शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बुलडाणा जिल्ह्यातील १३३४ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 18:27 IST

बुलडाणा : आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील २२० शाळांपैकी १४५ शाळांसाठी शाळेपासून एक कि़मी. अंतरावरील विद्यार्थ्यांचा पहिल्या फेरीमध्ये ड्रॉ काढण्यात आला.

ठळक मुद्दे जिल्ह्यात २२० शाळांमध्ये २ हजार ९९३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. आरटीईच्या या सोडत पद्धतीमुळे जिल्ह्यातील १ हजार ३३४ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. पालकांना २४ मार्चपर्यंत आपल्या पाल्याचा संबंधीत शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे.

बुलडाणा : आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील २२० शाळांपैकी १४५ शाळांसाठी शाळेपासून एक कि़मी. अंतरावरील विद्यार्थ्यांचा पहिल्या फेरीमध्ये ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील १ हजार ३३४ विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून, ११ दिवसात संबंधीत शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे. २४ मार्चपर्यंत प्रवेश न घेतल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो.शिक्षण हक्क कायद्याने (राईट टु एज्युकेशन म्हणजेच आरटीई) आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना इयत्ता पहिल्या वर्गात मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून देण्यात आले आहे. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात २५ टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यात २२० शाळांमध्ये २ हजार ९९३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. त्यासाठी पालकांकडून विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. जिल्हाभरातून ३ हजार ३३६ अर्ज प्रविष्ठ झाल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी बुलडाणा येथील शारदा ज्ञानपीठमध्ये १३ मार्चला पहिली सोडत (लॉटरी) काढण्यात आली. शाळेपासून विद्यार्थ्यांच्या निवास स्थानापर्यंतचे १ कि.मी. अंतर असलेल्यांना यात प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे पहिल्या टप्प्यात शाळेपासून १ कि.मी. अंतरापर्यंतच्या या अटीत बसणाऱ्या विद्यार्थ्यांची सोडत (लॉटरी) काढण्यात आली. त्यामध्ये आरटीई अंतर्गत येत असलेल्या २२० शाळांपैकी १४३ शाळांसाठी हा ड्रॉ काढण्यात आला. आरटीईच्या या सोडत पद्धतीमुळे जिल्ह्यातील १ हजार ३३४ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. पालकांना २४ मार्चपर्यंत आपल्या पाल्याचा संबंधीत शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे. मात्र ११ दिवसाच्या या मुदतीत प्रवेश घेतला नाही तर सदर प्रवेश रद्द होणार असल्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानंतर २८ व ३१ मार्च या चार दिवसाच्या कालावधीत पुन्हा दुसरी सोडत (लॉटरी) काढून २ ते १२ एप्रिल या कालावधीत प्रवेश घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल.यांच्या उपस्थितीत झाला ड्रॉआरटीई अंतर्गत अर्ज आलेल्या विद्यार्थ्यांचा बुलडाणा येथील शारदा ज्ञानपीठमध्ये पहिला ड्रॉ काढण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी सुभाष वराडे, सर्व शिक्षा अभियानचे नितिन आरज, मुख्यध्यापक ्रप्रतिनिधी म्हणून शेख बसीद अब्दूल हमीद, शारदा ज्ञानपीठचे ग्रंथपाल कृष्णा शेळके, पालक प्रतिनिधी रुपराव चव्हाण व पालकांची उपस्थिती होती.लकी ड्रॉमध्ये निवड झालेल्या मुलांना मिळालेल्या शाळेतच प्रवेश घेणे बंधनकारक आहे. २४ मार्चपर्यंत प्रवेश न घेतल्यास या प्रक्रियेतून अशा मुलांची नावे बाद होतील.- एस.टी.वराडे,प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा. 

 

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा