शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

शौचालय नसल्यास फौजदारी गुन्हे

By admin | Updated: May 26, 2017 01:17 IST

राशन व शासकीय दाखले योजना होणार बंद

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : प्रत्येक गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी शासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र अजूनही बरीच गाव हागणदारीमुक्त झालेली नाहीत. तर ग्रामीण भागात शौचालय बांधकाम संदर्भात उदासिनता दिसून येत आहे. यापुढे शासनाने कठोर पावले उचलत ज्या कुटूंबाकडे शौचाय नसेल त्याला शासनाचा कोणताच लाभ देण्यात येणार नाही. तर त्याचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे पदही अपात्र ठरविण्यात येणार आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवरुन पंचायत समितीला तसे आदेश प्राप्त झाले आहेत.ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबात शौचाय असले पाहिजे, तसेच संपूर्ण गाव हागणदारीमुक्त करुन गावातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ व चांगले रहावे, यासाठी शासनाकडून गेल्या ५ ते ६ वर्षापासून वेगवेगळ्या नावाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. स्वच्छता मोहिमेला मेहकर तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. त्यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापती, सदस्य, कर्मचारी वर्ग यांनी ग्रामीण भागात स्वच्छता मोहिम मोठ्या प्रमाणात राबविली होती. शौचालय बांधकाम करुन त्याचा नियमीत वापर करावा, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी पं.स. स्तरावरुन विविध उपक्रम राबविले होते. तर ज्यांचेकडे शौचालय बांधकाम पूर्ण नसेल त्यांचेवर नियमानुसार कारवाई सुद्धा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यावेळी अनेकांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले होते. अलीकडच्या काही वर्षामध्ये शौचालय बांधकामाची मोहीम थंडबस्त्यात सुरु होती. सरपंच, उपसरपंच सदस्य पद अपात्र ठरणारमेहकर तालुक्यात शौचालय बांधकाम संदर्भात उदासिनता दिसून येत असल्याने शासनाचा उद्देश सफल होतांना दिसत नाही. त्यामुळे आता ग्रामीण भागातील ज्या गावात ज्या वार्डातून ग्रा.पं.सदस्य निवडून आला असेल त्या वार्डातील प्रत्येक कुटूंबाकडे शौचालय बांधकाम पूर्ण करुन त्याचा नियमीत वापर असला पाहिजे, ही जबाबदारी त्या-त्या ग्रा.पं. सदस्यांची आहे. याप्रमाणे संपूर्ण गाव विहित मुदतीत हागणदारीमुक्त झाले पाहिजे, जर असे झाले नाही तर त्या गावचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचेवर महाराष्ट्र ग्रा.पं.अधिनियम कलम ३९ अ नुसार कारवाई करुन सदस्यत्व रद्द करण्यात येणार आहे.राशन व शासकीय दाखले, योजना बंद होणारबुलडाणा जिल्ह्यामध्ये मेहकर तालुका स्वच्छता अभियानात पिछाडीवर असल्याने वरिष्ठ पातळीवरुन सक्ती करुन शौचालय बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. ज्या कुटूंबाकडील शौचालय बांधकाम पूर्ण नसेल त्या कुटूंबाला शासनाचा कोणताच लाभ देण्यात येणार नाही. तसेच स्वस्त धान्य दुकानामधील राशन बंद करण्यात येणार आहे. याशिवाय कोणताच शासकीय दाखले देण्यात येणार नाही.