शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

फेब्रुवारी अखेरीस खामगावात पाणी पोहोचवा;  मुंबई उच्च न्यायालयाचे पेट्रॉनला आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 13:16 IST

खामगाव: महत्वाकांक्षी  प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेतून खामगाव शहराला फेब्रुवारी अखेरीस पाणी पुरवठा करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.

- अनिल गवई

खामगाव: महत्वाकांक्षी  प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेतून खामगाव शहराला फेब्रुवारी अखेरीस पाणी पुरवठा करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. खामगाव पालिका आणि मुंबई येथील एका कंपनीच्या तडजोड करार नाम्याला मुंबई उच्च न्यायालयाने मूर्त स्वरूप दिले. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यातील मोठा अडसर दूर होणार असल्याचे संकेत आहेत.

खामगाव शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजनेला सन २००९ मध्ये मंजुरी देण्यात आली. यामध्ये शिर्ला येथील धरणापासून शहरात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या दोन पाण्याच्या टाकीपर्यंत या पाण्याच्या टाकीपासून शहरातील अंतर्गत वस्त्यांमध्ये पाईपलाईन टाकण्याचा कंत्राट मुंबई पेट्रॉन एन्वीरॉक्स या   कंपनीला देण्यात आला.  मात्र, तांत्रिक अडचण आणि मुंबई येथील कंपनीच्या चालढकलपणामुळे वाढीव पाणी पुरवठा योजना वाद्यांत सापडली असतानाच, खामगाव पालिकेने पेट्रॉन कंपनीची बँक गॅरंटी जप्त करण्यासाठी  हालचाली सुरू केल्या. पालिकेच्या पत्रव्यवहारामुळे ‘पेट्रॉन’ने पालिकेविरोधात याचिका दाखल केली. यामध्ये वाढीव दराने दरवाढीसोबतच विविध शासकीय विभागाच्या परवानगीचा मुद्दा उपस्थित केला. तर पालिकेने आपली बाजू मांडताना संबंधीत कंपनीला चार वेळा मुदतवाढीचा मुद्दा लावून धरला. तसेच पाणी पुरवठ्यासाठी धरणावरील जॅकवेल, पंपीग हाऊस,  जलशुध्दीकरण केंद्राच्या कामासह पाईपलाईन अपूर्ण असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दृष्काळी परिस्थितीमुळे पाणी टंचाईची बाजू देखील पालिकेने यावेळी लावून धरली. 

त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने तडजोडीतून तांत्रिक ‘पेच’ सोडवा,  सोबतच पेट्रॉन कंपनीला फेब्रुवारी अखेरीस शिर्ला येथील धरणावरून खामगावात अशुध्द पाणी पोहोचविण्याचे आदेश दिले. तर जलशुध्दीकरण केंद्र ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली. दरम्यान, मुंबई येथील पेट्रॉन कंपनीला पाचव्यांदा मुदतवाढ मिळाली असली तरी, आतापर्यंतच्या कामावरून भविष्यात ही कंपनी विहित मुदतीत योजनेचे काम पूर्णत्वास नेणार अथवा नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

पेट्रॉनला पाचव्यांदा मुदतवाढ!

२००९ मध्ये वर्क आॅर्डर देण्यात आल्यानंतर सन २०११ मध्ये मुंबई येथील कंपनीशी करण्यात आलेला करार संपुष्टात आला. दरम्यान, जागेसंबधित विविध विभागाच्या परवानगी, तांत्रिक अडचण आणि प्रकल्प व्यवस्थापन समितीमुळे योजनेस विलंब झाल्याने, सन २०११ मध्ये पालिका प्रशासनाने शासनाच्या परवानगीने दरवाढ देण्याचे कबुल करीत, योजनेच्या पाणी पुरवठ्याच्या वितरणाची मुख्य जबाबदारी असलेल्या कंपनीला मुदतवाढ दिली.  मात्र, तरी देखील संबधीत कंपनीने कामाची गती वाढविली नाही. त्यामुळे  सन २०१५ मध्ये संबधीत कंपनीची बँक गॅरंटी जप्त करण्यात आली. कायदेशीर पेच निर्माण झाल्यानंतर प्रकरण जिल्हाधिकाºयांच्या दालनात पोहोचले. या ठिकाणी तडजोडीनंतर जिल्हाधिकाºयांनी संबधीत कंपनीस ३१ मार्च २०१६ पर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर आता उच्च न्यायालयातून या कंपनीला मुदतवाढ मिळाली आहे. 

तीनवेळा बँक गॅरंटी गोठविण्याचा पेच

  काम करण्यासाठी संबधीत कंपनी ‘तारीख-पे-तारीख’ घेत, मुदतवाढ मिळवित आहे. विहित मुदतीत कामे पूर्ण करण्याऐवजी, कंपनी वेळकाढू धोरण स्वीकारत असल्याने पालिका प्रशासनाकडून तीनवेळा बँक गॅरंटी गोठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये सन २०१५, सन २०१७ आणि नोव्हेंबर २०१८ मध्ये बँक गॅरंटी गोठविण्याचा प्रयत्न झाला. 

 

 

पाणी पुरवठा योजनेच्या अपूर्ण कामांमुळे संबंधीत कंपनीची बँक गॅरंटी गोठविण्यासाठी पत्र दिले. यापत्राच्या आधारे कंपनी उच्च न्यायालयात गेली. पालिकेने आपली बाजू भक्कमपणे उभी केली. त्यानंतर आता पालिका आणि संबंधीत कंपनीमध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाने ‘तडजोड करारनामा’ अस्तित्वात आला आहे. उच्च न्यायालयातून सदर कंपनीला मुदतवाढ मिळाली आहे.

- धनंजय बोरीकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव.  

टॅग्स :khamgaonखामगावMumbai High Courtमुंबई हायकोर्ट