शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

९५ हजार शेतक-यांचा मदत निधी रखडला

By admin | Updated: March 10, 2015 02:02 IST

बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळ अनुदानाचे ७0 टक्के वाटप; बॅंक खाते नसल्याने निधी वाटपात अडसर.

बुलडाणा : दुष्काळात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या मदतीचा निधी दोन ट प्प्यात बुलडाण्याला प्राप्त झाला. या निधीचे वाटप तत्काळ करण्याचे प्रशासनाने निर्देश दिले; तसेच तालुकास्तरावर निधीही वितरीत केला; मात्र तब्बल ९५ हजार ३६८ शेतकर्‍यांचे बँक खाते नसल्याने अजूनही ३0 टक्के निधी वाटप होऊ शकला नाही, ही बाब सोमवारी समोर आली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यात पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली. यामुळे जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. ४ लाख ७६ हजार ८४१ लाख शेतकर्‍यांना या दुष्काळाचा फटका बसला आहे. या शेतकर्‍यांना एकूण २८७ कोटी ९४ लाखाची मदत जाहीर करण्यात आली असून, त्यापैकी २३९ कोटी ५३ लाखाची मदत प्राप्त झाली आहे. या मद तीचे वाटप जानेवारी ७ मार्चनंतर हा निधी शासनाकडे परत जाणार, अशी सूचना आल्यानंतर निधी वाटपाला गती आली असून, येत्या आठवडाभरात संपूर्ण वितरण केले जाईल, असे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी दिली. शासनाकडून आलेली मदत ही संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार बँकांकडे २१२ कोटी ४0 लाखाची रक्कम वळती करण्यात आली आहे. त्यापैकी १६९ कोटी ९२ लाखांची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यातही जमा झाली असून, उर्वरित रक्कम जमा करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.