कृषी विभागाद्वारे राज्यभरात कार्यशाळांचे आयोजनबुलडाणा: आगामी काळात रब्बी हंगामाकरिता कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार होेणार आहेत. हे व्यवहार आॅनलाइन होण्याकरिता शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.मे महिन्यापासून रब्बी हंगामाची चाहूल लागते. शेतकरी बाजारात बियाणे, खत, कीटकनाशक खरेदी करण्याकरिता गर्दी करतात. जून महिन्यात या व्यवहाराला अधिक गती येते. कोट्यवधी रुपयांचे व्यवहार या दोन महिन्यात पार पडतात. सदर व्यवहार कॅशलेस पार पडावे, यावर आता शासन भर देत आहे. डिजिटल इंडिया अभियानांतर्गत कॅशलेस व रासायनिक खते विक्रीकरिता थेट लाभ हस्तांतरणाबाबत आता राज्यभर कृषी विभागाच्या वतीने कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर कार्यशाळेमध्ये थेट लाभ हस्तांतरण प्रकल्प राबविण्याबाबतची माहिती देण्यात येईल. तसेच रासायनिक खताची विक्री करण्यासाठी राज्यातील रासायनिक खत विक्रेते यांना माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना १ जून २०१७ पासून खत खरेदीकरिता आधार नंबर आवश्यक करण्यात आला आहे. तसेच ज्या खत विक्रेत्यांनी अद्याप एमएफएमएस या प्रणालीमध्ये रजिस्ट्रेशन केलेले नाही अशा विक्रेत्यांना रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. तसेच रोकडविरहित बँक व्यवहार करण्यावर आता भर देण्यात येणार आहे. खत विक्रेत्यांना एमएफएमएस या प्रणालीमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे प्रत्येक खत विक्रेत्याला नोंदणी करावी लागणार आहे. खत, खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्याकरिता जास्तीत जास्त भीम अॅपचा वापर करण्याचे आवाहनही शासनाच्या वतीने करण्यात आले.
कृषी माल खरेदी-विक्री कॅशलेस करण्यावर शासनाचा भर
By admin | Updated: April 15, 2017 00:02 IST