शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कारेगाव येथे घागर मोर्चा

By admin | Updated: May 9, 2017 01:39 IST

महाजल योजना ठरली कुचकामी; पाण्यासाठी महिलांची भटकंती.

कारेगाव : येथील गावकर्‍यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे येथे कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी येथील महिलांनी शनिवारी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. लाखो रूपये खर्च करून शासनाने कारेगावसाठी महाजल योजना उभारली मात्र, या महाजल योजनेमध्ये झालेल्या अनियमितपणामुळे या योजनेतून पाणी मिळू शकले नाही. त्यामुळे महाजल योजनाही येथे कुचकामी ठरत आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून सुध्दा येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही. कारेगावसाठी ७0 लाख रूपये खर्चुन महाजल योजने अंतर्गत कोनाटीच्या धरणावरुन पाईपलाईन करण्यात आली. पाणी साठविण्यासाठी गावात टाकीही बांधण्यात आली. मात्र, या पाईपलाईन मधून गावाकर्‍यांना एकदिवसही पाणी मिळाले नाही. अखेर गावकर्‍यांनी तंटामुक्तीच्या निधीमधून पाणी साठवविण्यासाठी दुसरी टाकी बांधली. तरी सुद्धा महाजल योजनेचे पाणी गावकर्‍यांना कधी मिळते तर कधी मिळत नाही. महिलांना रात्री बेरात्री मिळेल तेथून पिण्यासाठी पाणी आणावे लागते. अखेर कंटाळलेल्या महिलांनी हातात हंडे घेवून शनिवारी ग्रामपंचायतीवर धडक दिली. यावेळी मिना हाडे, छाया चव्हाण, गयाबाई चव्हाण, जिजाबाई चव्हाण, रत्नमाला आवारे, कालिंदाबाई डव्हळे, लताबाई गुंगे, लंकाबाई गायकवाड, गिताबाई चव्हाण यांच्यासह मोहन हाडे, भास्कर गुंगे, विठ्ठल गायकवाड, सुनिल हाडे, विलास गुंगे, धम्मपाल वानखेडे, दादाराव वानखेडे, शेषराव वानखेडे, गणेश डव्हळे, सुधीर चव्हाण, विष्णू चव्हाण, शेषराव केंधळे हे गावकरी मोर्चात सहभागी झाले होते. आतातरी कारेवाग येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रशासनाने कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी गावकर्‍यांनी यावेळी केली.