शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नैसर्गिक आपत्तीच्या मदतीला शासनाची नकारघंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 11:19 IST

प्रस्तावांवर अद्यापही निर्णय न झाल्याने नुकसानग्रस्तांचे अश्रू पुसण्यात जिल्हाधिकारी हतबल ठरत आहेत.

- सदानंद शिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्यातील आपत्तीग्रस्तांना मदत देण्यासही शासनाची नकारघंटा आहे. त्यामुळे अतिवृष्टीने पिकाचे नुकसान, अपघाती मृत्यू, पुरामुळे बेघर झालेल्यांना मदत मिळण्यातही प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत देण्यासाठी निधीची मागणी सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे केली आहे. मात्र, त्या प्रस्तावांवर अद्यापही निर्णय न झाल्याने नुकसानग्रस्तांचे अश्रू पुसण्यात जिल्हाधिकारी हतबल ठरत आहेत.कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढल्याने शासनाने मार्च २०२० पर्यंत विकास कामांवरील निधी खर्चही थांबवला. जिल्हाधिकारी स्तरावरून दिल्या जाणाºया विविध आपत्तीतील नुकसानग्रस्तांना निधी देण्याचे अधिकार गोठवण्यात आले. विशेष म्हणजे, अत्यावश्यक प्रकरणातील मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडे निधी नसल्यास त्यासाठीचा निधी उणे प्राधिकारपत्रावर काढण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होते. ते केवळ शेतकरी आत्महत्या प्रकरणात मदतनिधीपुरतेच मर्यादित करण्यात आले. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये देय असलेल्या विविध प्रकरणातील मदतीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.

नैसर्गिक आपत्तीमध्ये तात्पुरती मदत देण्यासाठीही शासनाकडून निधी दिला जात नाही. तेथे ठोस मदत देण्यातही शासन अपयशी ठरत आहे. किमान आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत मिळायला हवी.- आकाश फुंडकर, आमदार

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव