शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

ग्रामपंचायतींना मिळणार कामगिरीवर आधारित निधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:16 IST

बुलडाणा: १४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतींना कामगिरीवर आधारित थेट निधी मिळणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींचे भौगोलिक क्षेत्र, कर वसुली, पायाभूत सुविधांचा दर्जा पाहून त्यांचे मूल्यांकन केले जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ८६९ ग्रामपंचायतींचा समावेश

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: १४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतींना कामगिरीवर आधारित थेट निधी मिळणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींचे भौगोलिक क्षेत्र, कर वसुली, पायाभूत सुविधांचा दर्जा पाहून त्यांचे मूल्यांकन केले जाणार आहे. याबाबत निधी वितरणाचे निकष व सनियंत्रणाचे मार्गदर्शक सूचना ग्रामविकास विभागाने जारी केल्या असून, निधी मिळविण्यासाठी पदाधिकारी आणि अधिकार्‍यांचा कस लागणार आहे.१४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्तरावर मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. त्यामुळे बळकटीकरणासाठी संपूर्ण अनुदान ग्रामपंचायत स्तरावर देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने यापूर्वीच घेतला आहे; मात्र हा निधी मिळविण्यासाठी शासन निकषाचे पालन करावे लागणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीला स्वउत्पन्नात वाढ करून लेखे अद्ययावत ठेवणे व लेखापरीक्षणही करणे आता बंधनकारक आहे. १४ व्या वित्त आयोगाचा निधी मिळण्यासाठी दोन वर्षाच्या कालावधीतील लेखापरीक्षण अहवालाचा विचार केला जाणार आहे. ग्रामपंचायतीचे लेखे अचूक व पूर्ण लेखेविहित वेळेत परीक्षणासाठी उपलब्ध करण्याची जबाबदारी ग्रामसेवकावर आहे. ग्रामस्थांना देण्यात येणार्‍या सेवांचा खर्च त्यांच्याकडून वसूल केला पाहिजे. ग्रामपंचायतींनी त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत बळकट करणे आवश्यक आहे. उत्पन्नवाढीसाठी दर चार वर्षांनी फेरआकारणी करणे आवश्यक आहे. जमीन महसूल, मुद्रांक शुल्क, गौण खनिजसारख्या स्वउत्पन्नाबाबतचा पाठपुरावा करणे ग्रामविकास विभागाला अपेक्षित आहे. 

आतापर्यंत मिळाला १३७ कोटींचा निधी१४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार ग्रामीण स्वराज्य संस्थांना त्यांच्या बळकटीकरणासाठी २0१५-१६ या आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षासाठी पंचायत राज संस्थांच्या अधिकारात, कामात आणि हस्तांतरित करण्यात येणार्‍या निधीत व्यापक सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत कामगिरीच्या आधारावर १३७ कोटींच्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. आर्थिक स्थितीच्या बळकटीशिवाय ग्रामपंचायती चांगले काम करू शकणार नाही. 

लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रानुसार मिळणार निधीजिल्ह्यातील सहभागी ८६९ ग्रामपंचायतींना त्यांच्या लोकसंख्येनुसार तसेच भौगोलिक क्षेत्रानुसार निधी मिळणार आहे. शासनाकडून जिल्ह्याला मिळालेला निधी हा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना त्यांच्या मूल्यांकनानंतर लोकसंख्येनुसार ९0 टक्के व भौगोलिक क्षेत्रानुसार १0 टक्के मिळणार आहे. 

मूल्यांकनानंतर मिळणार अधिक १0 टक्के निधी८६९ ग्रामपंचायतींना लोकसंख्या व भौगोलिक क्षेत्रानुसार मिळालेल्या निधीच्या १0 टक्के अधिक निधी ग्रामपंचायतींच्या मूल्यांकनानुसार खर्च करता येईल. मूल्यांकनानंतर ४९ पर्यंत गुण असल्यास मंजूर निधीच्या ५0 टक्के, ५0 ते ६0 दरम्यान गुण असल्यास ७0 टक्के, ६१ ते ७0 दरम्यान गुण असल्यास ८0 टक्के तर ७१ टक्क्यांपेक्षा अधिक गुण असल्यास मंजूर निधीच्या १00 टक्के प्रमाणात विकास निधी मिळणार आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत