शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

दुष्काळाच्या जोखडातून हवे स्वातंत्र्य

By admin | Updated: August 14, 2014 23:48 IST

बुलडाणा जिल्हावर दुष्काळाचे सावट

बुलडाणा : नशीब अन् निसर्ग यावर शेतकरी सर्वाधिक विसंबून राहिला; मात्र या दोघांनीही शेतकर्‍यांना नेहमीच फटका दिला आहे. दुष्काळाचे संकट हे कुठल्याना कुठल्या रूपात जिल्ह्यावर येत असून या जोखडातून स्वातंत्र्य कधी मिळणार, अशी चिंता सर्वानांच लागून आहे. गेल्यावर्षी बुलडाण्यात गाळ काढण्याची मोहीम यशस्वी झाली. पावसानेही भरभरून हजेरी लावली त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता संपूर्ण उन्हाळय़ात जाणवली नाही. आता पावसाने उघाड दिल्याने दुष्काळ दाटून आला आहे. उडीद, मूग हातचा गेला, सोयाबीन, कपाशी तुरळक पावसावर तग धरून आहे. पावसाने दमदार हजेरी लावली नाही तर जमिनीतील ओलही सुकून जाईल त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त झाला आहे. पीक विम्याची मुदत वाढवून दिली नसल्याने सोयाबीन सारख्या पिकाला संरक्षणही मिळाले नाही, त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेणे गरजेच आहे.* पावसाळा सुरू झाल्यापासून आज १४ ऑगस्टपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात केवळ २३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरी ३३ टक्के एवढाच आहे. पावसाचे दिवस संपत आले असल्याने दुष्काळ गडद झाला आहे.*जिल्हाभरात आजपर्यंत ९५ टक्के पेरणी झाली आहे; मात्र पावसाच्या लहरीपणामुळे सर्व पेरणी धोक्यात आहे.*सोयाबीन व कापूस हे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे पीक असून, २ लाख ८३ हजार हेक्टरवर सोयाबीन तर २ लाख ४४ हजार ४00 हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली आहे.*जिल्ह्यातील जलसाठा हा दोन महिन्यापर्यंत पुरेसा आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होऊ शकतो.*सोयाबीनच्या पेरणीचा कालावधी संपल्याचे कारण दाखवित पीक विमा नाकारल्या जात आहे.