शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात अस्वच्छतेचा कळस; जागोजागी कचऱ्यांचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 15:38 IST

बुलडाणा: शहरातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरात जागोजागी कचऱ्यांचे ढीग साचलेले असून, सांडपाण्याच्या नाल्याही तुडूंब भरल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहरातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरात जागोजागी कचऱ्यांचे ढीग साचलेले असून, सांडपाण्याच्या नाल्याही तुडूंब भरल्या आहेत. बुलडाण्यातील अस्वच्छतेने कळस गाठल्याने नगर पालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.स्वच्छतेच्या बाबतीत अनेकवेळा रणकंदन झालेल्या बुलडाण्यातील अस्वच्छता अद्यापही दूर झालेली नाही. विधीमंडळाच्या दालनापर्यंत गेलेल्या बुलडाण्यातील स्वच्छतेच्या प्रश्नावर पालिकेने काही महिन्यापूर्वी वेगवेगळे पाऊले उचलण्यास सुरूवात केली होती. बुलडाण्यातील कचºयावरून वरीष्ठ पातळीपर्यंत तक्रारी झाल्यानंतर आरोग्य मंत्र्यानी नगर पालिकेला कारवाईचा अल्टीमेटम दिला होता. दरम्यान, आरोग्य मंत्र्यांच्या कारवाईच्या भितीने शहरात स्वच्छतेच्या दृष्टीने नवनविन प्रयोग पालिकेने आजमाविले. मात्र ते प्रयोगांनाच अवकळा आली आहे.स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठीच शासनाकडून ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत असून या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बुलडाणा पालिकेने स्वच्छतेवर वाजणाºया गाण्यांची मदत घेण्यास प्रारंभ केला. मात्र ते सुद्धा बंद पडल्याचे दिसून येत आहे.स्वच्छ भारत अभियानातंर्गत राज्यातील सर्वच नगर पालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन करण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिका प्रशासनाकडून थेट घरातूनच कचरा उचलण्यात येत आहे. मात्र बुलडाणा पालिका गेल्या काही महिन्यापासून कचºयाच्या बाबतीत वारंवार चर्चेत येत असल्याचे दिसून येते. पूर्वी बुलडाणा शहरात ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र सध्या त्या ठिकाणी कचरा कुंड्या नसल्याने अनेक नागरिक रस्त्यावरच कचरा फेकतात. परिणामी, काही ठिकाणी अस्वच्छता पसरत असल्याचे चित्र आहे.बसस्थानकासमोरून गेलेली सांडपाण्याची नाली तर सदैव तुडूंब भरलेली दिसून येते. त्याचबरोबर शहरातील नाल्याही घाणीने भरल्याने मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. शहरात सध्या कचरा गोळा करणाºया गाड्या सकाळच्या सुमारास फिरतात; मात्र अनेक भागात ह्या गाड्या पोहचतच नाहीत. या वाढत्या अस्वच्छतेमुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.‘स्वच्छ भारत का इरादा’ गेला कुठे?कचरा विलगीकरणाला गती देण्यासाठी कचरा गोळा करणाºया गाड्यांवर ‘स्वच्छ भारत का ईरादा कर लिया हमने!’ असे गीत वाजविले जात होते. सकाळी-सकाळी कचरा गोळा करायला आलेल्या गाडीवर हे गाणे ऐकताच सर्वांचेच याकडे लक्ष जात होते. शहरात जवळपास २५ पेक्षा जास्त गाड्यांवर हे गाणे बसविण्यात आले होते. बुलडाणा पालिकेकडून पहिल्यादांच हा प्रयोग राबविण्यात आला. मात्र काही दिवसात हा प्रयोग बंद झाल्याचे दिसून येत आहे. एकाही गाडीवर हे गाणे सध्या वाजत नसल्याचे चित्र आहे.शहराला लागून ग्रामपंचायतींची स्थितीही चिंताजनकबुलडाणा शहराला लागून असलेल्या मात्र नगर पालिका हद्दीत समाविष्ट नसलेल्या कॉलनीसह गावठाण परीसर व ग्रामपंचायतीची स्वच्छतेच्या बाबतीत चिंताजनक परिस्थिती आहे. बुलडाण्याला लागून सागवण, माळविहिर, सुंदरखेड, व इतर काही ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीकडून सुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत खबरदारी घेतली जात नाही. या भागातील नाल्या उपसण्यासाठी मुहूर्तच मिळत नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :buldhanaबुलडाणा