शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

नैसर्गिक आपत्तीच्या मदतीला शासनाची नकारघंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 11:19 IST

प्रस्तावांवर अद्यापही निर्णय न झाल्याने नुकसानग्रस्तांचे अश्रू पुसण्यात जिल्हाधिकारी हतबल ठरत आहेत.

- सदानंद शिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्यातील आपत्तीग्रस्तांना मदत देण्यासही शासनाची नकारघंटा आहे. त्यामुळे अतिवृष्टीने पिकाचे नुकसान, अपघाती मृत्यू, पुरामुळे बेघर झालेल्यांना मदत मिळण्यातही प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत देण्यासाठी निधीची मागणी सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे केली आहे. मात्र, त्या प्रस्तावांवर अद्यापही निर्णय न झाल्याने नुकसानग्रस्तांचे अश्रू पुसण्यात जिल्हाधिकारी हतबल ठरत आहेत.कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढल्याने शासनाने मार्च २०२० पर्यंत विकास कामांवरील निधी खर्चही थांबवला. जिल्हाधिकारी स्तरावरून दिल्या जाणाºया विविध आपत्तीतील नुकसानग्रस्तांना निधी देण्याचे अधिकार गोठवण्यात आले. विशेष म्हणजे, अत्यावश्यक प्रकरणातील मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडे निधी नसल्यास त्यासाठीचा निधी उणे प्राधिकारपत्रावर काढण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होते. ते केवळ शेतकरी आत्महत्या प्रकरणात मदतनिधीपुरतेच मर्यादित करण्यात आले. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये देय असलेल्या विविध प्रकरणातील मदतीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.

नैसर्गिक आपत्तीमध्ये तात्पुरती मदत देण्यासाठीही शासनाकडून निधी दिला जात नाही. तेथे ठोस मदत देण्यातही शासन अपयशी ठरत आहे. किमान आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत मिळायला हवी.- आकाश फुंडकर, आमदार

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव