शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय किसान संघाचे धरणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 16:16 IST

बुलडाणा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय किसान संघ जिल्हा शाखेच्या वतीने २८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी एक ते पाच वाजेदरम्यान एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय किसान संघाने अनेकवेळा आंदोलने केली.२८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.

बुलडाणा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय किसान संघ जिल्हा शाखेच्या वतीने २८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी एक ते पाच वाजेदरम्यान एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. सदोष निर्णय पद्धती व प्रशासनाचा संवेदनहीन कारभार यामुळे समस्या वाढत आहेत. मागच्या सरकारने केलेल्या चुकांचे निरसन करण्याचा पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी नवीन सरकारकडे मोठ्या आशेने पाहिले. परंतू शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. चुकीच्या आयात धोरणांनी शेतमालाच्या किंमती घटल्या व शेतकरी देशोधडीला लागला. स्वयंघोषित हमी भावाने शेतीमाल खरेदी करता आला नाही. व्यापाऱ्यांनी याचा लाभ घेऊन नफेखोरी केली. सरकारला मात्र यावर नियंत्रण ठेवला आले नाही. या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय किसान संघाने अनेकवेळा आंदोलने केली. मात्र दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे २८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर भावांतर योजना लागू करावी, दिवसाला १२ तास पूर्ण दाबाची विज मिळावी, वन्यप्राण्यांची वनातच पाणी, अन्न व सुरक्षेची व्यवस्था करुन शेतमालाचे रक्षण करावे, प्रतिबंधित व अप्रमाणित बियाणे विकणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत शेत तिथे रस्ता अभियान राबवावे, सर्व शेतमालावर व्यक्तीगत विम्याला परवानगी देऊन कंपन्याकडून न दिलेली रक्कम देण्यास भाग पाडावे, कृषी मालाची आयात बंद करावी, तूर व हरभरा खरेदीस मुदतवाढ मिळावी, कापूस उत्पादक शेतकऱ्यां ना बोंड अळी नियंत्रणासाठी काम गंध सापळे मोफत देण्यात यावे या मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष डॉ. बी. आर. पाटील, उपाध्यक्ष नंदकूमार खडके, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नारायण पाटील सुसर, मुकुंदराव भिसे, शंकरलाल भुतडा, कैलास ढोले, दगडू गाडेकर, अर्जूनराव गारोळे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagitationआंदोलन