शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

पिंप्री अडगाव येथील महिलांचा पाण्यासाठी घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:06 IST

संग्रामपूर तालुक्यातील पिंप्री अडगाव येथे भीषण पाणीटंचाई असल्यामुळे व १४0 गाव पाणीपुरवठायोजनेच्या पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्यामुळे गावातील नागरिकांना, महिलांना व अबालवृध्दांना गत २७ दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे.

ठळक मुद्देहिवाळ्य़ातच पाणीटंचाई महिलांची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : तालुक्यातील पिंप्री अडगाव येथे भीषण पाणीटंचाई असल्यामुळे व १४0 गाव पाणीपुरवठायोजनेच्या पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्यामुळे गावातील नागरिकांना, महिलांना व अबालवृध्दांना गत २७ दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांचेकडे निवेदने सुध्दा दिली होती. मात्र पाणी प्रश्नावर प्रशासनाने कुठलाही पर्याय उपलब्ध करुन न दिल्यामुळे अखेर अभयसिंह मारोडे तसेच प्रहार जनशक्ती पदाधिकार्‍यांच्या नेतृत्वात १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता गावातील शेकडो महिला व पुरुषांचा घागर मोर्चा गटविकास अधिकार्‍यांच्या दालनात पोहचला मात्र गटविकास अधिकारी हे हजर नसल्यामुळे शेकडो महिलांचा व नागरिकांचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी तहसीलदार यांनी पं.स.चे पाणीपुरवठा कक्षाचे कर्मचारी यांना बोलावल्यानंतर व गावातील पाईपलाईनचे १४0 गावाच्या पाईपलाईनला जोडणी करुन देवून तात्काळ  ही पाईपलाईन जोडल्यानंतर हा मोर्चा परत गावाकडे दुपारी ४ वाजता परतला.गत २७ दिवसांपासून पिंप्री अडगाव येथे पाणीटंचाई असल्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी मोलमजुरी सोडून व कामबंधे सोडून पाण्यासाठी भटकावे लागत होते. यासाठी बर्‍याच वेळा नागरिकांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे व ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदनेही दिली. मात्र यावर कुठल्याही उपाययोजना ग्रा.पं.च्यावतीने होत नसल्यामुळे शेकडो महिलांचा घागर मोर्चा दुपारी १ वाजता पंचायत समितीमध्ये तर दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयात धडकला होता. त्यामुळे या मोर्चाची धास्ती घेत व पाणीप्रश्न दूर करण्यासाठी तहसीलदार राठोड यांनी पं.स.च्या पाणीपुरवठा कर्मचार्‍यांना बोलावून व पिंप्री अडगाव येथे ग्रामसचिव व सरपंच यांना पाठवून गावातील पाईपलाईन ही १४0 गाव पाणीपुरवठा येाजनेच्या पाईपलाईन सोबत जोडण्यात यावी अशी सूचना दिल्यानंतर पाणीपुरवठा कर्मचार्‍यांनी तात्काळ गावात जावून ही पाईपलाईन जोडल्यानंतर व १४ नोव्हेंबर पर्यंत १४0 गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी हे ग्रा.पं.च्या विहिरीत सोडण्यात येईल असे आश्‍वासन दिल्यानंतर हा घागर मोर्चा परत दुपारी ५ वाजता गावाकडे परतला. यावेळी या मोर्चात अभयसिंह मारोडे, शुभम चिकटे, अनिकेत शेळके, पुरुषोत्तम गायगोळ, विजय ढोले, रवींद्र खुपसे तसेच शेकडो महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.- 

टॅग्स :Waterपाणी