शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

नाफेडसारख्या योजना लुटण्यासाठी - तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:28 IST

 शासनाच्या नाफेडसारख्या योजना शेतकर्‍यांच्या टाळुवरील लोणी खाण्यासाठीच असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांनी केले. वरवट बकाल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कृषी उत्पन्न बाजाराच्या प्रांगणात आयोजित कापूस- सोयाबीन परिषदेत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल :  शासनाच्या नाफेडसारख्या योजना शेतकर्‍यांच्या टाळुवरील लोणी खाण्यासाठीच असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांनी केले. वरवट बकाल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कृषी उत्पन्न बाजाराच्या प्रांगणात आयोजित कापूस- सोयाबीन परिषदेत ते बोलत होते.तुपकर म्हणाले की, शासनाने शेतकर्‍याच्या वाटेतील काटे काढले नसून,  कर्जमाफीचे अर्ज भरण्यासारख्या योजनेतून वाटेत काटे टाकले. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा शासनाने राजकारण करण्यासाठी एक प्रकारे वापर केला. देशातील कर्नाटक राज्यात सोयाबीनला जास्त भाव आहे; पण महाराष्ट्रात सोयाबीनला कमी भाव दिला जात असल्याने हा अन्याय नव्हे काय? नोटबंदी करून सरकारने देशातील जनतेला आर्थिक मंदीत टाकले. शेतकर्‍यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नसून, आश्‍वासनाची खैरात वाटल्याचा प्रकार शासन करते, ही शोकांतिकाच नव्हे काय? शेतकर्‍यांना शेती पिकवूनही शेतमालाला योग्य भाव न देता त्याचे आर्थिक शोषण केले जात असल्याचा आरोप करीत देशातील केंद्र व राज्य शासनावर टीका केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी रामदास भोपळे हे होते तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, अमोल राऊत, स्वाभिमानी युवा आघाडीचे प्रशांत डिक्कर, विजय पोहनकर, बाळु डोसे यांची समयोचित भाषणे झालीत. व्यासपीठावर श्रीकृष्ण दातार, दामोधर इंगोले, नाना पाटील, मोहन पाटील, रोशन देशमुख, विलास तराळे आदींची उपस्थिती होती. संचालन करून आभार रामेश्‍वर गायकी यांनी मानले. शेतकरी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.