शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पळशी बु. येथे पाणीटंचाईमुळे वन्य जीवांचे हाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:30 IST

पळशी बु.: यावर्षीचा पावसाळा  संपण्याच्या मार्गावर येऊन ठे पला असला तरीही पळशी बु. या परिसरातील लहान-मोठे नदी- नाले व पाझर तलाव हे कोरडेच असल्याने येथील वन्य  प्राण्यांसह पाळीव जनावरांचे पिण्याच्या पाण्याकरिता प्रचंड हाल  होत असल्याचे चित्र यावेळी दिसून येत आहे.

ठळक मुद्देपरिसरातील जलसाठे कोरडेच!विहिरींची पातळीही खालावलेलीच!

लोकमत न्यूज नेटवर्कपळशी बु.: यावर्षीचा पावसाळा  संपण्याच्या मार्गावर येऊन ठे पला असला तरीही पळशी बु. या परिसरातील लहान-मोठे नदी- नाले व पाझर तलाव हे कोरडेच असल्याने येथील वन्य  प्राण्यांसह पाळीव जनावरांचे पिण्याच्या पाण्याकरिता प्रचंड हाल  होत असल्याचे चित्र यावेळी दिसून येत आहे.खामगाव तालुक्यात येत असलेल्या यशवंत ग्राम पळशी बु. या  परिसरात यंदा पावसाळा हा सुरुवातीपासूनच कमी प्रमाणात  असल्याने या परिसरातून पावसाळ्याच्या दिवसात खळखळ  वाहणारे देवळाचा नाला, गणेशाचा नाला, रानमयाचा नाला,  दुधनाला व मसनदीच्या पात्रासह लहान-मोठय़ा नाल्यात  पाखरांना पिण्याकरिता कुठेच एक थेंबसुद्धा पाणी नाही. तसेच  याच नाल्यावर वरच्या भागात वसान मोहदर शिवारात एक पाझर  तलाव आणि वसान कारेगाव या शिवारात दोन खूप जुने पाझर  तलाव केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त ‘पाणी अडवा पाणी  जिरवा’च्या माध्यमातून अनेक ठिकाणी नाल्यात माती बांध  टाकणीची कामेसुद्धा झाली आहेत.  २0१६-१७ या वर्षात  जलयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरी तील करोडो रुपये खर्च करून पळशी बु. या शिवारात ७ सिमेंट  बंधारे तर पळशी खुर्द या शिवारात ७ सिमेंट बंधारे हे नाला  खोलीकरणाचे काम करून एकूण १४ सिमेंट बंधार्‍याची कामे  करण्यात आली. मात्र यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच म्हणजेच पेरणी पासूनच या परिसरात पावसाचे प्रमाण हे अत्यल्प प्रमाणात  असल्याने व एकही पाऊस हा जोरदार पडला नसल्यामुळे या  परिसरातील नदी नाल्यांना एकही पूर आल्याचे पाहावयास  मिळाले नाही. त्यामुळे येथील असलेल्या पाझर तलावासह  लहान-मोठे नदी-नाल्यांचे पात्र हे  कोरडेच असल्याने जंगला तील वन्यजीव प्राण्यांना पिण्याच्या पाण्याकरिता वणवण  भटकावे लागत असल्याचे चित्र सध्या पावसाळा सुरू असूनही  दिसून येत आहे. तसेच गावातील पाळीव जनावरे हे जंगलात  चारण्याकरिता गेले असता या गुरांना पिण्यासाठी पाणी नसते.  गुराख्याला एखाद्या शेतकर्‍यांच्या शेतातील विहिरीचे पाणी  बकेटने काढून गुरांना पाजावे लागते किंवा दिवसभर बिना  पाण्याचे चारून घरी आल्यावर या जनावरांना पाणी पाजण्याची  वेळ  पशुपालकांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात  काय परिस्थिती ओढवणार, याबाबत चिंता व्यक्त केली जात  आहे.    

विहिरींची पातळीही खालावलेलीच!विहिरीतील पाण्याच्या पातळीतसुद्धा पाहिजे तशी वाढ होत  नसल्याने यावर्षी  ग्रामस्थांनाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न  भेडसावणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तरी संबंधित  विभागाने  पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केल्या जात  आहे.