शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

ग्रामपंचायतीमधील डिजिटल सेवांचा उपक्रम खोळंबला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 14:11 IST

एक वर्ष उलटले तरी जिल्हयातील अनेक ग्रामपंचायतीत ही सेवा सुरु होवू शकली नसल्याचे दिसून येते.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शासनाच्या ई -ग्रामपंचायत प्रकल्पाद्वारे राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये आॅक्टोबर २०१८ पर्यंत सर्व प्रकारच्या डिजिटल सेवा देण्यात येणार होती. मात्र अद्याप एक वर्ष उलटले तरी जिल्हयातील अनेक ग्रामपंचायतीत ही सेवा सुरु होवू शकली नसल्याचे दिसून येते.बिएसएनएलच्या मदतीने ग्रामपंचायतस्तरावर आॅप्टीकल फायबर टाकण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने प्रयत्न सुरु केले होते. मात्र बिएसएनएलकडून प्रतिसाद मिळू न शकल्याने अनेक ग्रामपंचायतीत केबल पोहचू शकली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहिले आहे. त्याअंतर्गत देशातील सर्व ग्रामपंचायती पेपरलेस करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. षण्मुखराजन यांनी त्यादृष्टीने जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायतींचा आढावा घेवून इंटरनेट सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी सुचना दिल्या. ग्रामसेवकांनीही यादृष्टीने हालचाली सुरु केल्या. ग्रामपंचायतमध्ये मानधनतत्वावर डाटा एन्ट्री आॅपरेटर सुद्धा नेमलेत. अनेक ग्रामपंचायतीमध्ये डाटा एन्ट्री आॅपरेटर फुकटचे मानधन घेत असल्याचे दिसून येते. या सेवेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयातमिनी एटीएम सेवा, • कॅशडीपॉजिट, कॅशविड्रॉल, वीजबिल ,फोनबिल,रिचार्ज, एस एम एस ,ई- मेल ,व्हाईस कॉल, आॅनलाईन करभरणा आदी सेवा पुरवल्या जाणार होत्या. याशिवाय गावाच्या विकास कामांची माहिती, शासकीय योजणांची माहिती, गावाची यशोगाथा आदी माहिती या माध्यमातून शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करायची होती. मात्र सुविधाच नसल्याने समस्या आहे.ग्रामसेवक आग्रही!ग्रामपंचायतीमार्फत डिजीटल सेवा देण्यासाठी अनेक गावामध्ये ग्रामसेवकांनी संगणक खरेदी केले आहे. मात्र इंटरनेटचीच सुविधा नसल्याने ते हतबल झाले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष देवून इंटरनेटचा प्रश्न सोडवावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावgram panchayatग्राम पंचायत