शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

दुसरी भाषा शिकण्यासाठी एका भाषेचा पाया पक्का हवा! - विणा दिघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 17:48 IST

दुसरी भाषा शिकण्यासाठी एका भाषेचा पाया पक्का असला पाहिजे, असे मत अहमदनगर येथील आकाशवाणी निवेदिका विणा दिघे यांनी व्यक्त केले.

- सोहम घाडगे

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा:  निवेदक हे क्षेत्र खुप विस्तृत आहे. दररोज नवीन व्यक्तींच्या भेटी होतात. प्रत्येकाकडून काही तरी शिकायला मिळते. मातृभाषेवर प्रभुत्व हवे. निवेदक हा बहुभाषिक असावा. मात्र दुसरी भाषा शिकण्यासाठी एका भाषेचा पाया पक्का असला पाहिजे, असे मत अहमदनगर येथील आकाशवाणी निवेदिका विणा दिघे यांनी व्यक्त केले. प्रगती वाचनालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमानिमित्त बुलडाणा येथे आल्या असता त्याच्यांशी साधलेला संवाद...

निवेदक म्हणून करिअर करायचे ठरवले होते का?

निवेदक म्हणून करिअर करावे असे ठरविले नव्हते. लग्नानंतर सासरी आल्यावर स्वत:चा एक व्यवसाय सुरुकेला. दरम्यान २००१ मध्ये अहमदनगर आशावाणी केंद्रावर महिला उद्योजक म्हणून मुलाखत प्रसारित झाली. केंद्राच्या प्रमुखांनी आवाज चांगला असल्याचे सांगून आकाशवाणीसाठी काम करण्यासाठी विचारले आणि तेथून हा प्रवास सुरु झाला.

महिला व युवतींसाठी या क्षेत्रात कोणकोणत्या संधी आहेत?

निवेदक हे पुरुषी क्षेत्र असले तरी आज महिलांनी या क्षेत्रात उत्तूंग भरारी घेतली. महिला व युवतींसाठी इथे खुप कामे आहेत. डबिंग, व्हॉईस ओव्हरमध्ये चांगले करिअर करता येऊ शकते. त्यासाठी भरपूर मेहनत करण्याची तयारी पाहिजे.

निवेदकाच्या अंगी कुठले गुण असले पाहिजे ?

या क्षेत्रात प्रसंगावधान खुप महत्वाचे आहे. कायम जीवंत राहावे लागते. संपूर्ण कार्यक्रमाचे यश तुमच्यावर अवलंबून असते. अनेक कार्यक्रम सूत्र संचालनाच्या जोरावर यशस्वी झाले आहेत. निवेदकाला चौफेर वाचन आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य संदर्भ  देता आले पाहिजेत. नेहमी चांगली पुस्तके वाचून काढावी.

मार्गदर्शनपर पुस्तक लिहिण्याचा मानस आहे का?

माझ्याकडे येणाºयांना मी मार्गदर्शन करते. परंतू सध्या तरी मार्गदर्शनपर पुस्तक लिहिण्याचा विचार नाही. भविष्यात नक्कीच लिहायला आवडेल. कामानिमित्त राज्यभर फिरस्ती सुरु असते. थोडी उसंत मिळाली की इतर कामे असतात.कुटूंबाची जबाबदारी सांभाळून सर्व आघाड्यांवर काम करावे लागते. या क्षेत्रात करिअर म्हणून खूप संधी आहेत. मेहनत घ्यायची तयारी ठेवल्यास नक्की यश मिळते. सध्या प्रशिक्षणाच्या नावावर जागोजागी केंद्र सुरु आहेत. मात्र मला वाटते की, स्वत:ची गुणवत्ता चांगली असली कोणत्याच प्रशिक्षणाची गरज नाही. स्वत:ला सिध्द करा, यश मिळते. केवळ क्षेत्र चांगले आहे म्हणून भागत नाही. त्यासाठी तुम्ही तितके परिपूर्ण असावे लागता. कार्यक्रमात तुम्हाला १०० टक्के देता यायला हवे. इथे कागद हातात धरुन अजिबात चालत नाही. दुसºयाचे कॉपी केलेले ज्ञान फार काळ टिकत नाही. आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढविण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखत