शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

निधी उपलब्ध, पण गाळ काढण्याची मोहीम थंड

By admin | Updated: April 20, 2015 22:38 IST

गाळ काढण्याला चालना नाही; एसडीओंनी लक्ष देण्याची गरज.

बुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानाच्या अंतर्गत महात्मा फुले जलभूमी अभियानातून विविध प्रकल्प व तलावांमधील गाळ काढण्यासाठी प्राधान्य देण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. या कामासाठी जेसीबी, पोकलंडसह निधीही उपलब्ध करून दिला व सदर निधी प्रत्येक तालुकास्तरावर तसेच विविध शासकीय यंत्रणांकडे सुपूर्दही केला आहे; मात्र प्रशासनाच्या उदासिनतेमुळे गाळ काढण्याची मोहीम संपूर्ण जिल्हाभरात थंड बस्त्यात आहे. जलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाच्या कामांमध्ये प्रामुख्याने गावतलाव, पाझर तलाव, सिंचन तलाव, साठवण तलाव, शिवकालीन तलाव, ब्रिटिशकालीन तलाव व निजामकालीन तलावांमधील साचलेला गाळ काढण्याच्या कामांचे नियोजन केले आहे. गाळ काढून खोलीकरणासह तळी स्वच्छ करण्याच्या कामांना प्राधान्य दिले जावे व पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे पुर्णत्वास यावी, असे नियोजन आहे. कृषी विभाग, उपवनसंरक्षक, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग व जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागांना गाळ काढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी सर्व यंत्रणांना तब्बल १ कोटी ५७ लाख ५९ हजाराचा निधी वितरीत करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र या निधीचा विनियोग करण्यात आलेला नाही. त्यामुळे यासंदर्भात वेळेची र्मयादा ठरविण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हाभरात कुठेही गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली नसल्याने जलयुक्त शिवार अभियानातील या महत्त्वाच्या कामाकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी २५ मार्च रोजी सर्व यंत्रणांना पत्र पाठवून गाळ काढण्याची मोहीम तातडीने हाती घेण्याच्या सूचना केल्या होत्या तसेच उपविभागीय अधिकारी यांना हे अभियान ग ितमान होईल, या दृष्टीने तत्काळ पुढाकार घेण्याचेही निर्देश दिले होते. प्रत्यक्षात मात्र जिल्हाभरात कुठेही गाळ काढण्याचे काम सुरू झालेले नाही.