शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

बुलडाण्यात अस्वच्छतेचा कळस; जागोजागी कचऱ्यांचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 15:38 IST

बुलडाणा: शहरातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरात जागोजागी कचऱ्यांचे ढीग साचलेले असून, सांडपाण्याच्या नाल्याही तुडूंब भरल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहरातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरात जागोजागी कचऱ्यांचे ढीग साचलेले असून, सांडपाण्याच्या नाल्याही तुडूंब भरल्या आहेत. बुलडाण्यातील अस्वच्छतेने कळस गाठल्याने नगर पालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.स्वच्छतेच्या बाबतीत अनेकवेळा रणकंदन झालेल्या बुलडाण्यातील अस्वच्छता अद्यापही दूर झालेली नाही. विधीमंडळाच्या दालनापर्यंत गेलेल्या बुलडाण्यातील स्वच्छतेच्या प्रश्नावर पालिकेने काही महिन्यापूर्वी वेगवेगळे पाऊले उचलण्यास सुरूवात केली होती. बुलडाण्यातील कचºयावरून वरीष्ठ पातळीपर्यंत तक्रारी झाल्यानंतर आरोग्य मंत्र्यानी नगर पालिकेला कारवाईचा अल्टीमेटम दिला होता. दरम्यान, आरोग्य मंत्र्यांच्या कारवाईच्या भितीने शहरात स्वच्छतेच्या दृष्टीने नवनविन प्रयोग पालिकेने आजमाविले. मात्र ते प्रयोगांनाच अवकळा आली आहे.स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठीच शासनाकडून ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत असून या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बुलडाणा पालिकेने स्वच्छतेवर वाजणाºया गाण्यांची मदत घेण्यास प्रारंभ केला. मात्र ते सुद्धा बंद पडल्याचे दिसून येत आहे.स्वच्छ भारत अभियानातंर्गत राज्यातील सर्वच नगर पालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन करण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिका प्रशासनाकडून थेट घरातूनच कचरा उचलण्यात येत आहे. मात्र बुलडाणा पालिका गेल्या काही महिन्यापासून कचºयाच्या बाबतीत वारंवार चर्चेत येत असल्याचे दिसून येते. पूर्वी बुलडाणा शहरात ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र सध्या त्या ठिकाणी कचरा कुंड्या नसल्याने अनेक नागरिक रस्त्यावरच कचरा फेकतात. परिणामी, काही ठिकाणी अस्वच्छता पसरत असल्याचे चित्र आहे.बसस्थानकासमोरून गेलेली सांडपाण्याची नाली तर सदैव तुडूंब भरलेली दिसून येते. त्याचबरोबर शहरातील नाल्याही घाणीने भरल्याने मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. शहरात सध्या कचरा गोळा करणाºया गाड्या सकाळच्या सुमारास फिरतात; मात्र अनेक भागात ह्या गाड्या पोहचतच नाहीत. या वाढत्या अस्वच्छतेमुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.‘स्वच्छ भारत का इरादा’ गेला कुठे?कचरा विलगीकरणाला गती देण्यासाठी कचरा गोळा करणाºया गाड्यांवर ‘स्वच्छ भारत का ईरादा कर लिया हमने!’ असे गीत वाजविले जात होते. सकाळी-सकाळी कचरा गोळा करायला आलेल्या गाडीवर हे गाणे ऐकताच सर्वांचेच याकडे लक्ष जात होते. शहरात जवळपास २५ पेक्षा जास्त गाड्यांवर हे गाणे बसविण्यात आले होते. बुलडाणा पालिकेकडून पहिल्यादांच हा प्रयोग राबविण्यात आला. मात्र काही दिवसात हा प्रयोग बंद झाल्याचे दिसून येत आहे. एकाही गाडीवर हे गाणे सध्या वाजत नसल्याचे चित्र आहे.शहराला लागून ग्रामपंचायतींची स्थितीही चिंताजनकबुलडाणा शहराला लागून असलेल्या मात्र नगर पालिका हद्दीत समाविष्ट नसलेल्या कॉलनीसह गावठाण परीसर व ग्रामपंचायतीची स्वच्छतेच्या बाबतीत चिंताजनक परिस्थिती आहे. बुलडाण्याला लागून सागवण, माळविहिर, सुंदरखेड, व इतर काही ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीकडून सुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत खबरदारी घेतली जात नाही. या भागातील नाल्या उपसण्यासाठी मुहूर्तच मिळत नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :buldhanaबुलडाणा