शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

शासकीय परिसरात अतिक्रमण!

By admin | Updated: June 15, 2017 00:14 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : दीड वर्षानंतर शहरातील परिस्थिती ‘जैसे थे’!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरातील बाजाराला जागा अपुरी पडत असून, आठवडी बाजार प्रमुख रस्त्यांसह परिसरातील शासकीय कार्यालयाची जागा व थेट मुख्य दरवाजापर्यंत लघू व्यावसायिकांनी आपले बस्तान मांडले आहे. शहरातील अतिक्रमण काढून आता दीड वर्षांचा काळ लोटल्यानंतर आज शहरात मुख्य मार्गावर अतिक्रमणाने पुन्हा डोके वर काढलेले दिसत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर डिसेंबर २०१५ ते जानेवारी २०१६ दरम्यान नगरपालिकेकडून शहरातील मुख्य मार्गावरील सर्व अतिक्रमण हटविण्यात आले होते. यात अनेकांचा रोजगार हिरावला गेला. त्यानंतर प्रशासनाकडून या लघू व्यावसायिकांची पर्यायी व्यवस्थाही करून देण्यात आली; मात्र आज शहरातील अतिक्रमणाची परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे. शहराचा विस्तार वाढत असल्यामुळे आता बाजाराची जागा कमी पडू लागल्याने स्टेट बँक चौक ते मेन रोड, मलकापूर रोड, सिनेमा टॉकीज, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा कोषागार कार्यालय व पोस्ट आॅफिस आवारात अतिक्रमणाची दुकाने पोहोचली आहेत. शहरातील मुख्य रस्त्याच्या मधोमध व दुतर्फा अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने थाटल्यामुळे स्थायी दुकानदारांची परवड होत आहे. आता तर शासकीय कार्यालयाच्या जागेवरही लघू व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत़ येथेच बाजारासाठी आलेले नागरिक आपली वाहने उभी करत असल्याने कार्यालय परिसराला वाहनतळाचे स्वरुप प्राप्त होते. यामुळे शासकीय कार्यालये असुरक्षित झाली आहे. धोकादायक ठिकाणी लागतात दुकाने !परिसरातील दूरसंचार कार्यालयाच्या शेजारी मोठे विद्युत रोहित्र आहे. या विद्युत रोहित्राच्या खालीच कापड व्यावसायिक दुकाने लावतात. या उच्चदाब रोहित्रावर स्पार्किंग होऊन कापड दुकानाला आग लागल्यास मोठा अनर्थ घडू शकतो़ काही ठिकाणी अर्थिंगच्या तारेवर कपडे लटकविले जातात.प्रवेशद्वारापर्यंत अतिक्रमणशहरातील शासकीय कार्यालयाच्या थेट प्रवेश द्वारापर्यत आज अतिक्रमण झालेले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या भिंतीला खेटून कपड्यांची दुकाने लावली जातात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर फळ विके्रत्यांनी अतिक्रमण केले आहे, तर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चहा कॅटिंग, पानठेले लागले आहेत.दुकाने हटविण्यास विरोधप्रशासनाने चार वर्षाआधी आठवडी बाजार अन्यत्र हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या; मात्र या भागातील व्यापाऱ्यांनी हा बाजार हलवू दिला नाही़ शहरात दोन ठिकाणी पालिकेच्या जागासुद्धा आहेत़ शहर पोलीस ठाण्याने हा आठवडी बाजार अन्यत्र सुरक्षित ठिकाणी भरवावा, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व नगर प्रशासनास पाठविला होता. यानुसार काही ठिकाणी अतिक्रमण हटविण्यात आले; मात्र ही परिस्थिती त्यानंतर केवळ वर्षभर कायम राहिली आणि लघू व्यावसायिकांनी पुन्हा अतिक्रमण केले.