शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

व्यापाऱ्यांना अधोगतीकडे नेणारी ‘जीएसटी’!

By admin | Updated: July 15, 2017 00:14 IST

व्यापारी उद्योजकांचे चर्चासत्र : अशोकराव चव्हाण यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : काँग्रेसला अभिप्रेत असणारी ही ‘जीएसटी’ नसून, केंद्र शासनाने लादलेल्या जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यापारी वर्गाला अधोगतीकडे घेऊन जाणारी ही कर प्रणाली असेल, असे प्रतिपादन खा. अशोकराव चव्हाण प्रदेश अध्यक्ष म.प्र.कॉ.क. अध्यक्ष यांनी केले.१२ जुलै रोजी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित फसवी कर्जमाफी एल्गार आंदोलनाचे निमित्ताने खा. चव्हाण बुलडाणा येथे आले होते. त्याप्रसंगी बुलडाणा अर्बन रेसिडेन्सीमध्ये आयोजित व्यापारी आयोजकांचे चर्चासत्रात त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी ना. माणिकराव ठाकरे, उपसभापती विधान परिषद, आ. राहुल बोंद्रे, अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, आ. हर्षवर्धन सपकाळ, सचिव अ.भा.काँ.क. दिलीप सानंदा, अ‍ॅड. गणेशराव पाटील, श्याम उमाळकर, विजय खडसे, म.प्र.काँ.क. विजय बाफणा, चेंबर्स आॅफ कॉमर्स अध्यक्ष, अनिल नावंदर, दीनदयाल वाधवाणी आदींची उपस्थिती होती. जिल्हाभरातून आलेल्या किराणा, कपडा, बांधकाम, मेडिकल, सोने-चांदी, सिनेमागृह, धान्य, पतसंस्था, हार्डवेअर, रेडिमेड आदी होलसेल व्यापाऱ्यांशी संवाद साधताना व त्यांच्या अडीअडचणी समजावून घेताना खा. अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले, की या अन्यायकारक कर प्रणालीमुळे आपला देश हा सर्वाधिक जास्त कर आकारणी करणारा देश म्हणून जगभरात पुढे येतो आहे. ही बाब देशाच्या अर्थव्यवस्थेला घातक ठरणारी असून, केंद्र शासन जी.एस.टी. प्रणाली लाभदायक कर प्रणाली असल्याचे सांगत असताना, देशातील लाखोंच्या संख्येने असलेला व्यापारी वर्ग संघटित होऊन या कर प्रणालीला विरोध का करीत आहे, धरणे का देत आहे, हे न समजण्यासारखे आहे. याबाबत काँग्रेस पक्ष अर्थव्यवस्थेला बाधा न येऊ देता कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता सदैव व्यापारी वर्गाच्या पाठीशी असून, याबाबत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे देशभरात मार्गदर्शन लाभणार आहे. या पार्श्वभूमीवर २२ जुलै रोजी पुण्यात पी.चिदंबरम यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. चर्चासत्राचे प्रास्ताविक श्याम उमाळकर यांनी केले.याप्रसंगी चर्चासत्रात कृषी विक्रेते हाजी नईम खॉं, धनंजय देशपांडे, अमरचंद कोठारी, भूषण देशमुख, राजेश देशलहरा, प्रदीप छाजेड, अजय दर्डा, गौतम बेगाणी, सुरेश मुंधडा, कांतीलाल छाजेड, संजय कोलते, दीपक छाजेड, विजय कुळकर्णी, दिलीप व्यवहारे, अरुण भुतडा, डॉ. अजय ढगे, के.के. पंजाबी, नितीन सावजी, जितेंद्र दर्डा, कैलास भडेच, विजय अडसूळ, कैलास केनकर, किशोर गणोरकर आदींनी सहभाग घेतला. आभार आ. राहुल बोंद्रे यांनी मानले. चर्चासत्राचे संचालन सतीश मेहेंद्रे, सरचिटणीस जि.कॉं.क. यांनी केले. यशस्वितेसाठी सतीश मेहेंद्रे, गौतम बेगानी, महेंद्र बोर्डे, अ‍ॅड. शरद राखोंडे, सुरेश सरकटे, सुनील तायडे यांनी परिश्रम घेतले.