शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या जोखडातून हवे स्वातंत्र्य

By admin | Updated: August 14, 2014 23:48 IST

बुलडाणा जिल्हावर दुष्काळाचे सावट

बुलडाणा : नशीब अन् निसर्ग यावर शेतकरी सर्वाधिक विसंबून राहिला; मात्र या दोघांनीही शेतकर्‍यांना नेहमीच फटका दिला आहे. दुष्काळाचे संकट हे कुठल्याना कुठल्या रूपात जिल्ह्यावर येत असून या जोखडातून स्वातंत्र्य कधी मिळणार, अशी चिंता सर्वानांच लागून आहे. गेल्यावर्षी बुलडाण्यात गाळ काढण्याची मोहीम यशस्वी झाली. पावसानेही भरभरून हजेरी लावली त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता संपूर्ण उन्हाळय़ात जाणवली नाही. आता पावसाने उघाड दिल्याने दुष्काळ दाटून आला आहे. उडीद, मूग हातचा गेला, सोयाबीन, कपाशी तुरळक पावसावर तग धरून आहे. पावसाने दमदार हजेरी लावली नाही तर जमिनीतील ओलही सुकून जाईल त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त झाला आहे. पीक विम्याची मुदत वाढवून दिली नसल्याने सोयाबीन सारख्या पिकाला संरक्षणही मिळाले नाही, त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेणे गरजेच आहे.* पावसाळा सुरू झाल्यापासून आज १४ ऑगस्टपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात केवळ २३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरी ३३ टक्के एवढाच आहे. पावसाचे दिवस संपत आले असल्याने दुष्काळ गडद झाला आहे.*जिल्हाभरात आजपर्यंत ९५ टक्के पेरणी झाली आहे; मात्र पावसाच्या लहरीपणामुळे सर्व पेरणी धोक्यात आहे.*सोयाबीन व कापूस हे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे पीक असून, २ लाख ८३ हजार हेक्टरवर सोयाबीन तर २ लाख ४४ हजार ४00 हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली आहे.*जिल्ह्यातील जलसाठा हा दोन महिन्यापर्यंत पुरेसा आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होऊ शकतो.*सोयाबीनच्या पेरणीचा कालावधी संपल्याचे कारण दाखवित पीक विमा नाकारल्या जात आहे.