शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जंगली श्वापदाने फस्त केली बकऱ्यांची पिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 10:26 IST

Goats hatched by wild beasts : लक्ष्‍मण जगदेव वानखडे यांच्या मालकीच्या गोठ्यात बांधलेली बकरीची ७  ते ८  पिल्ले जंगली जनावराने मारून फस्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव जामोद:  तालुक्यातील ग्राम खेर्डा बु येथील शेतमजूर लक्ष्‍मण जगदेव वानखडे यांच्या मालकीच्या गोठ्यात बांधलेली बकरीची ७  ते ८  पिल्ले जंगली जनावराने मारून फस्त केली.सदर घटना दिनांक २५ जून चे रात्री घडली.     गावांमध्येच राहत्या घरापासून सात ते आठ घराच्या अंतरावर गोठा आहे. गोठ्यामध्ये  ६ मोठ्या बकऱ्या आणि ८ पिल्ले होती. मागच्या बाजूने शेत आहे. त्या मार्गाने जंगली जनावराने गोठ्याच्या कुळातून घुसून पिल्लांना मारून टाकले. त्यांचा बाहेर जाऊन फडशा पाडला. सकाळी लक्षात आल्यानंतर धावाधाव केली असता सहा किल्ले मेलेल्या अवस्थेत आजूबाजूच्या शेतात दिसली. त्यामध्ये काहींची पोटे फाडलेली होती. तर काहींचे केवळ मुंडके होते. त्यामुळे जंगली जनावर नेमके कोणते होते याबाबत शंका-कुशंका असून तडसे किंवा बिबट्या असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सदर शेतमजुराचे मोठे नुकसान झाले. वन विभागाने त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. तर जंगली जनावराने गावात घुसून पिल्ले खाल्ल्यामुळे गावकऱ्यांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वनविभागाने दखल घेण्याची गरज आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwildlifeवन्यजीव