शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
4
ग्रीन झोनमध्ये शेअर बाजाराची कामकाजास सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह 'हे' शेअर्स उघडले
5
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
6
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
8
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
9
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
10
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
11
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
12
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
13
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
14
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
15
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
16
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
17
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
18
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
19
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
20
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस

पिंप्री अडगाव येथील महिलांचा पाण्यासाठी घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:06 IST

संग्रामपूर तालुक्यातील पिंप्री अडगाव येथे भीषण पाणीटंचाई असल्यामुळे व १४0 गाव पाणीपुरवठायोजनेच्या पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्यामुळे गावातील नागरिकांना, महिलांना व अबालवृध्दांना गत २७ दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे.

ठळक मुद्देहिवाळ्य़ातच पाणीटंचाई महिलांची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : तालुक्यातील पिंप्री अडगाव येथे भीषण पाणीटंचाई असल्यामुळे व १४0 गाव पाणीपुरवठायोजनेच्या पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्यामुळे गावातील नागरिकांना, महिलांना व अबालवृध्दांना गत २७ दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांचेकडे निवेदने सुध्दा दिली होती. मात्र पाणी प्रश्नावर प्रशासनाने कुठलाही पर्याय उपलब्ध करुन न दिल्यामुळे अखेर अभयसिंह मारोडे तसेच प्रहार जनशक्ती पदाधिकार्‍यांच्या नेतृत्वात १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता गावातील शेकडो महिला व पुरुषांचा घागर मोर्चा गटविकास अधिकार्‍यांच्या दालनात पोहचला मात्र गटविकास अधिकारी हे हजर नसल्यामुळे शेकडो महिलांचा व नागरिकांचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी तहसीलदार यांनी पं.स.चे पाणीपुरवठा कक्षाचे कर्मचारी यांना बोलावल्यानंतर व गावातील पाईपलाईनचे १४0 गावाच्या पाईपलाईनला जोडणी करुन देवून तात्काळ  ही पाईपलाईन जोडल्यानंतर हा मोर्चा परत गावाकडे दुपारी ४ वाजता परतला.गत २७ दिवसांपासून पिंप्री अडगाव येथे पाणीटंचाई असल्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी मोलमजुरी सोडून व कामबंधे सोडून पाण्यासाठी भटकावे लागत होते. यासाठी बर्‍याच वेळा नागरिकांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे व ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदनेही दिली. मात्र यावर कुठल्याही उपाययोजना ग्रा.पं.च्यावतीने होत नसल्यामुळे शेकडो महिलांचा घागर मोर्चा दुपारी १ वाजता पंचायत समितीमध्ये तर दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयात धडकला होता. त्यामुळे या मोर्चाची धास्ती घेत व पाणीप्रश्न दूर करण्यासाठी तहसीलदार राठोड यांनी पं.स.च्या पाणीपुरवठा कर्मचार्‍यांना बोलावून व पिंप्री अडगाव येथे ग्रामसचिव व सरपंच यांना पाठवून गावातील पाईपलाईन ही १४0 गाव पाणीपुरवठा येाजनेच्या पाईपलाईन सोबत जोडण्यात यावी अशी सूचना दिल्यानंतर पाणीपुरवठा कर्मचार्‍यांनी तात्काळ गावात जावून ही पाईपलाईन जोडल्यानंतर व १४ नोव्हेंबर पर्यंत १४0 गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी हे ग्रा.पं.च्या विहिरीत सोडण्यात येईल असे आश्‍वासन दिल्यानंतर हा घागर मोर्चा परत दुपारी ५ वाजता गावाकडे परतला. यावेळी या मोर्चात अभयसिंह मारोडे, शुभम चिकटे, अनिकेत शेळके, पुरुषोत्तम गायगोळ, विजय ढोले, रवींद्र खुपसे तसेच शेकडो महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.- 

टॅग्स :Waterपाणी