शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

आगीच्या घटना रोखण्यासाठी वनविभाग अलर्टवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:32 IST

मार्च महिन्याच्या प्रारंभापासून जिल्ह्यातील जंगलांना आग लागल्याचे पाच ते सात घटना समोर आल्या. यात नेमके किती नुकसान झाले ...

मार्च महिन्याच्या प्रारंभापासून जिल्ह्यातील जंगलांना आग लागल्याचे पाच ते सात घटना समोर आल्या. यात नेमके किती नुकसान झाले याचे सध्या वन विभाग आकलन करत असले तरी एक हजार हेक्टरपेक्षा अधिक नुकसान एकट्या ज्ञानगंगा अभयारण्यात झाल्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने बुलडाणा आणि मोताळा रेंजमध्ये येत असलेल्या अजिंठा पर्वत रांगा, ज्ञानगंगा अभयारण्यातील माटरगाव परिसरात काशीनळकुंड, बुलडाणा शहरा नजीकचा राजूर घाट, नळकुंड, दाभा, बिरसिंगपुर पळसेखड नाईक, पाडली आणि सातपुडा पर्वत रागांमधील जंगलांना ही आग लागली होती. ज्ञानगंगा अभयारण्यातील लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास दोन दिवस यंत्रणेला धावपळ करावी लागली. अंजिठा पर्वत रांगात लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री अग्नीरक्षकांना मोठी कसरत करावी लागली होती.

--मेळघाटचा फायर सेल सक्रिय--

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत असलेला फायर सेलही आता सक्रिय झाला आहे. सोबतच फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाकडूनही वन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना थेट अलर्ट जात असून आग लागलेल्या ठिकाणाचा नकाशा व स्थितीचीही माहिती दिल्या जात आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात आगीच्या प्रतिबंधासाठी ५७ अग्नीरक्षक ब्लोअर यंत्रासह अन्य साधनसामुग्रीने सध्या सज्ज आहे. बऱ्हाणपुर डीएअेा कार्यालयाशीही समन्वय ठेवण्यात येत आहे.

--प्रतिशोधातून आगीच्या घटना--

जिल्ह्यातील जंगलांना प्रतिशोधातून आगी लावल्या जात असल्याचे प्रादेशिक वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. फेब्रुवारी महिन्यात जळगाव जामोदमध्ये डिंकाच्या तस्करी प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी वनविभागाला बघून घेण्याच्या धमक्याही दिल्या गेल्या होता. त्यानुषंगाने सध्या वनविभाग अलर्ट आहे. आगीच्या घटना अशाच काही प्रकरणातून झाल्या असाव्यात अशी शंका अधिकारी व्यक्त करत आहेत.

वनविभागाची यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच जंगला लगतच्या गावातील शेतकऱ्यांची कार्यशाळा घेवून त्यांनी कोणती सतर्कता बाळगावी याची कल्पना देण्यात येत आहे. आग रोखण्यासाठी लोकसहभाग ही वाढविण्यावर भर देत आहोत.

(अक्षय गजभिये, जिल्हा उपवनसंरक्षक, बुलडाणा)