शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

‘चिखली पॅटर्न’ ठरलेल्या शेतरस्त्यांचे भाग्य उजळणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:40 IST

तालुक्यात गत दहा वर्षांच्या कालावधीत लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर शेतरस्ते खुले झालेले आहेत. याअंतर्गत तालुक्यात सुमारे ३०० शेतरस्त्यांनी मोकळा श्वास ...

तालुक्यात गत दहा वर्षांच्या कालावधीत लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर शेतरस्ते खुले झालेले आहेत. याअंतर्गत तालुक्यात सुमारे ३०० शेतरस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. शेतरस्त्यांची ही चळवळ ‘चिखली पॅटर्न’ म्हणूनही नावारूपास आली. मात्र, पुढे या रस्त्यांच्या मजबुतीकरणाचा प्रश्न बिकट बनला होता. शेतरस्त्यांच्या खडीकरणाच्या कामासाठी मनरेगांतर्गत कुशल- अकुशल कामाचा ताळमेळ बसवून खडीकरण करण्यास तत्कालीन राज्य शासनाने मंजुरी दिली होती. मात्र, पुढे योजना गुंडाळल्या गेल्याने शेतरस्त्यांचा मजबुतीकरणाचा प्रश्न प्रलंबित होता. आता रस्ते विकास कार्यक्रम सन २०२१-२०४१ अंतर्गत प्रत्येक गावातील ग्रामस्थांना एक मोठी संधी चालून आली आहे. कोणत्याही ग्रामस्थांनी वापराचे रस्ते संबंधित यंत्रणेला सुचविल्यास या रस्त्यांचे भाग्य उजळून त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळणार आहे व हा दर्जा मिळाल्यानंतर या रस्त्यांचे डांबरीकरण होणार आहे. पर्यायाने गावे जवळच्या मार्गांनी एकमेकांना जोडले जाणार. शिवाय शेतरस्ते सुस्थितीत येऊन प्रामुख्याने शेतकऱ्यांची समस्या सुटणार आहे.

नॉनप्लॅनमुळे रखडला विकास !

रस्तेविकास आराखड्यात नसलेले नॉनप्लॅन किंवा योजनाबाह्य रस्त्यांच्या कामावर शासकीय निधी खर्च करता येत नाही. तालुक्यातील शेकडो रस्त्यांनी लोकसहभागातून मोकळा श्वास घेतला आहे. तथापि, सध्याही आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वात अनेक शेतरस्त्यांचे काम लोकसहभागातून सुरू आहे. मात्र, केवळ योजनेत समाविष्ट नसल्याने त्या रस्त्यांचा अद्याप विकास होऊ शकला नाही.

कोट...

मागील वर्षी लोकसहभागातून २५ ठिकाणची पाणंद रस्ते केली. एमआरईजीएस या केंद्र सरकारच्या योजनेतूनही गावागावांत जाऊन रस्ते तयार करण्याचे आवाहन करीत आहे. पालकमंत्री पाणंद रस्ते विकास योजना, २५१५ व अन्य योजनेतूनही रस्ते विकास करता येईल असा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, या रस्त्यांचा विकास कार्यक्रमात समावेश झाल्यास मार्ग सुकर होणार आहे.

-श्वेता महाले

आमदार, चिखली