शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

फेब्रुवारी अखेरीस खामगावात पाणी पोहोचवा;  मुंबई उच्च न्यायालयाचे पेट्रॉनला आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 13:16 IST

खामगाव: महत्वाकांक्षी  प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेतून खामगाव शहराला फेब्रुवारी अखेरीस पाणी पुरवठा करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.

- अनिल गवई

खामगाव: महत्वाकांक्षी  प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेतून खामगाव शहराला फेब्रुवारी अखेरीस पाणी पुरवठा करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. खामगाव पालिका आणि मुंबई येथील एका कंपनीच्या तडजोड करार नाम्याला मुंबई उच्च न्यायालयाने मूर्त स्वरूप दिले. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यातील मोठा अडसर दूर होणार असल्याचे संकेत आहेत.

खामगाव शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजनेला सन २००९ मध्ये मंजुरी देण्यात आली. यामध्ये शिर्ला येथील धरणापासून शहरात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या दोन पाण्याच्या टाकीपर्यंत या पाण्याच्या टाकीपासून शहरातील अंतर्गत वस्त्यांमध्ये पाईपलाईन टाकण्याचा कंत्राट मुंबई पेट्रॉन एन्वीरॉक्स या   कंपनीला देण्यात आला.  मात्र, तांत्रिक अडचण आणि मुंबई येथील कंपनीच्या चालढकलपणामुळे वाढीव पाणी पुरवठा योजना वाद्यांत सापडली असतानाच, खामगाव पालिकेने पेट्रॉन कंपनीची बँक गॅरंटी जप्त करण्यासाठी  हालचाली सुरू केल्या. पालिकेच्या पत्रव्यवहारामुळे ‘पेट्रॉन’ने पालिकेविरोधात याचिका दाखल केली. यामध्ये वाढीव दराने दरवाढीसोबतच विविध शासकीय विभागाच्या परवानगीचा मुद्दा उपस्थित केला. तर पालिकेने आपली बाजू मांडताना संबंधीत कंपनीला चार वेळा मुदतवाढीचा मुद्दा लावून धरला. तसेच पाणी पुरवठ्यासाठी धरणावरील जॅकवेल, पंपीग हाऊस,  जलशुध्दीकरण केंद्राच्या कामासह पाईपलाईन अपूर्ण असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दृष्काळी परिस्थितीमुळे पाणी टंचाईची बाजू देखील पालिकेने यावेळी लावून धरली. 

त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने तडजोडीतून तांत्रिक ‘पेच’ सोडवा,  सोबतच पेट्रॉन कंपनीला फेब्रुवारी अखेरीस शिर्ला येथील धरणावरून खामगावात अशुध्द पाणी पोहोचविण्याचे आदेश दिले. तर जलशुध्दीकरण केंद्र ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली. दरम्यान, मुंबई येथील पेट्रॉन कंपनीला पाचव्यांदा मुदतवाढ मिळाली असली तरी, आतापर्यंतच्या कामावरून भविष्यात ही कंपनी विहित मुदतीत योजनेचे काम पूर्णत्वास नेणार अथवा नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

पेट्रॉनला पाचव्यांदा मुदतवाढ!

२००९ मध्ये वर्क आॅर्डर देण्यात आल्यानंतर सन २०११ मध्ये मुंबई येथील कंपनीशी करण्यात आलेला करार संपुष्टात आला. दरम्यान, जागेसंबधित विविध विभागाच्या परवानगी, तांत्रिक अडचण आणि प्रकल्प व्यवस्थापन समितीमुळे योजनेस विलंब झाल्याने, सन २०११ मध्ये पालिका प्रशासनाने शासनाच्या परवानगीने दरवाढ देण्याचे कबुल करीत, योजनेच्या पाणी पुरवठ्याच्या वितरणाची मुख्य जबाबदारी असलेल्या कंपनीला मुदतवाढ दिली.  मात्र, तरी देखील संबधीत कंपनीने कामाची गती वाढविली नाही. त्यामुळे  सन २०१५ मध्ये संबधीत कंपनीची बँक गॅरंटी जप्त करण्यात आली. कायदेशीर पेच निर्माण झाल्यानंतर प्रकरण जिल्हाधिकाºयांच्या दालनात पोहोचले. या ठिकाणी तडजोडीनंतर जिल्हाधिकाºयांनी संबधीत कंपनीस ३१ मार्च २०१६ पर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर आता उच्च न्यायालयातून या कंपनीला मुदतवाढ मिळाली आहे. 

तीनवेळा बँक गॅरंटी गोठविण्याचा पेच

  काम करण्यासाठी संबधीत कंपनी ‘तारीख-पे-तारीख’ घेत, मुदतवाढ मिळवित आहे. विहित मुदतीत कामे पूर्ण करण्याऐवजी, कंपनी वेळकाढू धोरण स्वीकारत असल्याने पालिका प्रशासनाकडून तीनवेळा बँक गॅरंटी गोठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये सन २०१५, सन २०१७ आणि नोव्हेंबर २०१८ मध्ये बँक गॅरंटी गोठविण्याचा प्रयत्न झाला. 

 

 

पाणी पुरवठा योजनेच्या अपूर्ण कामांमुळे संबंधीत कंपनीची बँक गॅरंटी गोठविण्यासाठी पत्र दिले. यापत्राच्या आधारे कंपनी उच्च न्यायालयात गेली. पालिकेने आपली बाजू भक्कमपणे उभी केली. त्यानंतर आता पालिका आणि संबंधीत कंपनीमध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाने ‘तडजोड करारनामा’ अस्तित्वात आला आहे. उच्च न्यायालयातून सदर कंपनीला मुदतवाढ मिळाली आहे.

- धनंजय बोरीकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव.  

टॅग्स :khamgaonखामगावMumbai High Courtमुंबई हायकोर्ट