शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

 फाळणीमुळे नव्हे, तर बहुजन उद्धार कार्यामुळेच गांधीजींची हत्या - सौरभ हटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 13:54 IST

खामगाव : देशाची फाळणी केली म्हणून गांधीजींची हत्या झाली हा गैरसमज आहे. खरतंर देशाच्या फाळणीमुळे नव्हेतर बहुजन उद्धार कार्यामुळेच गांधीजींची हत्या झाल्याचे युवा व्याख्याते सौरभ हटकर यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देमहात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शहर) च्यावतीने गांधी हत्या समज अपसमज या विषयावर व्याख्यान.स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधीचे योगदान, गांधीच्या हत्येचे सात प्रयत्न, हरिजन यात्रा, मीठाचा सत्याग्रह, असहकार-अहिंसा-सत्याग्रह या आंदोलनाच्या पध्दती या विषयावर सौरभ हटकर यांनी प्रकाश टाकला.

खामगाव : देशाची फाळणी केली म्हणून गांधीजींची हत्या झाली हा गैरसमज आहे. खरतंर देशाच्या फाळणीमुळे नव्हेतर बहुजन उद्धार कार्यामुळेच गांधीजींची हत्या झाल्याचे युवा व्याख्याते सौरभ हटकर यांनी स्पष्ट केले. गांधी हत्या समज अपसमज या विषयावर व्याख्यान करतांना ते बोलत होते. महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शहर) च्यावतीने येथील स्व. विलासराव देशमुख कॉटन मार्केट यार्डमधील मनोबल अभ्यासिकेत आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. गांधी हत्या समज अपसमज हा व्याख्यानाचा विषय होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार योगेश फरपट तर नगरसेवक तथा राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष देवेंद्र देशमुख, माजी नगराध्यक्ष गणेश माने, लक्ष्मीनारायण फाउंडेशनचे अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकराव हटकर, ज्येष्ठ नेते समाधान पाटील, भारिप नेते अनिल क्षिरसागर,शेकापचे वासुदेवराव उन्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. गांधींची हत्या का करण्यात आली याचा उहापोह करतांना सौरभ हटकर पुढे म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या ही कर्मठवाद्यांनी घडवून आलेला कट आहे. गांधींवर सोईनुसार आरोप करुन त्यांना बदनाम करण्याचाच प्रयत्न नेहमी झाला असल्याचा उल्लेख त्यांनी केला. स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधीचे योगदान, गांधीच्या हत्येचे सात प्रयत्न, हरिजन यात्रा, मीठाचा सत्याग्रह, असहकार-अहिंसा-सत्याग्रह या आंदोलनाच्या पध्दती या विषयावर सौरभ हटकर यांनी प्रकाश टाकला. १९४८ साली महात्मा गांधी काही कारणास्तव नोबेल पारितोषीक मिळू शकले नाही त्याची भर संयुक्त भारताच्या प्रतिनीधींना म्हणजेच कैलास सत्यार्थी व युसूफ मलाला या नोबेल पारितोषीक देवून झाली असावी असेही त्यांनी आवर्जून सांगितले. तत्पुर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकृष्ण धुरंधर यांनी केले. कार्यक्रमाला स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यासोबत कॉलेज आॅफ मॅनेजमेंटचे विद्यार्थी, लक्ष्मीनारायण मॉडेल स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :khamgaonखामगावMahatma Gandhiमहात्मा गांधी