शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

 फाळणीमुळे नव्हे, तर बहुजन उद्धार कार्यामुळेच गांधीजींची हत्या - सौरभ हटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 13:54 IST

खामगाव : देशाची फाळणी केली म्हणून गांधीजींची हत्या झाली हा गैरसमज आहे. खरतंर देशाच्या फाळणीमुळे नव्हेतर बहुजन उद्धार कार्यामुळेच गांधीजींची हत्या झाल्याचे युवा व्याख्याते सौरभ हटकर यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देमहात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शहर) च्यावतीने गांधी हत्या समज अपसमज या विषयावर व्याख्यान.स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधीचे योगदान, गांधीच्या हत्येचे सात प्रयत्न, हरिजन यात्रा, मीठाचा सत्याग्रह, असहकार-अहिंसा-सत्याग्रह या आंदोलनाच्या पध्दती या विषयावर सौरभ हटकर यांनी प्रकाश टाकला.

खामगाव : देशाची फाळणी केली म्हणून गांधीजींची हत्या झाली हा गैरसमज आहे. खरतंर देशाच्या फाळणीमुळे नव्हेतर बहुजन उद्धार कार्यामुळेच गांधीजींची हत्या झाल्याचे युवा व्याख्याते सौरभ हटकर यांनी स्पष्ट केले. गांधी हत्या समज अपसमज या विषयावर व्याख्यान करतांना ते बोलत होते. महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शहर) च्यावतीने येथील स्व. विलासराव देशमुख कॉटन मार्केट यार्डमधील मनोबल अभ्यासिकेत आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. गांधी हत्या समज अपसमज हा व्याख्यानाचा विषय होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार योगेश फरपट तर नगरसेवक तथा राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष देवेंद्र देशमुख, माजी नगराध्यक्ष गणेश माने, लक्ष्मीनारायण फाउंडेशनचे अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकराव हटकर, ज्येष्ठ नेते समाधान पाटील, भारिप नेते अनिल क्षिरसागर,शेकापचे वासुदेवराव उन्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. गांधींची हत्या का करण्यात आली याचा उहापोह करतांना सौरभ हटकर पुढे म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या ही कर्मठवाद्यांनी घडवून आलेला कट आहे. गांधींवर सोईनुसार आरोप करुन त्यांना बदनाम करण्याचाच प्रयत्न नेहमी झाला असल्याचा उल्लेख त्यांनी केला. स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधीचे योगदान, गांधीच्या हत्येचे सात प्रयत्न, हरिजन यात्रा, मीठाचा सत्याग्रह, असहकार-अहिंसा-सत्याग्रह या आंदोलनाच्या पध्दती या विषयावर सौरभ हटकर यांनी प्रकाश टाकला. १९४८ साली महात्मा गांधी काही कारणास्तव नोबेल पारितोषीक मिळू शकले नाही त्याची भर संयुक्त भारताच्या प्रतिनीधींना म्हणजेच कैलास सत्यार्थी व युसूफ मलाला या नोबेल पारितोषीक देवून झाली असावी असेही त्यांनी आवर्जून सांगितले. तत्पुर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकृष्ण धुरंधर यांनी केले. कार्यक्रमाला स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यासोबत कॉलेज आॅफ मॅनेजमेंटचे विद्यार्थी, लक्ष्मीनारायण मॉडेल स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :khamgaonखामगावMahatma Gandhiमहात्मा गांधी