शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

स्थलांतरासाठी शासनाकडून आठवडाभराची मुदत!

By admin | Updated: May 26, 2017 01:13 IST

गजानन महाराज मंदिरनजीकच्या वस्तीचे पुनर्वसन : मुदतीनंतर चालणार गजराज

लोकमत न्यूज नेटवर्क शेगाव : शेगाव विकास आराखडा अंतर्गत शहरातील जुन्या मातंगपुरी या लोकवस्तीचे स्थलांतरण करण्याच्या प्रक्रियेत स्थलांतरीत न झालेल्या कुटुंबियांना स्वयंस्फूर्तीनेस्थलांतरीत करण्यासाठी शासनाने आठवडाभराची मुदत दिली आहे. मुदतीनंतरही स्थलांतरीत न झालेल्या घरांवर चोख पोलीस बंदोबस्तात गजराज चालविल्या जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.शेगाव येथील जुन्या मातंगपुरी या वस्तीचे पुनर्वसन आळसणा रस्त्यावरील म्हाडाच्या जागेत होत असून यासाठी तयार करण्यात आलेल्या दोन प्रकारच्या संकुलांमध्ये घरे देण्यात आलेली आहेत. या घरांमध्ये येथील कुटूंबीय स्थलांतरीत होणे आतापर्यंत आवश्यक होते. मात्र येथील काही रहिवासी विविध मागण्यांना घेवून मागील १५ दिवसांपूर्वी नगर परिषदेसमोर आमरण उपोषणास बसले होते. यामुळे स्थलांतरणाच्या कार्यवाहीमध्ये अडथळा निर्माण झाला होता. दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने येत्या ३० तारखेपर्यंत मातंगपुरीतील कुटूंबियांना हलवून तेथील जागा मोकळी करण्याचे आदेश दिले आहेत. यात बुधवारी रात्री उशिरा १९ महिलांचे उपोषण सोडविण्यास प्रशासनाने यश मिळविले आहे. त्यामुळे आता मातंगपुरी येथील घरे पाडण्यास प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी पुलकूंडवार यांच्या मार्गदर्शनासाठी स्थानिक विश्रामगृहावर सर्व अधिकाऱ्यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत मातंगपुरीतील स्थलांतरीत न झालेल्या कुटूंबियांना स्वयंस्फुर्तीने स्थलांतरीत होण्यासाठी प्रशासनाने आठवडाभराची मुदत दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याउपरही स्थलांतरीत न झालेल्या घरांवर बुलडोजर चालविण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहितीही प्राप्त झाली आहे. यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली असून आठवडाभरानंतर ८०० पोलीसांचा बंदोबस्त बोलावणार असल्याचे समजते. सदनिकांचे झाले आहे लॉटरी पद्धतीने वितरणशेगाव शहरातील मातंगपुरी या भागाचे पुनर्वसन करण्यासाठी शेगाव विकास आराखडा अंतर्गत सदनिकांचे बांधकाम आळसणा रस्त्यावर करण्यात आलेले आहे. या सदनिकांचे लॉटरी पध्दतीने पुनर्वसन होणाऱ्यांना वितरण करण्यात आले आहे. दरम्यान मातंगपुरी भागातील पुनर्वसन झालेल्यांपैकी अनेक जण या सदनिकांमध्ये राहायला गेले आहेत. तर उर्वरित पुनर्वसितांनी सदनिकांमध्ये आपल्या सदनिकांचा ताबा घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.