शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

प्रस्थापितांना हादरे; सामान्यांचा विजय

By admin | Updated: October 20, 2014 00:17 IST

बुलडाणा जिल्ह्यात भल्या माणसांना जनतेची पसंती; राष्ट्रवादीचे घड्याळ बंद तर भारिपचा भोपळा.

राजेश शेगोकार /बुलडाणाबुलडाणा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हे बदलत्या राजकारणाचे दर्शन घडविणारे आहे. संपत्तीमधून सत्ता व सत्तेमधून संपत्ती या दुष्टचक्रामुळे सामान्यांना राजकारणाचा तिटकारा येऊ लागला होता. प्रत्येक निवडणुकीत तेच ते चेहरे आलटून पालटून लोकांसमोर येत होते. यावेळी मात्र लोकांनी नव्या चेहर्‍यांना पसंती देत जिल्ह्याच्या राजकारणाचे चित्रच बदलवून टाकले आहे. राजकारणातील भल्या माणसांना ताकद देऊन सामान्यांनी इतिहास घडविला. निकालाच्या आकडेवारीमध्ये काँग्रेसची संख्या कायम राहिली असली तरी खामगावा तील काँग्रेसचा पराभव पक्षासाठी धक्कादायक आहे. असाच प्रकार शिवसेनेच्या बाबतीत घडला. सेनेच्या जागा दोन जागा कायम राहिल्या असल्या तरी बुलडाण्यात सेनेला मिळालेले चौथे स्थान लाजीरवाणे ठरले आहे. तिकिटासाठी रातोरात पक्ष बदलवून निवडणूक लढविणार्‍यांनाही जनतेने नाकारले.बुलडाणा मतदारसंघातील निवडणूक ही सर्वार्थाने ऐतिहासिक ठरली. विचार, विश्‍वास व विकास या मुद्दय़ांवर रिंगणात उतरलेले हर्षवर्धन सपकाळ हे विरोधकांपेक्षाही स्वपक्षीयांच्या टीकेचे व चेष्टेचे विषय बनले होते. तरीही केवळ सामान्यांचा विश्‍वास व त्यांच्याच लोकवर्गणीच्या भरवशावर सपकाळ यांनी विजय मिळविला. विशेष म्हणजे, दुसर्‍या क्रमांकावर शिवसेना किंवा भाजपा राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, मनसेच्या संजय गायकवाड यांनी सपकाळांच्याच प्रचार तंत्रासारखा प्रचार राबवून दुसर्‍या क्रमांकावर झेप घे तली.भाजपच्या योगेंद्र गोडे यांनी पक्षबदल करून लढविलेली निवडणूक ही अतिशय नियोजनबद्ध होती. त्यांनी प्रचाराचा धडाका उडवला. मात्र, पैशांचा अतिवापर झाल्याचा प्रचार त्यांच्या अंगलट आला. शिवसेनेचे विजयराज शिंदे हे जनता गाडी म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र, जनतेची सुप्त नाराजी ते ओळखू शकले नाहीत. सिंदखेडराजा मतदारसंघात डॉ. राजेंद्र शिंगणे हे उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीत निर्माण झालेली अस्वस्थता मतपेटीतून उमटली. ठळक वैशिष्ट्ये* जातीय राजकारणाला पुर्णविराम या निवडणुकीच्या निमित्याने मिळाला आहे. सर्वसामान्य मतदारांनी ताकद दाखविली.*नेहमीप्रमाणे सर्वांत आधी मेहकर मतदारसंघाचा निकाल आला व सर्वांत शेवटी मलकापूर मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. खामगावबाबत राज्यभरात उत्सुकता होती.*मोदींची सभा झालेल्या ठिकाणी भाजपचा विजय झाला, तर राहुल गांधी यांच्या सभाक्षेत्रात काँग्रेस विजयी झाली. मात्र, उद्धव ठाकरे, शरद पवार, नितीन गडकरी यांनी सभा घेतलेल्या ठिकाणी त्यांच्या पक्षाचा पराभव झाला.