शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

‘एमआरईजीएस"ची कामे तातडीने सुरू करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:34 IST

चिखली : चिखली मतदारसंघातील चिखली आणि बुलडाणा तालुक्यांतील ‘एमआरईजीएस’च्या कामांचा सन २०२०-२१ चा कृती आराखडा तयार असतानाही अद्याप कामांना ...

चिखली : चिखली मतदारसंघातील चिखली आणि बुलडाणा तालुक्यांतील ‘एमआरईजीएस’च्या कामांचा सन २०२०-२१ चा कृती आराखडा तयार असतानाही अद्याप कामांना सुरुवात झालेली नाही. तथापि, कृती आराखड्यात समाविष्ट असलेल्या कामाला मागणी असूनही मान्यता देण्यात आलेली नाही. एकूण जिल्ह्यात हीच स्थिती असल्याने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना तातडीने मान्यता देऊन कामे सुरू करण्याबाबत आमदार श्वेता महाले यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे.

चिखली तालुक्यातील दिवठाणा, खंडाळा मकरध्वज, शेलगाव जहांगीर, मंगरूळ नवघरे, भोरसा-भोरसी, करतवाडी, एनखेड, कोलारा, रानअंत्री, आमखेड आदी ठिकाणच्या मजुरांनी कामांची मागणी केलेली असून रस्त्यांच्या कामांचा प्रस्तावसुद्धा सादर करण्यात आलेला आहे; परंतु अद्यापपर्यंत या प्रस्तावांना मान्यता मिळालेली नाही. तसेच चिखली आणि बुलडाणा तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी रस्ते, विहीर, गोठे, सिंचनाची कामे आदींसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ही कामे कृती आराखड्यात देखील समाविष्ट आहेत. तरीसुद्धा कोणत्याही कामाना मान्यता न मिळाल्याने किंवा सुरू न झाल्याने रोष व्यक्त होत आहे. गत ५ ते ६ वर्षांपासून मान्यताच न देण्यात आल्याने प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मजुरांच्या हाताला काम नाही. त्यांच्यावर उपासमारीसोबत त्यांना स्थलांतर करावे लागत आहे, असे स्पष्ट करताना या कामांसदर्भात प्रशासन गंभीर नसल्याने जिल्ह्याभरातील लोकउपयोगी कामे ठप्प पडलेली आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे नुकसान होत असून ‘एमआरईजीएस’चा कोणताही प्राप्त निधी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यात खर्च होत नाही, अशा शब्दात आ. श्वेता महालेंनी नाराजी व्यक्त केली असून पावसाळा तोंडावर आल्याने तातडीने कामांना मान्याता देऊन ती पूर्णत्वास न्यावीत, असे स्पष्ट केले आहे.

कालबद्ध कार्यक्रम आखावा !

कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या जीवघेण्या परिस्थितीमध्ये आणि लॉकडाऊनमुळे मजुरांच्या हाताला काम नाही. तसेच शेतीचा हंगाम संपल्यामुळे शेतमजुरांनासुद्धा कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही. तसेच लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याने आणि कोविडमुळे शासनाने निधी कपात केल्याने शासकीय बांधकामे ठप्प पडल्याने बांधकाम मजूरसुद्धा मोठ्या प्रमाणात घरी बसून आहेत. त्यामुळे कृती आराखड्यातील मंजूर कामे तातडीने सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणांना कालबद्ध कार्यक्रम आखून कामे करण्याचे निर्देश देण्याची मागणी आ. महाले यांनी केली आहे.