शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तालुकास्तरीय समित्यांचे गठन रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 11:50 IST

नवीन तालुकास्तरीय समित्यांचे गठन करण्यात आले नाही.

ठळक मुद्देलाभार्थ्यांना कार्यालयात येऊन चकरा माराव्या लागत आहेत. कल्याणकारी योजनांची प्रकरणे शासन दरबारी प्रलंबित आहेत.

- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : निवडणुका होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे; मात्र नवीन तालुकास्तरीय समित्यांचे गठन करण्यात आले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील अशिक्षित, मजूर, शेतकरी इत्यादींच्या कल्याणकारी योजनांची प्रकरणे शासन दरबारी प्रलंबित आहेत.गोरगरीब जनता व शेतकऱ्यांची कामे त्वरित मार्गी लावावी, त्यांच्यापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचाव्यात, याकरिता संजय गांधी निराधार समिती, आरोग्य समिती, दक्षता समिती, महात्मा गांधी रोजगार समिती, अन्न धान्य रेशन वाटप समित्यांचे गठन करण्यात येते; मात्र एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला तरी महाआघाडी सरकारने या समित्यांचे गठन केले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना कार्यालयात येऊन चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे गरीब जनतेच्या विविध कामांच्या प्रलंबित प्रकरणाबाबत अधिकारी वेळकाढू धोरण अवलंबितात, तसेच दलालही सक्रिय असल्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. समित्या स्थापन झाल्यास प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास मदत होऊ शकते. समित्या नसल्याने शासनाच्या विविध योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. कोरोनामुळे गत नऊ महिन्यांपासून अनेक शासकीय योजनांचे काम ठप्प पडले आहे. 

 

खामगाव तालुक्यात तालुकास्तरीय समित्यांचे गठन करण्यात आले नाही. अद्याप शासनाने या समित्या स्थापन करण्याचा आदेश देण्यात आला नाही.- शीतल रसाळतहसीलदार, खामगाव.

या समित्या गोरगरिबांच्या हक्कासाठी स्थापन करण्यात येतात. यामुळे गरीब लाभार्थ्यांचे प्रश्न लवकर मार्गी लागतात. समित्यांच्या बैठकांमध्ये प्रकरणे निकाली लागतात. त्यामुळे त्वरित या समित्या गठित करायला हव्या.- सुरेश गव्हाळ, तालुकाध्यक्ष, भाजप, खामगाव.

हे वेदनाशून्य सरकार आहे. त्यामुळे या समित्या गठित करण्यात आल्या नाहीत. सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता या समित्यांचे गठन त्वरित करायला हवे.- अशोक सोनोनेप्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी. 

टॅग्स :khamgaonखामगावgovernment schemeसरकारी योजना