शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

पिंप्री अडगाव येथील महिलांचा पाण्यासाठी घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:06 IST

संग्रामपूर तालुक्यातील पिंप्री अडगाव येथे भीषण पाणीटंचाई असल्यामुळे व १४0 गाव पाणीपुरवठायोजनेच्या पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्यामुळे गावातील नागरिकांना, महिलांना व अबालवृध्दांना गत २७ दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे.

ठळक मुद्देहिवाळ्य़ातच पाणीटंचाई महिलांची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : तालुक्यातील पिंप्री अडगाव येथे भीषण पाणीटंचाई असल्यामुळे व १४0 गाव पाणीपुरवठायोजनेच्या पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्यामुळे गावातील नागरिकांना, महिलांना व अबालवृध्दांना गत २७ दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांचेकडे निवेदने सुध्दा दिली होती. मात्र पाणी प्रश्नावर प्रशासनाने कुठलाही पर्याय उपलब्ध करुन न दिल्यामुळे अखेर अभयसिंह मारोडे तसेच प्रहार जनशक्ती पदाधिकार्‍यांच्या नेतृत्वात १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता गावातील शेकडो महिला व पुरुषांचा घागर मोर्चा गटविकास अधिकार्‍यांच्या दालनात पोहचला मात्र गटविकास अधिकारी हे हजर नसल्यामुळे शेकडो महिलांचा व नागरिकांचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी तहसीलदार यांनी पं.स.चे पाणीपुरवठा कक्षाचे कर्मचारी यांना बोलावल्यानंतर व गावातील पाईपलाईनचे १४0 गावाच्या पाईपलाईनला जोडणी करुन देवून तात्काळ  ही पाईपलाईन जोडल्यानंतर हा मोर्चा परत गावाकडे दुपारी ४ वाजता परतला.गत २७ दिवसांपासून पिंप्री अडगाव येथे पाणीटंचाई असल्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी मोलमजुरी सोडून व कामबंधे सोडून पाण्यासाठी भटकावे लागत होते. यासाठी बर्‍याच वेळा नागरिकांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे व ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदनेही दिली. मात्र यावर कुठल्याही उपाययोजना ग्रा.पं.च्यावतीने होत नसल्यामुळे शेकडो महिलांचा घागर मोर्चा दुपारी १ वाजता पंचायत समितीमध्ये तर दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयात धडकला होता. त्यामुळे या मोर्चाची धास्ती घेत व पाणीप्रश्न दूर करण्यासाठी तहसीलदार राठोड यांनी पं.स.च्या पाणीपुरवठा कर्मचार्‍यांना बोलावून व पिंप्री अडगाव येथे ग्रामसचिव व सरपंच यांना पाठवून गावातील पाईपलाईन ही १४0 गाव पाणीपुरवठा येाजनेच्या पाईपलाईन सोबत जोडण्यात यावी अशी सूचना दिल्यानंतर पाणीपुरवठा कर्मचार्‍यांनी तात्काळ गावात जावून ही पाईपलाईन जोडल्यानंतर व १४ नोव्हेंबर पर्यंत १४0 गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी हे ग्रा.पं.च्या विहिरीत सोडण्यात येईल असे आश्‍वासन दिल्यानंतर हा घागर मोर्चा परत दुपारी ५ वाजता गावाकडे परतला. यावेळी या मोर्चात अभयसिंह मारोडे, शुभम चिकटे, अनिकेत शेळके, पुरुषोत्तम गायगोळ, विजय ढोले, रवींद्र खुपसे तसेच शेकडो महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.- 

टॅग्स :Waterपाणी