शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘गझले’तून समाजाच्या वेदना बाहेर पडतात - सुरेशकुमार वैराळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:33 IST

सुरेश भट गझलमंचचे संस्थापक शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांच्याशी साधलेला संवाद... 

अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: महाराष्ट्रातील ३६ पैकी २४ जिल्ह्यात ‘गझलरंग’ मुशायऱ्याचे आतापर्यंत ११२ कार्यक्रम सादर केले आहेत.  नवोदीत तरूण  गझलकार हे माध्यम सशक्त आणि अंत्यत प्रभावीपणे हाताळत आहेत. गझलेचा आस्वाद घेणारा चोखंदळ रसिकवर्गही मोठ्या संख्येत निर्माण झाला आहे. सुरेश भट गझलमंचचे संस्थापक शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांच्याशी साधलेला संवाद... 

गझल आणि कवितेत काय फरक जाणवतो? गझल आणि कविता या दोन्ही अजिबात वेगवेगळ्या नाहीत. तर गझल ही कवितेचाच एक भाग आहे. ज्यांचे गझलेचे ‘शेर’ जुळून येतात, त्यांनी स्वत:ला ‘श्रेष्ठ’ समजू नये आणि ज्यांचे जुळून येत नाहीत त्यांनी स्वत:ला अजिबात कमी समजता कामा नये. कविता आणि गझल लिहीण्यासाठी आशयासोबतच तळमळ महत्वाची आहे.

सोशल मिडीयामुळे गझलेचा प्रचार-प्रसार मिळण्यास मदत होतेय का?  निश्चितच. ताबडतोब व्यक्त होण्यासाठी सोशल मिडीया हे एक प्रभावी माध्यम आहे. ‘गझलरंग’ मुशायऱ्यात सहभागी अनेक युवा कलावंतांचा शोध यु-ट्यूब आणि फेसबूक सारख्या सोशल माध्यमांमुळेच लागला आहे. सोशल माध्यमांमुळे गझलकार आणि कलावंतांला ताबडतोब प्रतिक्रीया मिळण्यास नक्कीच मदत होते.

नवोदीत गझलकारांना आपण काय संदेश द्याल?  सातत्याने व्यक्त होण्यासाठी प्रत्येकाने सतत प्रयत्न करावेत. मात्र, कधीही प्रसिध्दीचा हव्यास धरू नये. प्रसिध्दीची हाव ही कोणत्याही व्यक्तीला खड्ड्यात घालते. थोडक्यात अभिव्यक्त होताना प्रत्येकाने आपले पाय जमिनीवरच ठेवावे. हा नियम नवोदित गझलकारांसाठीच नव्हेतर प्रत्येकच क्षेत्रात ‘प्रसिध्दी’चा हव्यास हा वाईट असतो, हाच आपला प्रामाणिक संदेश आहे. गझलसम्राट सुरेश भट यांनी ‘गझल’ हा अलौकिक काव्यप्रकार सर्वप्रथम मराठीत आणला आहे. मराठी मातीत हा प्रकार रूजविण्यासाठी त्यांनी  अपार मेहनत घेतली. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी गझल रसिकांपर्यंत पोहोचविली. त्यांची मेहनत सार्थकी लावण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटण्याचा संकल्प आहे.

 ‘गझलरंग’मध्ये युवा कलावंतांच्या प्रतिसादाबाबत काय सांगाल?मराठी गझल लिहिणाºया नवोदीत गझलकारांची गझल रसिकांशी भेट घालून  देण्याच्या प्रमुख उद्देशाने ‘सुरेश भट गझलमंच’ची २९ एप्रिल २०१२ रोजी स्थापना झाली. स्थापनेपासून आतापर्यंत तब्बल १६६ कलावंतांचा ‘गझलरंग’ मुशायऱ्यात सहभाग आहे. एकाहून एक सरस रचना युवा कलावंत सादर करीत आहेत. युवा कलावंतांच्या व रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच मराठी गझल मुशायऱ्यांचे राज्यभर सातत्यपूर्ण सादरीकरण करण्यात येत आहे. यामध्ये महिला गझलकारांचाही उत्स्फूर्त सहभाग आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखतmusicसंगीतliteratureसाहित्य