शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

रुढी-परंपरेला फाटा देत  नातीने आजीला दिला चिताग्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 17:00 IST

 नातीने आजीला चिताग्नी देऊन नवीन आदर्श प्रस्थापित केला.

ठळक मुद्देचेतना ही आपल्या वडील व आईच्या निधना नंतर आपले स्वत:चे शिक्षण करत आपल्या म्हाताऱ्याआजीचा सांभाळ करत होती. ३ जुलै रोजी संध्याकाळी श्रीमती आशाबाई ह्यांचे निधन झाले व समोर प्रश्न आला जुन्या रुढी परंपरेला फाटा देत  चेतना हीने समोर टीटवे धरत आपल्या आजीला चिताअग्नी दीला.

 - सुहास वाघमारे        

 नांदुरा : बालपणी आईवडिलांचे छत्र हरवले त्यामुळे तालुकातल्या  अलमपुर येथिल एकुलती एक असलेल्या चेतना राजेंद्र देशमुख हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला मात्र; त्याच वेळी वयोवृद्ध आजीने चेतनाला आधार दिला व तिचे संगोपन केले. पदवीपर्यंत तिला शिकवले.  चेतनाची आजी आशाबाई यांनी  ३ जुलै ला वृद्धापकाळाने जगाचा निरोप घेतला. यावेळी  अंत्यसंस्कार विधी व चिताअग्नी बाबत आप्तेष्ट व गावकऱ्यांनी चर्चा होत असताना माझ्या आजीने माझा सांभाळ केला त्यामुळे मीच माझ्या आजीला चिताअग्नी देणारा असा निर्णय चेतनाने घेत दिनांक ४जुलैच्या दुपारी आपल्या  नातीने आजीला चिताग्नी देऊन नवीन आदर्श प्रस्थापित केला.अलमपुर येथील स्वर्गीय राजेंद्र नानाराव देशमुख याची मुलगी  चेतना ही आपल्या वडील व आईच्या निधना नंतर आपले स्वत:चे शिक्षण करत आपल्या म्हाताऱ्याआजीचा सांभाळ करत होती. ३ जुलै रोजी संध्याकाळी श्रीमती आशाबाई ह्यांचे निधन झाले व समोर प्रश्न आला तो चिताअग्नी देण्याचा.  तेंव्हा समोर होऊन चेतनाने आपल्या नातलगांना सांगितले,  'मी स्वत: माझ्या आजीला चिताअग्नी देते.'  त्या निर्णयाला सर्व नातलगांनी सहमती दर्शवली व ४ जुलै ला सकाळी ११  वाजता जुन्या रुढी परंपरेला फाटा देत  चेतना हीने समोर टीटवे धरत आपल्या आजीला चिताग्नी दीला. चेतना हीने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिने एक नवीन आदर्श प्रस्थापित केला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाNanduraनांदूरा