शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

फेब्रुवारी अखेरीस खामगावात पाणी पोहोचवा;  मुंबई उच्च न्यायालयाचे पेट्रॉनला आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 13:16 IST

खामगाव: महत्वाकांक्षी  प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेतून खामगाव शहराला फेब्रुवारी अखेरीस पाणी पुरवठा करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.

- अनिल गवई

खामगाव: महत्वाकांक्षी  प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेतून खामगाव शहराला फेब्रुवारी अखेरीस पाणी पुरवठा करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. खामगाव पालिका आणि मुंबई येथील एका कंपनीच्या तडजोड करार नाम्याला मुंबई उच्च न्यायालयाने मूर्त स्वरूप दिले. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यातील मोठा अडसर दूर होणार असल्याचे संकेत आहेत.

खामगाव शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजनेला सन २००९ मध्ये मंजुरी देण्यात आली. यामध्ये शिर्ला येथील धरणापासून शहरात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या दोन पाण्याच्या टाकीपर्यंत या पाण्याच्या टाकीपासून शहरातील अंतर्गत वस्त्यांमध्ये पाईपलाईन टाकण्याचा कंत्राट मुंबई पेट्रॉन एन्वीरॉक्स या   कंपनीला देण्यात आला.  मात्र, तांत्रिक अडचण आणि मुंबई येथील कंपनीच्या चालढकलपणामुळे वाढीव पाणी पुरवठा योजना वाद्यांत सापडली असतानाच, खामगाव पालिकेने पेट्रॉन कंपनीची बँक गॅरंटी जप्त करण्यासाठी  हालचाली सुरू केल्या. पालिकेच्या पत्रव्यवहारामुळे ‘पेट्रॉन’ने पालिकेविरोधात याचिका दाखल केली. यामध्ये वाढीव दराने दरवाढीसोबतच विविध शासकीय विभागाच्या परवानगीचा मुद्दा उपस्थित केला. तर पालिकेने आपली बाजू मांडताना संबंधीत कंपनीला चार वेळा मुदतवाढीचा मुद्दा लावून धरला. तसेच पाणी पुरवठ्यासाठी धरणावरील जॅकवेल, पंपीग हाऊस,  जलशुध्दीकरण केंद्राच्या कामासह पाईपलाईन अपूर्ण असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दृष्काळी परिस्थितीमुळे पाणी टंचाईची बाजू देखील पालिकेने यावेळी लावून धरली. 

त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने तडजोडीतून तांत्रिक ‘पेच’ सोडवा,  सोबतच पेट्रॉन कंपनीला फेब्रुवारी अखेरीस शिर्ला येथील धरणावरून खामगावात अशुध्द पाणी पोहोचविण्याचे आदेश दिले. तर जलशुध्दीकरण केंद्र ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली. दरम्यान, मुंबई येथील पेट्रॉन कंपनीला पाचव्यांदा मुदतवाढ मिळाली असली तरी, आतापर्यंतच्या कामावरून भविष्यात ही कंपनी विहित मुदतीत योजनेचे काम पूर्णत्वास नेणार अथवा नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

पेट्रॉनला पाचव्यांदा मुदतवाढ!

२००९ मध्ये वर्क आॅर्डर देण्यात आल्यानंतर सन २०११ मध्ये मुंबई येथील कंपनीशी करण्यात आलेला करार संपुष्टात आला. दरम्यान, जागेसंबधित विविध विभागाच्या परवानगी, तांत्रिक अडचण आणि प्रकल्प व्यवस्थापन समितीमुळे योजनेस विलंब झाल्याने, सन २०११ मध्ये पालिका प्रशासनाने शासनाच्या परवानगीने दरवाढ देण्याचे कबुल करीत, योजनेच्या पाणी पुरवठ्याच्या वितरणाची मुख्य जबाबदारी असलेल्या कंपनीला मुदतवाढ दिली.  मात्र, तरी देखील संबधीत कंपनीने कामाची गती वाढविली नाही. त्यामुळे  सन २०१५ मध्ये संबधीत कंपनीची बँक गॅरंटी जप्त करण्यात आली. कायदेशीर पेच निर्माण झाल्यानंतर प्रकरण जिल्हाधिकाºयांच्या दालनात पोहोचले. या ठिकाणी तडजोडीनंतर जिल्हाधिकाºयांनी संबधीत कंपनीस ३१ मार्च २०१६ पर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर आता उच्च न्यायालयातून या कंपनीला मुदतवाढ मिळाली आहे. 

तीनवेळा बँक गॅरंटी गोठविण्याचा पेच

  काम करण्यासाठी संबधीत कंपनी ‘तारीख-पे-तारीख’ घेत, मुदतवाढ मिळवित आहे. विहित मुदतीत कामे पूर्ण करण्याऐवजी, कंपनी वेळकाढू धोरण स्वीकारत असल्याने पालिका प्रशासनाकडून तीनवेळा बँक गॅरंटी गोठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये सन २०१५, सन २०१७ आणि नोव्हेंबर २०१८ मध्ये बँक गॅरंटी गोठविण्याचा प्रयत्न झाला. 

 

 

पाणी पुरवठा योजनेच्या अपूर्ण कामांमुळे संबंधीत कंपनीची बँक गॅरंटी गोठविण्यासाठी पत्र दिले. यापत्राच्या आधारे कंपनी उच्च न्यायालयात गेली. पालिकेने आपली बाजू भक्कमपणे उभी केली. त्यानंतर आता पालिका आणि संबंधीत कंपनीमध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाने ‘तडजोड करारनामा’ अस्तित्वात आला आहे. उच्च न्यायालयातून सदर कंपनीला मुदतवाढ मिळाली आहे.

- धनंजय बोरीकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव.  

टॅग्स :khamgaonखामगावMumbai High Courtमुंबई हायकोर्ट