शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पळशी बु. येथे पाणीटंचाईमुळे वन्य जीवांचे हाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:30 IST

पळशी बु.: यावर्षीचा पावसाळा  संपण्याच्या मार्गावर येऊन ठे पला असला तरीही पळशी बु. या परिसरातील लहान-मोठे नदी- नाले व पाझर तलाव हे कोरडेच असल्याने येथील वन्य  प्राण्यांसह पाळीव जनावरांचे पिण्याच्या पाण्याकरिता प्रचंड हाल  होत असल्याचे चित्र यावेळी दिसून येत आहे.

ठळक मुद्देपरिसरातील जलसाठे कोरडेच!विहिरींची पातळीही खालावलेलीच!

लोकमत न्यूज नेटवर्कपळशी बु.: यावर्षीचा पावसाळा  संपण्याच्या मार्गावर येऊन ठे पला असला तरीही पळशी बु. या परिसरातील लहान-मोठे नदी- नाले व पाझर तलाव हे कोरडेच असल्याने येथील वन्य  प्राण्यांसह पाळीव जनावरांचे पिण्याच्या पाण्याकरिता प्रचंड हाल  होत असल्याचे चित्र यावेळी दिसून येत आहे.खामगाव तालुक्यात येत असलेल्या यशवंत ग्राम पळशी बु. या  परिसरात यंदा पावसाळा हा सुरुवातीपासूनच कमी प्रमाणात  असल्याने या परिसरातून पावसाळ्याच्या दिवसात खळखळ  वाहणारे देवळाचा नाला, गणेशाचा नाला, रानमयाचा नाला,  दुधनाला व मसनदीच्या पात्रासह लहान-मोठय़ा नाल्यात  पाखरांना पिण्याकरिता कुठेच एक थेंबसुद्धा पाणी नाही. तसेच  याच नाल्यावर वरच्या भागात वसान मोहदर शिवारात एक पाझर  तलाव आणि वसान कारेगाव या शिवारात दोन खूप जुने पाझर  तलाव केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त ‘पाणी अडवा पाणी  जिरवा’च्या माध्यमातून अनेक ठिकाणी नाल्यात माती बांध  टाकणीची कामेसुद्धा झाली आहेत.  २0१६-१७ या वर्षात  जलयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरी तील करोडो रुपये खर्च करून पळशी बु. या शिवारात ७ सिमेंट  बंधारे तर पळशी खुर्द या शिवारात ७ सिमेंट बंधारे हे नाला  खोलीकरणाचे काम करून एकूण १४ सिमेंट बंधार्‍याची कामे  करण्यात आली. मात्र यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच म्हणजेच पेरणी पासूनच या परिसरात पावसाचे प्रमाण हे अत्यल्प प्रमाणात  असल्याने व एकही पाऊस हा जोरदार पडला नसल्यामुळे या  परिसरातील नदी नाल्यांना एकही पूर आल्याचे पाहावयास  मिळाले नाही. त्यामुळे येथील असलेल्या पाझर तलावासह  लहान-मोठे नदी-नाल्यांचे पात्र हे  कोरडेच असल्याने जंगला तील वन्यजीव प्राण्यांना पिण्याच्या पाण्याकरिता वणवण  भटकावे लागत असल्याचे चित्र सध्या पावसाळा सुरू असूनही  दिसून येत आहे. तसेच गावातील पाळीव जनावरे हे जंगलात  चारण्याकरिता गेले असता या गुरांना पिण्यासाठी पाणी नसते.  गुराख्याला एखाद्या शेतकर्‍यांच्या शेतातील विहिरीचे पाणी  बकेटने काढून गुरांना पाजावे लागते किंवा दिवसभर बिना  पाण्याचे चारून घरी आल्यावर या जनावरांना पाणी पाजण्याची  वेळ  पशुपालकांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात  काय परिस्थिती ओढवणार, याबाबत चिंता व्यक्त केली जात  आहे.    

विहिरींची पातळीही खालावलेलीच!विहिरीतील पाण्याच्या पातळीतसुद्धा पाहिजे तशी वाढ होत  नसल्याने यावर्षी  ग्रामस्थांनाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न  भेडसावणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तरी संबंधित  विभागाने  पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केल्या जात  आहे.