शहरं
Join us  
Trending Stories
1
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
2
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
3
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
4
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
5
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
6
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
7
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
8
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे
9
३ आठवड्यातच 'तिने' सर्वस्व गमावलं; डोळे झाकून विश्वास ठेवणं महिलेला महागात पडलं
10
"AAP आणि काँग्रेसची युती कायम राहणार नाही, आम्ही फक्त..." केजरीवालांचे मोठे विधान
11
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
12
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
13
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
14
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
15
मुंबई मनपानं नोटीस बजावली, तरीही २९ महाकाय होर्डिंग जसेच्या तसे!
16
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
17
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
19
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
20
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'

जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी निधीची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:12 PM

दहा भूसंपादन प्रकरणांची मुदत संपत असून त्यांचा निपटारा करण्यासाठी ४२२ कोटी रुपयंची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गामुळे वैद्यकीय क्षेत्रासह अत्यावश्यक सेवेसाठीच निधी उपलब्ध करण्याच्या शासनाच्या धोरणामुळे जिगाव प्रकल्पाच्या निधीला कात्री लागली असतानाच दहा भूसंपादन प्रकरणांची मुदत संपत असून त्यांचा निपटारा करण्यासाठी ४२२ कोटी रुपयंची गरज आहे.दरम्यान, या प्रकरणांपैकी केवळ दोन प्रकरणांना एक वर्षाची मुदतवाढ मिळू शकते. त्यामुळे अन्य प्रकरणे वेळत निकाली काढणे गरजेचे आहे, अन्यथा भूसंपादनाची संपूर्ण प्रक्रिया नव्याने करावी लागेल आणि त्यात जवळपास दोन वर्षे निघून जातील आणि प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण होण्यास अधिक विलंब लागण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षीपासून जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रकरणे ऐरणीवर आली होती. मार्च अखरे एक हजार १८२ कोटी रुपायंची प्रकरणे मार्गी लावण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते. दरमान एक आॅगस्ट २०१६ च्या नोटीफिकेशननुसार काही भूसंपादन प्रकरणात ३० टक्के रंक्कम देवून ही प्रकरणे मार्गी लावण्यात आली होती. मात्र सप्टेंबर अखेर अनेक भूसंपादन प्रकरणात प्रारुप निवाडा करावा लागणार आहे. त्यासाठी निधीची गरज पडणार आहे. त्यामुळे ही प्रकरणे कुठल्याही स्थितीत मार्गी लावणे गरजेचे झाले आहे. मधल्या काळात तीन महिने मुदत वाढ काही प्रकरणांना घेण्यात आली होती. मात्र आता ही मुदतही संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिगाव भूसंपादनाची प्रकरणे त्वरेने मार्गी लावणे काळाची गरज बनली आहे.चार प्रकरणातच द्यावे लागणार १०२ कोटीजिगाव प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाच्या चार प्रकरणांमध्येच १०२ कोटी रुपये मोबदला द्यावा लागणार आहे. ५९० हेक्टर जमीन संपादीत करण्यासाठी हा मोबदला द्यावा लागणार आहे. त्याची १०० टक्के तरतूद सध्या प्रशासनाकडे आहे. त्यामुळे काही प्रमाणात यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. सध्या २८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असून त्यातून ही गरज भागवली जावू शकते. मात्र त्यानंतरच्या प्रकरणांसाठी निधीची अवश्यकता पडणार आहे. ही समस्या प्रशासनासमेर आहे.प्रशासकीय पातळीव तोडग्यासाठी लवकरच बैठकभूसंपादन प्रकरणे आणि कलम ‘ड’ च्या संदर्भाने अनेक प्रकरणात शेतकऱ्यांचे काही आक्षेप आहेत. यासंदर्भात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत लवकरच एक बैठक घेण्याचा निर्णय १८ जून रोजी घेण्यात आला आहे. या बैठकीस माजी मंत्री तथा विद्यमान आ. डॉ. संजय कुटे, जिल्हाधिकारी व जिगाव प्रकल्पचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. या बैठकीत भूसंपदान प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी कोणती पावले उचलता येतील निधीच्या उपलब्धतेबाबतही सविस्तर चर्चा होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली. कोरोना संसर्गामुळे जिगाव प्रकल्पाला चालू आर्थिक वर्षात मिळणाºया ६९० कोटी रुपयांना कात्री लागली असून प्रत्यक्षात २२७ कोटी रुपयेच मिळणार आहे.

१,५०० हेक्टर जमीनीचे भूसंपादन अडचणीचेनिवाडास्तरावर आलेल्या दहा भूसंपादन प्रकरणांपैकी सहा प्रकरणांमध्ये एक हजार ५०० हेक्टर जमीन संपादीत करावयाची आहे. या सहा प्रकरणांसाठीच ३२० कोटी रुपयांची गरज आहे. यातील दोन प्रकरणांना भूसंपादन कायद्यातील तरतुदींचा आधार घेवून किमान एक वर्षापर्यंत मुदत वाढ दिली जावू शकते. मात्र अन्य प्रकरणांमध्ये निधी उपलब्ध करणे आवश्यक आहे. कलम १९ मधील प्रकरणात प्रारंभी ३० टक्के निधी देण्यात आल्यानंतर प्रारुप निवाड्यात ७० टक्के रक्कम द्यावी लागते. त्यासाठी १०० टक्के निधी मिळणे गरजेचे झाले असल्याची माहिती सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प