शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

निधी उपलब्ध, पण गाळ काढण्याची मोहीम थंड

By admin | Updated: April 20, 2015 22:38 IST

गाळ काढण्याला चालना नाही; एसडीओंनी लक्ष देण्याची गरज.

बुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानाच्या अंतर्गत महात्मा फुले जलभूमी अभियानातून विविध प्रकल्प व तलावांमधील गाळ काढण्यासाठी प्राधान्य देण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. या कामासाठी जेसीबी, पोकलंडसह निधीही उपलब्ध करून दिला व सदर निधी प्रत्येक तालुकास्तरावर तसेच विविध शासकीय यंत्रणांकडे सुपूर्दही केला आहे; मात्र प्रशासनाच्या उदासिनतेमुळे गाळ काढण्याची मोहीम संपूर्ण जिल्हाभरात थंड बस्त्यात आहे. जलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाच्या कामांमध्ये प्रामुख्याने गावतलाव, पाझर तलाव, सिंचन तलाव, साठवण तलाव, शिवकालीन तलाव, ब्रिटिशकालीन तलाव व निजामकालीन तलावांमधील साचलेला गाळ काढण्याच्या कामांचे नियोजन केले आहे. गाळ काढून खोलीकरणासह तळी स्वच्छ करण्याच्या कामांना प्राधान्य दिले जावे व पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे पुर्णत्वास यावी, असे नियोजन आहे. कृषी विभाग, उपवनसंरक्षक, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग व जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागांना गाळ काढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी सर्व यंत्रणांना तब्बल १ कोटी ५७ लाख ५९ हजाराचा निधी वितरीत करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र या निधीचा विनियोग करण्यात आलेला नाही. त्यामुळे यासंदर्भात वेळेची र्मयादा ठरविण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हाभरात कुठेही गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली नसल्याने जलयुक्त शिवार अभियानातील या महत्त्वाच्या कामाकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी २५ मार्च रोजी सर्व यंत्रणांना पत्र पाठवून गाळ काढण्याची मोहीम तातडीने हाती घेण्याच्या सूचना केल्या होत्या तसेच उपविभागीय अधिकारी यांना हे अभियान ग ितमान होईल, या दृष्टीने तत्काळ पुढाकार घेण्याचेही निर्देश दिले होते. प्रत्यक्षात मात्र जिल्हाभरात कुठेही गाळ काढण्याचे काम सुरू झालेले नाही.