शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचे धोरण हेच शेतकरी आत्महत्यांचे कारण - वडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:10 IST

सिंदखेडराजा: एका दाण्याचे हजार दाणे देणरा शेतीचा व्यवसाय असतानाही तो आज तोट्यात आहे. त्यामुळे यामध्ये येण्यास आज कोणी तयार नाही. कारण सरकारचे धोरण हेच खरे शेतकर्‍यांचे आत्महत्याचे कारण आहे, असे प्रतिपादन शेतकरी नेते लक्ष्मणराव वडले यांनी २0 ऑक्टोबर रोजी तढेगाव येथे केले.

ठळक मुद्देलोकजागर परिवाराच्या वतीने ‘वंदन पेरत्या हाताला’ कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: एका दाण्याचे हजार दाणे देणरा शेतीचा व्यवसाय असतानाही तो आज तोट्यात आहे. त्यामुळे यामध्ये येण्यास आज कोणी तयार नाही. कारण सरकारचे धोरण हेच खरे शेतकर्‍यांचे आत्महत्याचे कारण आहे, असे प्रतिपादन शेतकरी नेते लक्ष्मणराव वडले यांनी २0 ऑक्टोबर रोजी तढेगाव येथे केले. शेतकर्‍यांचा कल्याणकारी बळीराजाचा इतिहास युवा पिढीच्या मेंदूत जतन करण्यासाठी लोकजागर परिवाराच्या वतीने आयोजित ‘वंदन पेरत्या हाताला’ या शेतकरी स्मृती गौरव सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेहकरचे तहसीलदार संतोष काकडे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हनून शेतकरी नेते लक्ष्मण वडले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर, तेजराव चेके यांच्यासह  विनोद वाघ, सरपंच रामदास कहाळे, दीपक कायंदे, पंढरी दराडे, अश्‍वीन सानप आदी उपस्थित होते. बळीराजाचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. पुढे बोलताना वडले म्हणाले की, घटनेमध्ये दोनशेपेक्षा जास्त कायदे हे शेतकरीविरोधी करून ठेवले असल्याने शेतकर्‍यांच्या मालाला भाव नाही. कोणत्याही पक्षाचे सरकार असले, तरी आमच्या उन्नतीकडे लक्ष देत नाही. या देशाला अन्यधान्य आम्ही पुरवतो हा आमचा गुन्हा आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकरी हा आज मुलीचे लग्न मुलांचे शिक्षण करू शकत नाही. त्यामुळे आमच्या मुला-मुलींनासुद्धा आत्महत्या कराव्या लागतात. आमच्या मायमावल्यांना सकस आहार मिळत नसल्याने त्यांना अनेक आजार होत आहेत. एकीकडे आमचे रात्रंदिवस काम करण्याने रक्त आटत आहे तर भांडवलदार गब्बर होत आहे. हे सरकार आम्हाला फक्त अश्‍वासनावर भुलवणारे आहे. ६0 वर्षामध्ये जेवढे काँग्रेसने लुटले नाही तेवढे यांनी नोटाबंदीतच लुटले. नोट बंदीमध्ये  अनेक जन रांगा करून मरण पावले; पण  हे मोठमोठाले व्यापारी, पुढारी भांडवलदार हे कधी रांगेत उभे राहिले, त्यांचे पैसे कधी बदलण्यात आले, असे विविध प्रश्न  त्यांनी उपस्थित केले. तसेच कर्जमाफीसाठी आम्हाला पती-पत्नीला थम्ब देण्यासाठी बंधन घालता तर भांडवलदारांचे कर्ज माफ करताना त्यांना असे बंधन का नाही?  आम्हाला कर्जमाफी नको आमच्या घामाच्या पिकाला हमी भाव द्या. आता यापुढे सरकारने शेतकर्‍यांचा अंत पाहू नये, अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ, असा इशारा देऊन शेतकरी व त्यांच्या युवा मुलांनी शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे अवाहन वडले यांनी केले.