शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

आगीच्या घटना रोखण्यासाठी वनविभाग अलर्टवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:32 IST

मार्च महिन्याच्या प्रारंभापासून जिल्ह्यातील जंगलांना आग लागल्याचे पाच ते सात घटना समोर आल्या. यात नेमके किती नुकसान झाले ...

मार्च महिन्याच्या प्रारंभापासून जिल्ह्यातील जंगलांना आग लागल्याचे पाच ते सात घटना समोर आल्या. यात नेमके किती नुकसान झाले याचे सध्या वन विभाग आकलन करत असले तरी एक हजार हेक्टरपेक्षा अधिक नुकसान एकट्या ज्ञानगंगा अभयारण्यात झाल्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने बुलडाणा आणि मोताळा रेंजमध्ये येत असलेल्या अजिंठा पर्वत रांगा, ज्ञानगंगा अभयारण्यातील माटरगाव परिसरात काशीनळकुंड, बुलडाणा शहरा नजीकचा राजूर घाट, नळकुंड, दाभा, बिरसिंगपुर पळसेखड नाईक, पाडली आणि सातपुडा पर्वत रागांमधील जंगलांना ही आग लागली होती. ज्ञानगंगा अभयारण्यातील लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास दोन दिवस यंत्रणेला धावपळ करावी लागली. अंजिठा पर्वत रांगात लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री अग्नीरक्षकांना मोठी कसरत करावी लागली होती.

--मेळघाटचा फायर सेल सक्रिय--

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत असलेला फायर सेलही आता सक्रिय झाला आहे. सोबतच फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाकडूनही वन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना थेट अलर्ट जात असून आग लागलेल्या ठिकाणाचा नकाशा व स्थितीचीही माहिती दिल्या जात आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात आगीच्या प्रतिबंधासाठी ५७ अग्नीरक्षक ब्लोअर यंत्रासह अन्य साधनसामुग्रीने सध्या सज्ज आहे. बऱ्हाणपुर डीएअेा कार्यालयाशीही समन्वय ठेवण्यात येत आहे.

--प्रतिशोधातून आगीच्या घटना--

जिल्ह्यातील जंगलांना प्रतिशोधातून आगी लावल्या जात असल्याचे प्रादेशिक वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. फेब्रुवारी महिन्यात जळगाव जामोदमध्ये डिंकाच्या तस्करी प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी वनविभागाला बघून घेण्याच्या धमक्याही दिल्या गेल्या होता. त्यानुषंगाने सध्या वनविभाग अलर्ट आहे. आगीच्या घटना अशाच काही प्रकरणातून झाल्या असाव्यात अशी शंका अधिकारी व्यक्त करत आहेत.

वनविभागाची यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच जंगला लगतच्या गावातील शेतकऱ्यांची कार्यशाळा घेवून त्यांनी कोणती सतर्कता बाळगावी याची कल्पना देण्यात येत आहे. आग रोखण्यासाठी लोकसहभाग ही वाढविण्यावर भर देत आहोत.

(अक्षय गजभिये, जिल्हा उपवनसंरक्षक, बुलडाणा)