शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शौचालय नसल्यास फौजदारी गुन्हे

By admin | Updated: May 26, 2017 01:17 IST

राशन व शासकीय दाखले योजना होणार बंद

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : प्रत्येक गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी शासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र अजूनही बरीच गाव हागणदारीमुक्त झालेली नाहीत. तर ग्रामीण भागात शौचालय बांधकाम संदर्भात उदासिनता दिसून येत आहे. यापुढे शासनाने कठोर पावले उचलत ज्या कुटूंबाकडे शौचाय नसेल त्याला शासनाचा कोणताच लाभ देण्यात येणार नाही. तर त्याचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे पदही अपात्र ठरविण्यात येणार आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवरुन पंचायत समितीला तसे आदेश प्राप्त झाले आहेत.ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबात शौचाय असले पाहिजे, तसेच संपूर्ण गाव हागणदारीमुक्त करुन गावातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ व चांगले रहावे, यासाठी शासनाकडून गेल्या ५ ते ६ वर्षापासून वेगवेगळ्या नावाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. स्वच्छता मोहिमेला मेहकर तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. त्यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापती, सदस्य, कर्मचारी वर्ग यांनी ग्रामीण भागात स्वच्छता मोहिम मोठ्या प्रमाणात राबविली होती. शौचालय बांधकाम करुन त्याचा नियमीत वापर करावा, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी पं.स. स्तरावरुन विविध उपक्रम राबविले होते. तर ज्यांचेकडे शौचालय बांधकाम पूर्ण नसेल त्यांचेवर नियमानुसार कारवाई सुद्धा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यावेळी अनेकांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले होते. अलीकडच्या काही वर्षामध्ये शौचालय बांधकामाची मोहीम थंडबस्त्यात सुरु होती. सरपंच, उपसरपंच सदस्य पद अपात्र ठरणारमेहकर तालुक्यात शौचालय बांधकाम संदर्भात उदासिनता दिसून येत असल्याने शासनाचा उद्देश सफल होतांना दिसत नाही. त्यामुळे आता ग्रामीण भागातील ज्या गावात ज्या वार्डातून ग्रा.पं.सदस्य निवडून आला असेल त्या वार्डातील प्रत्येक कुटूंबाकडे शौचालय बांधकाम पूर्ण करुन त्याचा नियमीत वापर असला पाहिजे, ही जबाबदारी त्या-त्या ग्रा.पं. सदस्यांची आहे. याप्रमाणे संपूर्ण गाव विहित मुदतीत हागणदारीमुक्त झाले पाहिजे, जर असे झाले नाही तर त्या गावचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचेवर महाराष्ट्र ग्रा.पं.अधिनियम कलम ३९ अ नुसार कारवाई करुन सदस्यत्व रद्द करण्यात येणार आहे.राशन व शासकीय दाखले, योजना बंद होणारबुलडाणा जिल्ह्यामध्ये मेहकर तालुका स्वच्छता अभियानात पिछाडीवर असल्याने वरिष्ठ पातळीवरुन सक्ती करुन शौचालय बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. ज्या कुटूंबाकडील शौचालय बांधकाम पूर्ण नसेल त्या कुटूंबाला शासनाचा कोणताच लाभ देण्यात येणार नाही. तसेच स्वस्त धान्य दुकानामधील राशन बंद करण्यात येणार आहे. याशिवाय कोणताच शासकीय दाखले देण्यात येणार नाही.