शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

पळशी बु. येथे पाणीटंचाईमुळे वन्य जीवांचे हाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:30 IST

पळशी बु.: यावर्षीचा पावसाळा  संपण्याच्या मार्गावर येऊन ठे पला असला तरीही पळशी बु. या परिसरातील लहान-मोठे नदी- नाले व पाझर तलाव हे कोरडेच असल्याने येथील वन्य  प्राण्यांसह पाळीव जनावरांचे पिण्याच्या पाण्याकरिता प्रचंड हाल  होत असल्याचे चित्र यावेळी दिसून येत आहे.

ठळक मुद्देपरिसरातील जलसाठे कोरडेच!विहिरींची पातळीही खालावलेलीच!

लोकमत न्यूज नेटवर्कपळशी बु.: यावर्षीचा पावसाळा  संपण्याच्या मार्गावर येऊन ठे पला असला तरीही पळशी बु. या परिसरातील लहान-मोठे नदी- नाले व पाझर तलाव हे कोरडेच असल्याने येथील वन्य  प्राण्यांसह पाळीव जनावरांचे पिण्याच्या पाण्याकरिता प्रचंड हाल  होत असल्याचे चित्र यावेळी दिसून येत आहे.खामगाव तालुक्यात येत असलेल्या यशवंत ग्राम पळशी बु. या  परिसरात यंदा पावसाळा हा सुरुवातीपासूनच कमी प्रमाणात  असल्याने या परिसरातून पावसाळ्याच्या दिवसात खळखळ  वाहणारे देवळाचा नाला, गणेशाचा नाला, रानमयाचा नाला,  दुधनाला व मसनदीच्या पात्रासह लहान-मोठय़ा नाल्यात  पाखरांना पिण्याकरिता कुठेच एक थेंबसुद्धा पाणी नाही. तसेच  याच नाल्यावर वरच्या भागात वसान मोहदर शिवारात एक पाझर  तलाव आणि वसान कारेगाव या शिवारात दोन खूप जुने पाझर  तलाव केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त ‘पाणी अडवा पाणी  जिरवा’च्या माध्यमातून अनेक ठिकाणी नाल्यात माती बांध  टाकणीची कामेसुद्धा झाली आहेत.  २0१६-१७ या वर्षात  जलयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरी तील करोडो रुपये खर्च करून पळशी बु. या शिवारात ७ सिमेंट  बंधारे तर पळशी खुर्द या शिवारात ७ सिमेंट बंधारे हे नाला  खोलीकरणाचे काम करून एकूण १४ सिमेंट बंधार्‍याची कामे  करण्यात आली. मात्र यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच म्हणजेच पेरणी पासूनच या परिसरात पावसाचे प्रमाण हे अत्यल्प प्रमाणात  असल्याने व एकही पाऊस हा जोरदार पडला नसल्यामुळे या  परिसरातील नदी नाल्यांना एकही पूर आल्याचे पाहावयास  मिळाले नाही. त्यामुळे येथील असलेल्या पाझर तलावासह  लहान-मोठे नदी-नाल्यांचे पात्र हे  कोरडेच असल्याने जंगला तील वन्यजीव प्राण्यांना पिण्याच्या पाण्याकरिता वणवण  भटकावे लागत असल्याचे चित्र सध्या पावसाळा सुरू असूनही  दिसून येत आहे. तसेच गावातील पाळीव जनावरे हे जंगलात  चारण्याकरिता गेले असता या गुरांना पिण्यासाठी पाणी नसते.  गुराख्याला एखाद्या शेतकर्‍यांच्या शेतातील विहिरीचे पाणी  बकेटने काढून गुरांना पाजावे लागते किंवा दिवसभर बिना  पाण्याचे चारून घरी आल्यावर या जनावरांना पाणी पाजण्याची  वेळ  पशुपालकांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात  काय परिस्थिती ओढवणार, याबाबत चिंता व्यक्त केली जात  आहे.    

विहिरींची पातळीही खालावलेलीच!विहिरीतील पाण्याच्या पातळीतसुद्धा पाहिजे तशी वाढ होत  नसल्याने यावर्षी  ग्रामस्थांनाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न  भेडसावणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तरी संबंधित  विभागाने  पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केल्या जात  आहे.