शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Gram Panchayat Election : ५० जणांची सभा, प्रचारासाठी एक चारचारी, दोन दुचाकींची मुभा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 12:42 IST

Gram Panchayat Election: केवळ ५० जणांचीच सभा घेता येणार असून, १ चारचाकी वाहन व दोन दुचाकीवर कार्यकर्ते घेऊन जाता येणार आहे.

-  विवेक चांदूरकर

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, आचारसंहिता लागू झाली आहे. यावेळच्या आचारसंहितेत कोरोनामुळे बरेच बदल झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार करताना उमेदवारांना एकावेळी केवळ ५० जणांचीच सभा घेता येणार असून, १ चारचाकी वाहन व दोन दुचाकीवर कार्यकर्ते घेऊन जाता येणार आहे.कोरोनामुळे दरवेळीपेक्षा निवडणूक प्रचाराच्या नियमात निवडणूक आयोगाने बराच बदल केला आहे. प्रचार करताना मोठ्या सभा घेता येणार नसून, ५० जणांची मऱ्यादा  आहे. तसेच केवळ १ चारचाकी वाहन व दोन दुचाकींवरून कार्यकर्त्यांसोबत फिरता येणार आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत प्रचारादरम्यान संसर्ग वाढू नये, याची खबरदारी घेतली जात आहे. यात उमेदवारासह केवळ पाच व्यक्तींच्या गटाला घरोघरी जाऊन प्रचार करण्याची परवानगी मिळणार आहे. एकाचवेळी केवळ पाच कार्यकर्तेच एकत्र येऊन प्रचार करू शकतात. निवडणुकीदरम्यान नागरिकांनी एकत्र येणे, मिरवणुकीचे आयोजन करणे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांद्वारा निकष लावण्यात आले आहेत. मेळाव्याच्या प्रवेशासाठी बाहेर पडण्याची स्वतंत्र व्यवस्था असणाऱ्या मैदानाची पाहणी करण्यात येणार आहे. याशिवाय सामाजिक अंतराच्या दृष्टीने चिन्हांकित खुणा करण्यात येणार आहेत. कोरोनासंदर्भातील मार्गदर्शन तत्त्वे पाळली जातात की नाही, याविषयी नोडल अधिकारी लक्ष देणार आहेत. उमेदवारांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या खबरदारीसाठी फेसमास्क, सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिंग आदींच्या पूर्ततेची शहानिशा करावी लागणार आहे. या तरतुदीचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई होईल.

उमेदवारांना केवळ ५० जणांची सभा घेण्याचीच परवानगी आहे. तसेच प्रत्येक उमेदवाराला केवळ एक चारचाकी वाहन व दोन दुचाकी वाहनांचाच प्रचारासाठी वापर करता येणार आहे.

- शीतल रसाळ, तहसीलदार, खामगाव

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकkhamgaonखामगाव