शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

‘गझले’तून समाजाच्या वेदना बाहेर पडतात - सुरेशकुमार वैराळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:33 IST

सुरेश भट गझलमंचचे संस्थापक शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांच्याशी साधलेला संवाद... 

अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: महाराष्ट्रातील ३६ पैकी २४ जिल्ह्यात ‘गझलरंग’ मुशायऱ्याचे आतापर्यंत ११२ कार्यक्रम सादर केले आहेत.  नवोदीत तरूण  गझलकार हे माध्यम सशक्त आणि अंत्यत प्रभावीपणे हाताळत आहेत. गझलेचा आस्वाद घेणारा चोखंदळ रसिकवर्गही मोठ्या संख्येत निर्माण झाला आहे. सुरेश भट गझलमंचचे संस्थापक शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांच्याशी साधलेला संवाद... 

गझल आणि कवितेत काय फरक जाणवतो? गझल आणि कविता या दोन्ही अजिबात वेगवेगळ्या नाहीत. तर गझल ही कवितेचाच एक भाग आहे. ज्यांचे गझलेचे ‘शेर’ जुळून येतात, त्यांनी स्वत:ला ‘श्रेष्ठ’ समजू नये आणि ज्यांचे जुळून येत नाहीत त्यांनी स्वत:ला अजिबात कमी समजता कामा नये. कविता आणि गझल लिहीण्यासाठी आशयासोबतच तळमळ महत्वाची आहे.

सोशल मिडीयामुळे गझलेचा प्रचार-प्रसार मिळण्यास मदत होतेय का?  निश्चितच. ताबडतोब व्यक्त होण्यासाठी सोशल मिडीया हे एक प्रभावी माध्यम आहे. ‘गझलरंग’ मुशायऱ्यात सहभागी अनेक युवा कलावंतांचा शोध यु-ट्यूब आणि फेसबूक सारख्या सोशल माध्यमांमुळेच लागला आहे. सोशल माध्यमांमुळे गझलकार आणि कलावंतांला ताबडतोब प्रतिक्रीया मिळण्यास नक्कीच मदत होते.

नवोदीत गझलकारांना आपण काय संदेश द्याल?  सातत्याने व्यक्त होण्यासाठी प्रत्येकाने सतत प्रयत्न करावेत. मात्र, कधीही प्रसिध्दीचा हव्यास धरू नये. प्रसिध्दीची हाव ही कोणत्याही व्यक्तीला खड्ड्यात घालते. थोडक्यात अभिव्यक्त होताना प्रत्येकाने आपले पाय जमिनीवरच ठेवावे. हा नियम नवोदित गझलकारांसाठीच नव्हेतर प्रत्येकच क्षेत्रात ‘प्रसिध्दी’चा हव्यास हा वाईट असतो, हाच आपला प्रामाणिक संदेश आहे. गझलसम्राट सुरेश भट यांनी ‘गझल’ हा अलौकिक काव्यप्रकार सर्वप्रथम मराठीत आणला आहे. मराठी मातीत हा प्रकार रूजविण्यासाठी त्यांनी  अपार मेहनत घेतली. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी गझल रसिकांपर्यंत पोहोचविली. त्यांची मेहनत सार्थकी लावण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटण्याचा संकल्प आहे.

 ‘गझलरंग’मध्ये युवा कलावंतांच्या प्रतिसादाबाबत काय सांगाल?मराठी गझल लिहिणाºया नवोदीत गझलकारांची गझल रसिकांशी भेट घालून  देण्याच्या प्रमुख उद्देशाने ‘सुरेश भट गझलमंच’ची २९ एप्रिल २०१२ रोजी स्थापना झाली. स्थापनेपासून आतापर्यंत तब्बल १६६ कलावंतांचा ‘गझलरंग’ मुशायऱ्यात सहभाग आहे. एकाहून एक सरस रचना युवा कलावंत सादर करीत आहेत. युवा कलावंतांच्या व रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच मराठी गझल मुशायऱ्यांचे राज्यभर सातत्यपूर्ण सादरीकरण करण्यात येत आहे. यामध्ये महिला गझलकारांचाही उत्स्फूर्त सहभाग आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखतmusicसंगीतliteratureसाहित्य