत संशय व्यक्त होत आहे. यामध्ये बदल करणे आवश्यक आहे. - अ‍ॅड. विजय सावळे,बुलडाणा.जीएसटी कर प्रणालीचा कमी कालावधीसाठी फायदा नसला, तरी जास्त कालावधीकरिता फायदा होऊ शकतो. सदर कर प्रणाली लागू केल्यास सुरुवातीच्या तीन ते चार महिन्यापर्यंत माल उपलब्ध होणार नाही; परंतु जीएसटी कर प्रणालीत सुसूत्रता निर्माण झाल्यास त्याचा व्यापारी व सर्वसामान्य जनतेला फायदा होऊ शकतो. जीएसटी कर प्रणालीमुळे काही प्रमाणात कर चोरीला आळा बसू शकतो; मात्र वस्तू उत्पादन व वाहतूक खर्च या दोघांवर कर लागू होत असल्यामुळे वस्तूच्या किमती वाढू शकतात. यासाठी वस्तू उत्पादनावर कर लागू केल्यास वस्तूच्या किमती कमी होऊन जनतेचा फायदा होऊ शकतो.- तुषार कोठारी, व्यापारी, बुलडाणा.