शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:40 IST

माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजात राहत असताना प्रत्येकाशी संवाद होणेही गरजेचे आहे. तेव्हाच भाव-भावनांची देवाण-घेवाण होऊन मानसिक स्वास्थ्य ...

माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजात राहत असताना प्रत्येकाशी संवाद होणेही गरजेचे आहे. तेव्हाच भाव-भावनांची देवाण-घेवाण होऊन मानसिक स्वास्थ्य अबाधित राहते. मात्र, कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकजण घरातच होते. तेव्हा समाजाशी असलेला संवाद काहीसा हरपला होता. तर याच दरम्यान अनेकांचे रोजगारही गेले होते. तर पती-पत्नी सतत घरातच असल्याने गृहकलहही वाढले होते. याचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर झाल्याने अनेकांना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्लाही घ्यावा लागला. मात्र, हे सर्व असताना जर केवळ आणि केवळ तुम्ही जवळच्या व्यक्तीजवळ बोलून तणावाचा निचरा केल्यास तुमचे मानसिक स्वास्थ्य टिकून राहू शकते असाही सल्ला मानसोपचार तज्ज्ञ देतात.

असे करा तणावाचे नियोजन

मानसिक ताणाचे तीन प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला यूस्ट्रेस असून, याला आवश्यक ताण असे म्हणतात. हा ताण प्रत्येकाला असतो यामुळे व्यक्ती स्वत:ची प्रगती करू शकतो. यानंतर येतो तो डिस्ट्रेस. याला अनावश्यक ताण असे म्हणतात. या तणावाचे वेळीच नियोजन न केल्यास त्याचे डिसऑर्डरमध्ये रुपांतर होते. म्हणजे तो व्यक्ती मानसिक रुग्ण होतो. तेव्हा डिस्ट्रेस कमी करण्यासाठी जवळच्या व्यक्तीजवळ बोलून मोकळे व्हा असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ देत आहेत.

मानसिक स्वास्थ्य राखणे ही आपली स्वत:ची जबाबदारी आहे. अती विचार करणे, भीती वाटणे, शांत बसावेसे वाटणे ही लक्षणे दिसताच मित्रांसोबत गप्पा मारा, आवडत्या विषयात रममाण होण्याचा प्रयत्न करा, जवळच्या व्यक्तीसोबत बोलून तणावाचा निचरा करा.

-डॉ. विश्वास खर्चे, मानसोपचार तज्ज्ञ, बुलडाणा.